शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

टोप खणीत कचरा टाकण्यास परवानगी; हरित लवादाचा निर्णय

By admin | Updated: July 8, 2015 00:41 IST

कचऱ्यावर प्रक्रिया करून राहिलेले घटक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार खणीत टाकावेत.

कोल्हापूर : टोप येथील खणीत शहरातील कचऱ्यापासून प्रक्रिया केल्यानंतर राहिलेले घटक (इनर्ट मटेरिअल) टाकण्यास मंगळवारी पुण्यातील हरित लवादाने महापालिकेला सशर्त परवानगी दिली. कसबा बावडा येथील घनकचरा प्रक्रिया केंद्र प्रकल्प वेळेत पूर्ण केल्यानंतरच टोप येथील खणीचा भूमी भरण केंद्र (लँड फिल्ड साईट) म्हणून महापालिकेला वापर करता येईल, अशी अट न्यायाधीश व्ही. आर. किंगावकर व तज्ज्ञ सदस्य अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने निकालात नमूद केली. टोप येथील खणीचा ‘भूमी भरण क्षेत्र’ म्हणून उपयोग करण्यास टोपसह परिसरातील ग्रामस्थांचा विरोध आहे. शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. ‘भूमी भरण केंद्र’ म्हणून टोप येथील जागेची अत्यंत गरज आहे. ग्रामस्थांचे आक्षेप कायद्याला धरून नाहीत तसेच आधारहीन असल्याचे महापालिकेने सप्रमाण लवादास पटवून दिले. अंतिम निकाल देताना लवादाने २२ मे २०१५ रोजी दिलेल्या आदेशास अधीन ‘भूमी भरण केंद्र’ म्हणून टोप खण महापालिकेला सशर्त परवानगी देत आहे तसेच टोप ग्रामस्थांची याचिका खारीज केल्याची माहिती अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांनी दिली. लाईन बाजार येथील झूम प्रकल्पात कचऱ्यापासून खत निर्मिती तसेच जैव वैद्यकीय कचरा निर्मुलनसारखे प्रकल्प तत्काळ सक्षमपणे उभे करावेत. कचऱ्यावर प्रक्रिया करून राहिलेले घटक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार खणीत टाकावेत. खणीभोवती सहा फूट उंच भिंत उभारा, थेट कचरा टाकण्यास परवानगी दिली जाणार नाही, असेही लवादाने स्पष्ट केल्याचे सुतार यांनी सांगितले. याचिका खारीज केल्याची माहिती अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांनी दिली. लाईन बाजार येथील झूम प्रकल्पात कचऱ्यापासून खत निर्मिती तसेच जैव वैद्यकीय कचरा निर्मुलनसारखे प्रकल्प तत्काळ सक्षमपणे उभे करावेत. कचऱ्यावर प्रक्रिया करून राहिलेले घटक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार खणीत टाकावेत. खणीभोवती सहा फूट उंच भिंत उभारा, थेट कचरा टाकण्यास परवानगी दिली जाणार नाही, असेही लवादाने स्पष्ट केल्याचे सुतार यांनी सांगितले. निकालातील मुद्देभूमी भरण केंद्र म्हणून टोप खण मनपाच्या ताब्यातखणी भोवती सहा फूट भिंत उभाराकसबा बावडा येथे कचऱ्यावर कालबद्ध मर्यादित प्रक्रिया प्रकल्प उभाराकचऱ्यापासून खत किंवा वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करता येतील.जैव वैद्यकीय कचऱ्याचे शास्त्रीय निराकरण आवश्यकप्रदूषण मंडळाच्या निकषांप्रमाणेच इनर्ट मटेरिअल खणीत टाकण्यास मुभाइनर्ट मटेरिअलचे शास्त्रीय पद्धतीने निराकरणया मुद्द्यांआधारे २२ मे २०१५ च्या लवादाच्या निकालास अधिन राहून परवानगीशहरात रोज तयार होणाऱ्या १७० टन कचऱ्याचे निराकरण कसे करायचे, हा मनपा समोर मोठा प्रश्न आहे. लवादाच्या निर्णयामुळे ही कोंडी फुटली. झूम प्रकल्प येथे कचऱ्यापासून वीज निर्मितीच्या प्रकल्पास गती येईल. शास्त्रीय पद्धतीने टोप व राजारामपुरीतील टाकाळा येथील खणीत टाकून त्याचे निराकरण केले जाईल. - डॉ. विजय पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक, महापालिकासर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा टोप खण येथे कचरा टाकण्यावरून महापालिका आणि टोप ग्रामस्थ यांच्यातील उद्भवलेल्या प्रश्नावर लवादाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला. मात्र, या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची मुभा टोप ग्रामस्थांना असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.