शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

टोप खणीत कचरा टाकण्यास परवानगी; हरित लवादाचा निर्णय

By admin | Updated: July 8, 2015 00:41 IST

कचऱ्यावर प्रक्रिया करून राहिलेले घटक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार खणीत टाकावेत.

कोल्हापूर : टोप येथील खणीत शहरातील कचऱ्यापासून प्रक्रिया केल्यानंतर राहिलेले घटक (इनर्ट मटेरिअल) टाकण्यास मंगळवारी पुण्यातील हरित लवादाने महापालिकेला सशर्त परवानगी दिली. कसबा बावडा येथील घनकचरा प्रक्रिया केंद्र प्रकल्प वेळेत पूर्ण केल्यानंतरच टोप येथील खणीचा भूमी भरण केंद्र (लँड फिल्ड साईट) म्हणून महापालिकेला वापर करता येईल, अशी अट न्यायाधीश व्ही. आर. किंगावकर व तज्ज्ञ सदस्य अजय देशपांडे यांच्या खंडपीठाने निकालात नमूद केली. टोप येथील खणीचा ‘भूमी भरण क्षेत्र’ म्हणून उपयोग करण्यास टोपसह परिसरातील ग्रामस्थांचा विरोध आहे. शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. ‘भूमी भरण केंद्र’ म्हणून टोप येथील जागेची अत्यंत गरज आहे. ग्रामस्थांचे आक्षेप कायद्याला धरून नाहीत तसेच आधारहीन असल्याचे महापालिकेने सप्रमाण लवादास पटवून दिले. अंतिम निकाल देताना लवादाने २२ मे २०१५ रोजी दिलेल्या आदेशास अधीन ‘भूमी भरण केंद्र’ म्हणून टोप खण महापालिकेला सशर्त परवानगी देत आहे तसेच टोप ग्रामस्थांची याचिका खारीज केल्याची माहिती अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांनी दिली. लाईन बाजार येथील झूम प्रकल्पात कचऱ्यापासून खत निर्मिती तसेच जैव वैद्यकीय कचरा निर्मुलनसारखे प्रकल्प तत्काळ सक्षमपणे उभे करावेत. कचऱ्यावर प्रक्रिया करून राहिलेले घटक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार खणीत टाकावेत. खणीभोवती सहा फूट उंच भिंत उभारा, थेट कचरा टाकण्यास परवानगी दिली जाणार नाही, असेही लवादाने स्पष्ट केल्याचे सुतार यांनी सांगितले. याचिका खारीज केल्याची माहिती अ‍ॅड. धैर्यशील सुतार यांनी दिली. लाईन बाजार येथील झूम प्रकल्पात कचऱ्यापासून खत निर्मिती तसेच जैव वैद्यकीय कचरा निर्मुलनसारखे प्रकल्प तत्काळ सक्षमपणे उभे करावेत. कचऱ्यावर प्रक्रिया करून राहिलेले घटक प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार खणीत टाकावेत. खणीभोवती सहा फूट उंच भिंत उभारा, थेट कचरा टाकण्यास परवानगी दिली जाणार नाही, असेही लवादाने स्पष्ट केल्याचे सुतार यांनी सांगितले. निकालातील मुद्देभूमी भरण केंद्र म्हणून टोप खण मनपाच्या ताब्यातखणी भोवती सहा फूट भिंत उभाराकसबा बावडा येथे कचऱ्यावर कालबद्ध मर्यादित प्रक्रिया प्रकल्प उभाराकचऱ्यापासून खत किंवा वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करता येतील.जैव वैद्यकीय कचऱ्याचे शास्त्रीय निराकरण आवश्यकप्रदूषण मंडळाच्या निकषांप्रमाणेच इनर्ट मटेरिअल खणीत टाकण्यास मुभाइनर्ट मटेरिअलचे शास्त्रीय पद्धतीने निराकरणया मुद्द्यांआधारे २२ मे २०१५ च्या लवादाच्या निकालास अधिन राहून परवानगीशहरात रोज तयार होणाऱ्या १७० टन कचऱ्याचे निराकरण कसे करायचे, हा मनपा समोर मोठा प्रश्न आहे. लवादाच्या निर्णयामुळे ही कोंडी फुटली. झूम प्रकल्प येथे कचऱ्यापासून वीज निर्मितीच्या प्रकल्पास गती येईल. शास्त्रीय पद्धतीने टोप व राजारामपुरीतील टाकाळा येथील खणीत टाकून त्याचे निराकरण केले जाईल. - डॉ. विजय पाटील, मुख्य आरोग्य निरीक्षक, महापालिकासर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा टोप खण येथे कचरा टाकण्यावरून महापालिका आणि टोप ग्रामस्थ यांच्यातील उद्भवलेल्या प्रश्नावर लवादाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला. मात्र, या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची मुभा टोप ग्रामस्थांना असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.