शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

महामंडळ तारण्यासाठी हवी लोकचळवळ

By admin | Updated: November 20, 2014 00:04 IST

मागासवर्गीयांनी घ्यावा पुढाकार : ‘आपले झाले की भागले’ प्रवृत्ती कार्यकर्त्यांनी सोडावी

संदीप खवळे - कोल्हापूर -निधी नाही, पुरेसा कर्मचारी वर्ग नाही, राजकीय दबाव तर संपल्यातच जमा, ‘आपले झाले की भागले’ अशी सामाजिक कार्यकर्त्यांची भूमिका यांमुळे मागासवर्गीय महामंडळांची दुरवस्था झाली आहे. वर्षभर निधी नसल्यामुळे सर्वच महामंडळांनी नवीन प्रस्ताव स्वीकारणेच बंद केले आहे. नवीन सरकार विकासकामांच्या निधीलाच कात्री लावण्याच्या विचारात आहे. त्यामुळे ही महामंडळे तारण्यासाठी आता मागासवर्गीय समाजातून लोकचळवळ उभी राहणे गरजेचे आहे. नोव्हेंबरपर्यंत निम्मा निधी येणे अपेक्षित असताना अद्याप रुपयाचाही नवीन निधी आलेला नाही. शासनाच्या कात्री धोरणाची शिकार महामंडळे होऊ नयेत, अशी अपेक्षा महामंडळाच्या व्यवस्थापकांनी व्यक्त केली आहे. त्यात तथ्यही आहे. बहुतांश महामंडळांकडील योजना या आता बँकेच्या अर्थसाहाय्यावर अवलंबून आहेत. राष्ट्रीय मागासवर्ग विकास महामंडळाकडील योजना या ३१ मार्च, २००८ च्या कर्जमाफीनंतर रोडावल्या आहेत. या योजनांमधून थेट केंद्रीय महामंडळ आणि राज्य महामंडळाच्या माध्यमातून अर्थसाहाय्य होत असल्यामुळे याच योजना उद्योग उभारणीस पूरक आहेत. वाढत्या उत्पादनखर्चाचा विचार केला असता, किमान एक लाख कर्जाच्या योजना सर्वच महामंडळांनी राबविणे गरजेचे आहे. मागच्या वर्षीच्या प्रलंबित प्रकरणांमध्येच यावर्षीच्या प्रस्तावांची भर पडत आहे. त्यामुळे सर्वांनाच न्याय मिळेल, याची शाश्वती नाही. अशावेळी उद्दिष्टापेक्षा जास्त निधी प्राप्त करणे गरजेचे आहे. वसुली वाढविणे, योजनांसाठी सातत्याने पाठपुरावा करणे यापलीकडे व्यवस्थापक, तसेच विभागीय व्यवस्थापक काहीही करू शकत नाहीत. अशावेळी संबंधित समाजातूनच आता लोकचळवळ उभारणे गरजेचे आहे. महामंडळे ही सामाजिक न्यायाच्या संकल्पनेवर आधारित आहेत. मागासवर्गीयांच्या जीवनात या महामंडळांनी उद्यमशीलता रुजविली आहे. पद्मश्री पुरस्कार विजेत्या कल्पना सरोज या मुंबई येथील एका गारमेंट कारखान्यामध्ये काम करीत होत्या. टेलरिंग व्यवसायासाठी महामंडळाने दिलेल्या कर्जाचा लाभ घेत त्यांनी या व्यवसायात उत्तरोत्तर लक्षवेधक प्रगती केली. आज त्या मुंबई येथील कामानी ट्यूब या वार्षिक दहा कोटी नेटवर्थ असलेल्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. दलित उद्योजकांमधील कोट्यधीश उद्योजिका म्हणून सरोज यांचा नावलौकिक आहे. देशभरातील दलित उद्योजकांचा समावेश असलेल्या ‘डिक्की’ अर्थात दलित इंडियन चेंबर्स आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष मिलिंद कांबळे असोत वा कल्पना सरोज किंवा अन्य मागासवर्गीय उद्योजक असोत; त्यांच्या उद्यमशीलतेची पहिली पायरी मागासवर्गीय विकास महामंडळे आहेत. ही महामंडळे तरली पाहिजेत, त्यांना वेळेवर निधी मिळाला पाहिजे, यासाठी तमाम दलित आणि मागासवर्गीयांनी लोकचळवळी उभारल्या पाहिजेत. अन्यथा सहकार खात्याच्या वाट्याला आलेली दुरवस्था या महामंडळांच्या वाट्याला येण्यास वेळ लागणार नाही. (समाप्त)अर्जदार रडकुंडीलासंत रोहिदास चर्मकार महामंडळ असो किंवा इतर मागासवर्गीय विकास महामंडळ असो; शासनाने निधीच दिला नसल्यामुळे कार्यालय उघडून जुने हिशेब चाळत बसण्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही. निधी आला का याची विचारणा करून आता अर्जदारही अक्षरश: रडकुंडीला आले आहेत. वर्षभर निधी नसल्यामुळे महामंडळांनी नवीन प्रस्ताव स्वीकारणेच केले बंदनवीन सरकारकडूनही लवकरात लवकर निधीची शक्यता धूसरबहुतांश योजना या आता बँकेच्या अर्थसाहाय्यावर अवलंबून किमान एक लाख कर्जाच्या योजना राबविणे गरजेचे