शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
2
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
3
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
4
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
5
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
6
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
7
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
8
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
9
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
10
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
11
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
12
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
13
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
14
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
15
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
16
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
17
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
18
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
19
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
20
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार

वसंतदादा साखर कारखान्याला दंड

By admin | Updated: December 31, 2014 00:57 IST

चंद्रकांत पाटील : एफआरपी न देणाऱ्या राज्यातील १०५ कारखान्यांना नोटिसा

सांगली : गाळप परवाना नसताना येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम सुरू केल्याने त्यांना प्रतिटन १०० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. याबाबतची नोटीसही त्यांना बजावण्यात आली आहे, अशी माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज, मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, एफआरपी (कारखानानिहाय किमान वैधानिक दर) न देणाऱ्या राज्यातील १०५ कारखान्यांनाही नोटिसा बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, कारखान्यांशी आम्ही द्वेषबुद्धीने वागणार नाही; पण अनावश्यक लाडही करणार नाही. एका बाजूला सदाशिवराव मंडलिक, दिलीप वळसे-पाटील यांच्या कारखान्यांना चांगला दर देणे परवडते, तर इतर कारखान्यांना ते का जमत नाही? काही कारखान्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी बॅँकांमध्ये आहेत, तर वसंतदादा कारखाना कामगारांची देणी देऊ शकत नाही. या गोष्टींचा विचार झाला पाहिजे. तरीही कारखान्यांना मदत म्हणून खरेदी कराची सवलत आम्ही दिली. आता एफआरपीप्रमाणे दर देणे बंधनकारक आहे. हा दर दिला नाही, तर कारखान्यांना नोटिसा बजावून फौजदारी कारवाई केली जाईल. गळीत हंगाम सुरू होऊनही ज्यांनी वैधानिक दर दिलेला नाही, अशा राज्यातील १०५ कारखान्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. नोटिसा बजावूनही प्रतिसाद मिळाला नाही, तर आम्ही फौजदारी करू. वसंतदादा कारखान्याला गाळप परवानाच दिला नव्हता. त्यांनी तसाच कारखाना सुरू ठेवला आहे. त्यांना प्रतिटन १०० रुपये दंड लागू झाला आहे. त्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. (प्रतिनिधी)