शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

आधी घरफाळा भागवा, मगच मृत्यूचा दाखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:38 IST

कोल्हापूर : घरापासून स्मशानापर्यंत न्यायला शववाहिका मोफत, मृतदेह दहन मोफत, मृत्यूचा पहिला दाखला मोफत देण्यासारख्या मानवतावादी योजना राबविणाऱ्या महानगरपालिका ...

कोल्हापूर : घरापासून स्मशानापर्यंत न्यायला शववाहिका मोफत, मृतदेह दहन मोफत, मृत्यूचा पहिला दाखला मोफत देण्यासारख्या मानवतावादी योजना राबविणाऱ्या महानगरपालिका प्रशासनाने नुकताच एक अजब फंडा शोधून काढला असून, यापुढे जर तुम्हाला मृत्यूचा व जन्माचा दाखला पाहिजे असेल तर आधी घरफाळा भरण्याची सक्ती केली आहे. घरफाळा भरल्याखेरीज तुम्हाला जन्म अथवा मृत्यूचा दाखला मिळणार नाहीच; शिवाय कोणी कर्मचाऱ्याने मानवतेच्या दृष्टीने तो देण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

महानगरपालिका नागरी सुविधा केंद्रावर कोणी जन्म अथवा मृत्यूचा दाखला मागण्यास अर्ज करीत असेल तर त्या अर्जासोबत संबंधित व्यक्तीने चालू आर्थिक वर्षातील संपूर्ण घरफाळा भरला असल्याबाबतचा घरफाळा विभागाचा ना-हरकत दाखला असल्याशिवाय त्या नागरिकाचे जन्म अथवा मृत्यूचे दाखले मागणीचे अर्ज स्वीकारू नयेत, असा फतवा साहाय्यक आयुक्त विनायक औंधकर यांनी दि. १० डिसेंबरला काढला आहे. त्याची अंमलबजावणी सर्व नागरी सुविधा केंद्रांतून झाली आहे. घरफाळा भरला नसताना दाखले दिले तर महापालिकेचे आर्थिक नुकसान केल्याबद्दल महाराष्ट्र प्रांतिक महानगरपालिका अधिनियमाअन्वये शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा औंधकर यांनी कर्मचाऱ्यांना दिला आहे.

साहाय्यक आयुक्त औंधकर यांचा फतवा संताप आणणारा आहे. एकीकडे मानवतावादी दृष्टिकोनातून शववाहिका मोफत द्यायची, मृतदेह दहन मोफत करायचे, पहिला दाखला मोफत द्यायचा आणि दुसरीकडे घरफाळा भरला नाही म्हणून त्यांना दाखलाच द्यायचा नाही, ही अजब कल्पना नागरिकांच्या रोषाला कारणीभूत ठरणारी आहे.

अडवणूक करणारा फतवा मागे घ्या

नागरिकांची अडवणूक करणारा फतवा मागे घ्यावा, अशी मागणी मंगळवारी माजी नगरसेवक ईश्वर परमार यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली. घरफाळा वसुलीसाठी थेट कारवाई न करता नागरिकांची अशा प्रकारे अडवणूक होऊ लागल्यास त्यातून मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच पूर्ववत दाखले देण्याचा निर्णय घ्यावा, अशी विनंती परमार यांनी केली आहे.

मिळकत नाही; तरीही सक्ती !

ज्यांच्या नावावर मिळकत नाही, तरीही संबंधित व्यक्तीच्या नावाचा घरफाळा थकबाकी नसल्याचा ना-हरकत दाखला आणण्यासाठी नागरिकांना घरफाळा विभागात फेऱ्या माराव्या लागत आहेत. तेथे संबंधित कर्मचारी भेटतीलच याची शाश्वती नाही. ना-हरकत दाखला लगेच मिळेल असेही नाही. नागरिकांची त्यामुळे मोठी डोकेदुखी बनली आहे.