शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

विमानतळाच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट दर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:16 IST

उचगाव: उजळाईवाडी येथील विमानतळामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा व गडमडशिंगीमधील नवीन ६४ एकर जमीन संपादन करण्यात येत ...

उचगाव: उजळाईवाडी येथील विमानतळामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा व गडमडशिंगीमधील नवीन ६४ एकर जमीन संपादन करण्यात येत असून संबंधित जमीनधारकांना चालू बाजारभावाच्या पाचपट दर द्यावा, अशी मागणी करवीर शिवसेनेच्या वतीने उपतालुकाप्रमुख पोपट दांगट यांनी प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे केली.

करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नावडकर यांची गुरुवारी भेट घेऊन विमानतळासाठी जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या व स्थानिक भूमिपुत्रांना विमानतळामध्ये रोजगार उपलब्ध व्हावा, या मागणीबाबत चर्चा केली. विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी यापूर्वी सुमारे ७५० एकर जमीन संपादित केली आहे. आता पुन्हा गडमुडशिंगीमधील ६४ एकर जमीन संपादनाचे काम सुरू आहे. याप्रश्नी २४ ऑक्टोबर २०१८ रोजी शिवसेनेने विमान प्राधिकरण अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे. पण त्यावर काही कारवाई झाली नाही. विस्तारीकरणामध्ये गडमुडशिंगी, उंचगाव, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, नेर्ली, तामगाव, सांगवडे येथील शेतकऱ्यांच्या जमिनी व ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या शासकीय, गायरान जमिनी शासनाने यापूर्वी संपादन केल्या आहेत. या गावातील स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध झालाच पाहिजे.

गडमुडशिंगीमधील पुन्हा ६४ एकर जमीन संपादित करण्याचा घाट घातला आहे. तेथे १०० वर्षांपासून लक्ष्मीवाडी (मातंग) वसाहत आहे. तेथील नागरिकांना व ज्यांना नोटीस दिलेल्या आहेत त्यांना आजच्या चालू बाजारभावाच्या पाचपट दर मिळाला पाहिजे. संबंधितांना विश्वासात घेतल्याशिवाय व त्यांचे पुनर्वसन केल्याशिवाय, स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून लेखी हमी दिल्याशिवाय आम्ही जमीन संपादन प्रक्रिया होऊ देणार नाही, असा इशाराही पोपट दांगट यांनी दिला.

गडमुडशिंगीची विमान विस्तारीकरणात ज्यादा जमीन गेली आहे. स्थानिक नागरिकांच्या न्याय हक्कासाठी भूमिपुत्रांना विमानतळामध्ये रोजगाराचा विशेष राखीव कोटा ठेवावा. तसे न झाल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन घ्यावे लागेल, असा इशाराही तालुकाप्रमुख राजू यादव यांनी दिला. शिष्टमंडळात तालुका प्रमुख राजू यादव, विनोद खोत, संदीप दळवी, प्रफुल्ल घोरपडे, उत्तम आडसुळ, महादेव खोचगे, बाबुराव पाटील, बाळासाहेब नलवडे, राहुल गिरुले यांचा समावेश होता.

फोटो : १० उचगाव निवेदन

उजळाईवाडी विमानतळासाठी भूसंपादित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट दर द्या, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.