शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

विमानतळाच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट दर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:16 IST

उचगाव: उजळाईवाडी येथील विमानतळामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा व गडमडशिंगीमधील नवीन ६४ एकर जमीन संपादन करण्यात येत ...

उचगाव: उजळाईवाडी येथील विमानतळामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा व गडमडशिंगीमधील नवीन ६४ एकर जमीन संपादन करण्यात येत असून संबंधित जमीनधारकांना चालू बाजारभावाच्या पाचपट दर द्यावा, अशी मागणी करवीर शिवसेनेच्या वतीने उपतालुकाप्रमुख पोपट दांगट यांनी प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे केली.

करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नावडकर यांची गुरुवारी भेट घेऊन विमानतळासाठी जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या व स्थानिक भूमिपुत्रांना विमानतळामध्ये रोजगार उपलब्ध व्हावा, या मागणीबाबत चर्चा केली. विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी यापूर्वी सुमारे ७५० एकर जमीन संपादित केली आहे. आता पुन्हा गडमुडशिंगीमधील ६४ एकर जमीन संपादनाचे काम सुरू आहे. याप्रश्नी २४ ऑक्टोबर २०१८ रोजी शिवसेनेने विमान प्राधिकरण अधिकारी यांना मागण्यांचे निवेदन दिले आहे. पण त्यावर काही कारवाई झाली नाही. विस्तारीकरणामध्ये गडमुडशिंगी, उंचगाव, उजळाईवाडी, सरनोबतवाडी, नेर्ली, तामगाव, सांगवडे येथील शेतकऱ्यांच्या जमिनी व ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या शासकीय, गायरान जमिनी शासनाने यापूर्वी संपादन केल्या आहेत. या गावातील स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध झालाच पाहिजे.

गडमुडशिंगीमधील पुन्हा ६४ एकर जमीन संपादित करण्याचा घाट घातला आहे. तेथे १०० वर्षांपासून लक्ष्मीवाडी (मातंग) वसाहत आहे. तेथील नागरिकांना व ज्यांना नोटीस दिलेल्या आहेत त्यांना आजच्या चालू बाजारभावाच्या पाचपट दर मिळाला पाहिजे. संबंधितांना विश्वासात घेतल्याशिवाय व त्यांचे पुनर्वसन केल्याशिवाय, स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून लेखी हमी दिल्याशिवाय आम्ही जमीन संपादन प्रक्रिया होऊ देणार नाही, असा इशाराही पोपट दांगट यांनी दिला.

गडमुडशिंगीची विमान विस्तारीकरणात ज्यादा जमीन गेली आहे. स्थानिक नागरिकांच्या न्याय हक्कासाठी भूमिपुत्रांना विमानतळामध्ये रोजगाराचा विशेष राखीव कोटा ठेवावा. तसे न झाल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन घ्यावे लागेल, असा इशाराही तालुकाप्रमुख राजू यादव यांनी दिला. शिष्टमंडळात तालुका प्रमुख राजू यादव, विनोद खोत, संदीप दळवी, प्रफुल्ल घोरपडे, उत्तम आडसुळ, महादेव खोचगे, बाबुराव पाटील, बाळासाहेब नलवडे, राहुल गिरुले यांचा समावेश होता.

फोटो : १० उचगाव निवेदन

उजळाईवाडी विमानतळासाठी भूसंपादित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट दर द्या, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.