शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पावणेदोन लाख हेक्टरची धूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 01:05 IST

नसिम सनदी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : निसर्गाच्या अवकृपेला माणसाच्या बेदरकारपणाची जोड मिळाल्याने जमिनीची धूप होत असून, तिचे ...

नसिम सनदी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : निसर्गाच्या अवकृपेला माणसाच्या बेदरकारपणाची जोड मिळाल्याने जमिनीची धूप होत असून, तिचे अस्तित्वच संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. एकट्या कोल्हापूर जिल्'ाचा विचार करता, तब्बल पावणेदोन लाख हेक्टर जमिनीची धूप झाल्याचे मृदा सर्वेक्षण विभागाचे आकडे सांगतात.जिल्'ातील ४ लाख ५ हजार हेक्टर पिकाऊ जमिनीपैकी १ लाख ७२ हजार २७८ हेक्टरवरील जमिनीची धूप झाली आहे. राधानगरी, शाहूवाडी, चंदगड, आजरा, भुदरगड, पन्हाळा, गगनबावडा या सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या तालुक्यात धूप झालेल्या जमिनीचे प्रमाण मोठे आहे. जिल्'ात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी १७७२ मिलिमीटर पाऊस पडतो; पण गेल्या दोन वर्षांतही जुलै ते आॅगस्ट या दोनच महिन्यात ही सरासरी पूर्ण होताना दिसत आहे. चार महिन्यांचा पाऊस महिना दोन महिन्यांतच ढगफुटीसारखा पडत असल्याने पाण्याच्या लोंढ्याबरोबर माती वाहण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून जमिनी नापीक होण्याचे प्रमाण वाढले आहे.या निसर्गाच्या अवकृपेबरोबरच बेसुमार वृक्षतोड, अयोग्य रानबांधणी, पाण्याचा अतिवापर, पाणी मुरवण्याची व्यवस्था नसणे, आदी कारणांमुळे मातीचे कण जमिनीपासून वेगळे होऊन पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. जमिनीवरचा सुरुवातीचा १0 सेमी जाडीचा थर हा सर्वांत महत्त्वाचा घटक असतो. तथापि त्याच्या जपणुकीकडे दुर्लक्ष केल्याने जमिनीचे धूप होण्याचे प्रमाण वेगाने वाढत चालले आहे.झाडांची मुळे माती धरून ठेवतात; पण अलिकडे वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. डोंगररांगावरच झाडे कमी झाल्याने पडणारा पाऊस उतारावरून सखल भागाकडे वेगाने वाहत आहे. वाहताना सोबत मातीही वाहून जात आहे; त्यामुळेच अतिपाऊस पडणाºया प्रदेशात सुपीक माती जाऊन जमिनी उजाड होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. शेताच्या बांधावर छोटी-मोठी झाडे लावली जात होती, जमिनीची धारणक्षमता कमी झाल्याने बांधावरील वृक्षांचीही तोड झाली आहे. आज क्वचितच बांधावर झाडे दिसतात. तसेच रानबांधणी करताना बांधच नांगरून काढण्याचेही प्रमाण वाढले आहे. ट्रॅक्टरसारख्या मोठ्या यंत्रांनी जमिनीच्या खोलवर नांगरटी केल्या जात असल्याने सुपीक जमिनीचा थर विस्कटला जात आहे.नदीकाठावर प्रमाण जास्तनदीकाठावरील जमिनीची धूप होण्याचे प्रमाण जास्त आहे.बेट आणि गवतामुळे पुराच्या पाण्याचा वेग कितीही असला, तरी नदीचा काठ तुटत नसे. आता मात्र बेट खरवडून काढून टाकले गेले आहेत. गवताची कुरण काढून नदीकाठापर्यंत नांगरट करून उसाची शेती केली जात आहे; त्यामुळे पूर आला, की पाण्याच्या वेगवान प्रवाहाबरोबर सुपीक माती वाहून जात आहे.जमिनीचे धूप झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)तालुका क्षेत्रकरवीर ५८९0पन्हाळा १४२0७गडहिंग्लज ५६४९राधानगरी ३७८२0कागल ५५११गगनबावडा १0२५0तालुका क्षेत्रशाहूवाडी ३२८२५हातकणंगले ११४२३शिरोळ ५६६0भुदरगड १0७८४आजरा ११३४६चंदगड २0९0३