शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

पावणेदोन लाख हेक्टरची धूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 01:05 IST

नसिम सनदी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : निसर्गाच्या अवकृपेला माणसाच्या बेदरकारपणाची जोड मिळाल्याने जमिनीची धूप होत असून, तिचे ...

नसिम सनदी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : निसर्गाच्या अवकृपेला माणसाच्या बेदरकारपणाची जोड मिळाल्याने जमिनीची धूप होत असून, तिचे अस्तित्वच संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. एकट्या कोल्हापूर जिल्'ाचा विचार करता, तब्बल पावणेदोन लाख हेक्टर जमिनीची धूप झाल्याचे मृदा सर्वेक्षण विभागाचे आकडे सांगतात.जिल्'ातील ४ लाख ५ हजार हेक्टर पिकाऊ जमिनीपैकी १ लाख ७२ हजार २७८ हेक्टरवरील जमिनीची धूप झाली आहे. राधानगरी, शाहूवाडी, चंदगड, आजरा, भुदरगड, पन्हाळा, गगनबावडा या सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या तालुक्यात धूप झालेल्या जमिनीचे प्रमाण मोठे आहे. जिल्'ात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी १७७२ मिलिमीटर पाऊस पडतो; पण गेल्या दोन वर्षांतही जुलै ते आॅगस्ट या दोनच महिन्यात ही सरासरी पूर्ण होताना दिसत आहे. चार महिन्यांचा पाऊस महिना दोन महिन्यांतच ढगफुटीसारखा पडत असल्याने पाण्याच्या लोंढ्याबरोबर माती वाहण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातून जमिनी नापीक होण्याचे प्रमाण वाढले आहे.या निसर्गाच्या अवकृपेबरोबरच बेसुमार वृक्षतोड, अयोग्य रानबांधणी, पाण्याचा अतिवापर, पाणी मुरवण्याची व्यवस्था नसणे, आदी कारणांमुळे मातीचे कण जमिनीपासून वेगळे होऊन पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. जमिनीवरचा सुरुवातीचा १0 सेमी जाडीचा थर हा सर्वांत महत्त्वाचा घटक असतो. तथापि त्याच्या जपणुकीकडे दुर्लक्ष केल्याने जमिनीचे धूप होण्याचे प्रमाण वेगाने वाढत चालले आहे.झाडांची मुळे माती धरून ठेवतात; पण अलिकडे वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे. डोंगररांगावरच झाडे कमी झाल्याने पडणारा पाऊस उतारावरून सखल भागाकडे वेगाने वाहत आहे. वाहताना सोबत मातीही वाहून जात आहे; त्यामुळेच अतिपाऊस पडणाºया प्रदेशात सुपीक माती जाऊन जमिनी उजाड होण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. शेताच्या बांधावर छोटी-मोठी झाडे लावली जात होती, जमिनीची धारणक्षमता कमी झाल्याने बांधावरील वृक्षांचीही तोड झाली आहे. आज क्वचितच बांधावर झाडे दिसतात. तसेच रानबांधणी करताना बांधच नांगरून काढण्याचेही प्रमाण वाढले आहे. ट्रॅक्टरसारख्या मोठ्या यंत्रांनी जमिनीच्या खोलवर नांगरटी केल्या जात असल्याने सुपीक जमिनीचा थर विस्कटला जात आहे.नदीकाठावर प्रमाण जास्तनदीकाठावरील जमिनीची धूप होण्याचे प्रमाण जास्त आहे.बेट आणि गवतामुळे पुराच्या पाण्याचा वेग कितीही असला, तरी नदीचा काठ तुटत नसे. आता मात्र बेट खरवडून काढून टाकले गेले आहेत. गवताची कुरण काढून नदीकाठापर्यंत नांगरट करून उसाची शेती केली जात आहे; त्यामुळे पूर आला, की पाण्याच्या वेगवान प्रवाहाबरोबर सुपीक माती वाहून जात आहे.जमिनीचे धूप झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)तालुका क्षेत्रकरवीर ५८९0पन्हाळा १४२0७गडहिंग्लज ५६४९राधानगरी ३७८२0कागल ५५११गगनबावडा १0२५0तालुका क्षेत्रशाहूवाडी ३२८२५हातकणंगले ११४२३शिरोळ ५६६0भुदरगड १0७८४आजरा ११३४६चंदगड २0९0३