शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

शहर पोलिसांचा ‘एंट्री’साठी ‘पास’

By admin | Updated: April 27, 2015 00:19 IST

वाहनधारकांची लूट : शिस्तीच्या हवेवर वरकमाईचे मजले; पोलीस अधीक्षकांचे शहर वाहतूक शाखेला चौकशीचे आदेश

संतोष पाटील- कोल्हापूर    -वाहतूक कायद्यात न बसणाऱ्या वाहनास सांकेतिक भाषेत ‘पास’ देऊन २४ तास शहरात कुठेही, कसेही बिनदिक्कतपणे फिरण्याची ‘एंट्री’ पोलिसांकडूनच दिली जात आहे. संपूर्ण शहरात शिस्तीच्या नावाखाली दिवसभर ‘राबत’ असलेल्या या यंत्रणेने वरकमाईचे मोठे मजले रचले आहेत. विशेष म्हणजे वरिष्ठांची नजर चुकवीत पोलीस कर्मचाऱ्यांनी तयार केलेली ही साखळी थक्क करून सोडणारी आहे. खासगी प्रवासी वाहतूक गाड्या, विनापरवाना रिक्षा व जीप, नियम तोडणाऱ्या विद्यार्थी वाहतूक बसगाड्या, ओव्हरलोड व मल्टीअ‍ॅक्सल ट्रक, आदींचा कायद्याच्या नाकावर टिच्चून शहरात प्रवास सुरू आहे व त्यांचा हा प्रवास सुकर करण्यासाठी पोलिसांचीच एक टोळी कार्यरत आहे. मार्केट यार्ड येथे चिठ्ठीद्वारे पास देऊन वाहनांकडून पैसे उकळले जात असल्याची घटना एका वाहनधारकाने उघडकीस आणली. ही चिठ्ठी संबंधिताने पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांना ‘वॉटस्अ‍ॅप’वर पाठविली. पोलीस अधीक्षकांनी शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक आर. आर. पाटील यांना नेमका काय प्रकार आहे, हे पाहण्याचे तातडीने आदेश दिले. पाटील यांनी साहाय्यक निरीक्षक रमेश खुणे तत्काळ मार्केट यार्ड येथे पाठविले. याठिकाणी असलेल्या पोलिसांच्या टोळक्याने अपघाताची बातमी समजल्याने येथे आल्याचा खुलासा केला. मात्र, त्यांनी दिलेल्या त्या ‘चिठ्ठी’चा फोटो दाखविताच संबंधितांचे धाबे दणाणले. खुणे यांनी संबंधितांना समज देऊन त्याचा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे.जोतिबा व अंबाबाईच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने परजिल्ह्यातील व राज्यातील पर्यटक व भाविक जिल्ह्यात येत आहेत. जिल्हा सोडून दुसऱ्या क्रमांकाची गाडी दिसली की ‘शिट्टी’ वाजलीच म्हणून समजायची! अशा शिट्ट्या घालणाऱ्यांकडे लगेच संबंधित वाहनचालक धावत जाऊन तोडपाणी करतो. त्याला लगेच सांकेतिक भाषेतील ‘कार्ड’ सोपविले जाते. हा प्रकार राजरोजपणे सुरू आहे. पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा व आर. आर. पाटील यांची प्रतिमा अत्यंत विश्वासार्ह असूनही त्यांचे कनिष्ठ मात्र त्यांच्या उद्दिष्टांना हरताळ फासताना दिसत आहेत. अशी होते चिठ्ठीच्या पासची प्रक्रिया‘मार्शल’च्या नावाखाली चार-पाच पोलिसांचे टोळके चौकात उभे असते. वाहतूक कायद्यात न बसणारे सावज पद्धशीरपणे हेरले जाते. सुरुवातीस संबंधित वाहनधारकाने कायद्याचे उल्लंघन करीत केलेल्या चुकांचा पाढा वाचला जातो. यानंतर कायदेशीर कारवाईच्या भीतीने हबकलेल्या सावजाकडून ‘तोडपाणी’ची भाषा सुरू होते. १०० रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत हा व्यवहार ठरतो. यानंतर पावती म्हणून संबंधिताला साध्या कागदावर सांकेतिक भाषेत लिहिलेली चिठ्ठी दिली जाते. यावर त्या वाहनाचा क्रमांक व दिनांक नोंदविलेला असतो. ही चिठ्ठी म्हणजे शहरात पुढील २४ तासांत कुठेही फिरण्याचा जणू मुक्त परवानाच असतो! दुसऱ्या कोणी वाहतूक पोलिसाने अडविल्यास फक्त चिठ्ठी दाखवायची. बस्स...! यानंतर कोणीही वाहतूक कायद्याची भीती दाखविणार नाही, अशी हमीच ही चिठ्ठी देत असल्याचे चित्र आहे.वरकमाईचे ‘हॉट स्पॉट’पोलिसांसह आरटीओंच्या डोळेझाक पद्धतीमुळे शहराची वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस कोलमडत आहे. शहरातील अत्यंत गजबजलेली स्टेशन रोड ते ताराराणी चौक, मध्यवर्ती बसस्थानक व महालक्ष्मी चेंबर्स परिसर, भवानी मंडप, रंकाळा स्टॅँड परिसर, शिरोली, शिवाजी विद्यापीठ, फुलेवाडी, शिवाजी पूल ही शहरातील प्रवेशद्वारे शहर पोलिसांसाठी वरकमाईचे ‘हॉट स्पॉट’च आहेत. ५वाहनधारकांच्या अडवणुकीचे प्रकार घडल्याची तक्रार आल्यास तत्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. अशा स्वरूपाच्या अडवणुकीचे प्रकार समजल्यास नागरिकांनी तक्रारीसाठी पुढे यावे. त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल. संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. नागरिकांनी थेट संपर्क साधावा. - आर. आर. पाटील निरीक्षक, शहर वाहतूक शाखावरकमाईचे कुरण विनापरवाना जीप व रिक्षा - २५००बेशिस्त, रस्त्यावर थांबणाऱ्या लक्झरी गाड्या - २०० मल्टीअ‍ॅक्सल व ओव्हरलोड वाहने - १२००दररोज रस्त्यावर पार्किंग होणारी २० हजारांहून अधिक लहान-मोठी वाहनेकोल्हापुरातील शहर वाहतूक शाखेतर्फे अशा प्रकारे एंट्री पासचे वाटप सुरू आहे.