शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
2
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
3
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
4
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
5
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
6
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
7
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
8
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
9
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
10
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
11
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
12
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
13
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
14
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
15
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
16
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
18
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
19
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!

पक्ष स्थापन केल्यास सत्ता काबीज

By admin | Updated: October 10, 2016 01:04 IST

बी. जी. कोळसे-पाटील : मराठा समाजाने प्रस्थापित पक्ष, नेतृत्व झुगारावे

कोल्हापूर : तरुणांनी प्रस्थाापित नेतृत्व व पक्षाला झुगारून ‘मराठा सकल मोर्चा’चे रूपांतर राजकीय पक्षात करून लढा दिल्यास फक्त राज्याचीच नव्हे तर देशाची सत्ता मराठा समाज काबीज करील, असा आशावाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. कोल्हापुरात एका कार्यक्रमासाठी आले असता येथील बिंदू चौकातील ’भाकप’च्या कार्यालयात ते बोलत होते. माजी न्यायमूर्ती कोळसे-पाटील म्हणाले, भारताच्या राज्यघटनेच्या कलम १६ (४) प्रमाणे स्वतंत्र आयोग नेमून मराठा समाजाची वस्तुस्थिती मांडता येते. याद्वारे शैक्षणिकदृष्ट्या मराठा समाजाचा झालेला मागासलेपणा सिद्ध करता येतो. यापूर्वी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आजपर्यंत जे आयोग नेमले, त्यांनी ‘ओबीसी’मध्ये मराठा समाजाचा समावेश करावा, अशी शिफारस केली होती; पण मराठा समाजाच्या नेत्यांनी विरोध केल्यामुळे हे आरक्षण मिळू शकले नाही. माजी मुख्यमंत्री नारायण राणे समितीने दिलेला अहवालही परिपूर्ण नसल्यामुळे तो अडकला आहे. कलम १६ (४) प्रमाणे राज्य शासनाने इच्छाशक्ती व्यक्त केल्यास राज्य शासनात तसेच शिक्षणात आरक्षण मिळू शकते. मराठा ही जात सर्वसमावेशक असून तिच्याकडे असणारे नेतृत्वगुण इतर कोणत्याही पक्षात नाहीत असे सांगून माजी न्यायमूर्ती कोळसे-पाटील म्हणाले, मराठा जातीची संख्या हीच खरी ताकद आहे. इतर पक्षांत विखुरलेल्या ३५ टक्के मराठा समाजाला एका छताखाली संघटित करावे. मराठा समाजाने जातीच्या विकासाचा अजेंडा ठरवताना इतर सर्व जातीधर्मातील लहान भावंडांना न दुखावता आपल्या पंखाखाली घ्यावे. मराठ्यांनी इतर सर्व जातीला सत्तेत भागिदारी देऊन, त्यांच्या संख्येच्या प्रमाणात सर्व पदे सर्वांना दिली पाहिजेत. या समाजाने ‘मराठा सकल मोर्चा’चे राजकीय पक्षात रूपांतर केल्यास फक्त राज्याचीच नव्हे तर देशाचीही सत्ता काबीज करता येईल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी) राजकीय इच्छाशक्ती नाही कॉँग्रेस आणि भाजप हे दोन्हीही पक्ष एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी दोन्हीही पक्षांच्या नेत्यांची राजकीय इच्छाशक्ती नाही. त्यामुळे आजची ही परिस्थिती उद्भवली आहे, असेही ते म्हणाले.