शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सकल ब्राह्मण समाजाचाही सहभाग

By admin | Updated: October 9, 2016 01:33 IST

बैठकीत पाठिंब्याचा निर्णय : मोर्चावेळी पाणीवाटप करणार

कोल्हापूर : ‘सकल ब्राह्मण’ या झेंड्याखाली एकत्र आलेल्या कोल्हापुरातील कोकणस्थ, देशस्थ, कऱ्हाडे ब्राह्मण समाजाने शनिवारी मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. नुसत्या पाठिंब्यावरच न थांबता आवश्यकतेनुसार लागेल तिथे मदत करण्याबरोबरच मोर्चात पाणीवाटप करू, असेही यावेळी जाहीर करण्यात आले. बिनखांबी गणेश मंदिराशेजारी मंगलधाम ब्राह्मणसभा करवीर येथे सकल ब्राह्मण समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी निमंत्रक अ‍ॅड. राजेंद्र किंकर होते.कोकणस्थ, देशस्थ, कऱ्हाडे ब्राह्मण समाज हा ‘सकल ब्राह्मण’ या झेंड्याखाली एकत्र आला आहे. त्यासह ब्राह्मण समाजाशी संबंधित असणाऱ्या संस्था व संघटनांनी शनिवारी एकत्र येऊन बैठकीत मराठा मोर्चाला पाठिंबा जाहीर केला.अ‍ॅड. राजेंद्र किंकर म्हणाले, या मोर्चात ब्राह्मण समाज बहुसंख्येने सहभागी होणार आहे. सर्व समाजाने पाठिंबा दिला आहेच; परंतु आणखी काहीतरी नियोजन करता येते का, तेही पाहिले जाणार आहे.नगरसेवक अजित ठाणेकर यांनी अंबाबाई पुजारी मंडळातर्फे मोर्चातील लोकांना पाण्याची सोय करण्यात येईल, असे सांगितले.यावेळी अ‍ॅड. केदार मुनीश्वर, चित्पावन ब्राह्मण संघाचे अध्यक्ष नंदकुमार मराठे, परशुराम नागरी पतसंस्थेचे सचिव द. गो. कानिटकर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शाम जोशी, कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे कार्यवाह धर्मराज पंडित, करवीर निवासिनी ब्राह्मण पुरोहित संघाचे सुहास जोशी, आदींनी पाठिंबा जाहीर करून मनोगत व्यक्त केले. यावेळी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष डॉ. उदय कुलकर्णी, कार्यवाह श्रीकांत लिमये, आदी उपस्थित होते.कोल्हापुरातील मंगलधाम ब्राह्मणसभा करवीर येथे शनिवारी झालेल्या सकल ब्राह्मण समाजाच्या बैठकीत मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा जाहीर करण्यात आला.