शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
6
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
7
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
8
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
9
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
10
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
11
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
12
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
13
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
14
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
15
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
16
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
17
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
18
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
19
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
20
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले

‘परोली’ला बरगे नाहीत..पोळगाव रद्दच

By admin | Updated: December 16, 2014 23:53 IST

‘चित्री’वरील बंधाऱ्यांची अवस्था : ‘परोली’ पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरण होण्याची गरज

ज्योतिप्रसाद सावंत -आजरा तालुकावासीयांच्या योगदानातून उभारलेल्या ‘चित्री’ प्रकल्पांतर्गत आजरावासीयांकरिता बांधण्यात आलेल्या परोली बंधाऱ्यातील पाणी अडवण्याकरिता बरगेच नाहीत, तर पोळगाव बंधारा रद्दच झाल्याने चित्री प्रकल्पापासून सुमारे १२ कि. मी. अंतरावरील शेतकरी वर्गाला ऐन उन्हाळ्यात पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. चित्री प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांमधून याबाबत संताप व्यक्त होत आहे.आजमितीस चित्री प्रकल्पाचे काम शासनदरबारी ‘पूर्ण’ झाले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या रेट्याने पुनर्वसनाचा प्रश्नही मार्गी लागला आहे. शासनाकडून आता ‘चित्री’करिता असणारा निधीही बंद होण्याच्या मार्गावर आहे, असे असताना दहा वर्षांपूर्वी बांधलेल्या परोली बंधाऱ्यात पाणी अडविण्याकरिता बरगे नाहीत, अशी परिस्थिती असल्याने ‘चित्रीकाठी शेती; पण शेतीला चित्रीचे पाणी नाही’, अशी अवस्था शेतकरी वर्गाची आहे.दहा वर्षांपूर्वी २५ लाख रुपये खर्चून चित्री नदीवर परोली बंधारा बांधण्यात आला. चित्री मध्यम प्रकल्पापासून या बंधाऱ्यापर्यंत एकही बंधारा नाही. याच दरम्यान आजरा साखर कारखाना सुरू झाल्याने विशेषत: ऊस क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परोलीच्या अलीकडे पोळगाव बंधाराही बांधण्याचे नियोजन या प्रकल्पांतर्गत करण्यात आले होते; परंतु पोळगाव बंधाराच रद्द झाला .चित्रीच्या प्रवाहामध्ये असणारा सुमारे २० मीटरचा उतार परोली बंधाऱ्याशेजारील ३०० हेक्टर बागायत क्षेत्र पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे. उन्हाळ्यात वारंवार होणारे वीज भारनियमन व पाणी सोडल्यानंतर ते वापरात आणण्यापूर्वीच नदीपात्रात होणारा पाण्याचा खडखडाट यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. लाखो रुपये खर्चून बंधारा बांधला; परंतु पाच ते सात लाख रुपयांचे बरगे टाकलेले नसल्याने शेतकरी वर्ग मात्र अडचणीत येत आहे. पोळगाव बंधाऱ्याकरिता आणलेले बरगे शिल्लक असल्याचे समजते. ते बरगे वापरल्यास पाणीसाठा होऊ शकतो, अशी स्थिती आहे. आजरा शहराची नवीन पाणीपुरवठा योजनाही याच ठिकाणाहून सुरू आहे. यासाठी तातडीने परोली बंधाऱ्यामध्ये पाणी अडवण्याची गरज आहे.मागणी आहे, पण पाणी नाही‘चित्री’वर बी.ओ.टी.तत्त्वावर वीज निर्मिती केंद्र खासगी कंपनीने सुरू केले आहे. शेतकरी पाणी मागतात. धरणात पाणी असते, पण पाणी वाया जाण्याच्या भीतीने खासगी कंपनीकडून पाणी सोडण्यावर मर्यादा येताना दिसतात.‘पाटबंधारे’कडे हस्तांतरणाची गरजबंधाऱ्यात पुढील प्रश्न मार्गी लागण्यासाठी हा बंधारा पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरण होणे गरजेचे आहे, तशी माणगीही पाटबंधारे विभागाने वारंवार जलसंधारणकडे केली आहे; पण धड पाणीही साठवलेले नाही व धड हस्तांतरणही नाही, अशीच अवस्था आहे.चित्री प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याने चित्रीचा शासकीय निधी लवकरच बंद होणार आहे. निधी बंद झाल्यास पुन्हा परोली बंधाऱ्यात पाणी अडविण्यासाठी नव्याने प्रयत्न करावे लागणार आहेत.