शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
6
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
7
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
8
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
9
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
10
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
11
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
12
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
13
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
14
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
15
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
16
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
17
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
18
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
19
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
20
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला

‘परोली’ला बरगे नाहीत..पोळगाव रद्दच

By admin | Updated: December 16, 2014 23:53 IST

‘चित्री’वरील बंधाऱ्यांची अवस्था : ‘परोली’ पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरण होण्याची गरज

ज्योतिप्रसाद सावंत -आजरा तालुकावासीयांच्या योगदानातून उभारलेल्या ‘चित्री’ प्रकल्पांतर्गत आजरावासीयांकरिता बांधण्यात आलेल्या परोली बंधाऱ्यातील पाणी अडवण्याकरिता बरगेच नाहीत, तर पोळगाव बंधारा रद्दच झाल्याने चित्री प्रकल्पापासून सुमारे १२ कि. मी. अंतरावरील शेतकरी वर्गाला ऐन उन्हाळ्यात पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. चित्री प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांमधून याबाबत संताप व्यक्त होत आहे.आजमितीस चित्री प्रकल्पाचे काम शासनदरबारी ‘पूर्ण’ झाले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या रेट्याने पुनर्वसनाचा प्रश्नही मार्गी लागला आहे. शासनाकडून आता ‘चित्री’करिता असणारा निधीही बंद होण्याच्या मार्गावर आहे, असे असताना दहा वर्षांपूर्वी बांधलेल्या परोली बंधाऱ्यात पाणी अडविण्याकरिता बरगे नाहीत, अशी परिस्थिती असल्याने ‘चित्रीकाठी शेती; पण शेतीला चित्रीचे पाणी नाही’, अशी अवस्था शेतकरी वर्गाची आहे.दहा वर्षांपूर्वी २५ लाख रुपये खर्चून चित्री नदीवर परोली बंधारा बांधण्यात आला. चित्री मध्यम प्रकल्पापासून या बंधाऱ्यापर्यंत एकही बंधारा नाही. याच दरम्यान आजरा साखर कारखाना सुरू झाल्याने विशेषत: ऊस क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. परोलीच्या अलीकडे पोळगाव बंधाराही बांधण्याचे नियोजन या प्रकल्पांतर्गत करण्यात आले होते; परंतु पोळगाव बंधाराच रद्द झाला .चित्रीच्या प्रवाहामध्ये असणारा सुमारे २० मीटरचा उतार परोली बंधाऱ्याशेजारील ३०० हेक्टर बागायत क्षेत्र पिकविणाऱ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहे. उन्हाळ्यात वारंवार होणारे वीज भारनियमन व पाणी सोडल्यानंतर ते वापरात आणण्यापूर्वीच नदीपात्रात होणारा पाण्याचा खडखडाट यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. लाखो रुपये खर्चून बंधारा बांधला; परंतु पाच ते सात लाख रुपयांचे बरगे टाकलेले नसल्याने शेतकरी वर्ग मात्र अडचणीत येत आहे. पोळगाव बंधाऱ्याकरिता आणलेले बरगे शिल्लक असल्याचे समजते. ते बरगे वापरल्यास पाणीसाठा होऊ शकतो, अशी स्थिती आहे. आजरा शहराची नवीन पाणीपुरवठा योजनाही याच ठिकाणाहून सुरू आहे. यासाठी तातडीने परोली बंधाऱ्यामध्ये पाणी अडवण्याची गरज आहे.मागणी आहे, पण पाणी नाही‘चित्री’वर बी.ओ.टी.तत्त्वावर वीज निर्मिती केंद्र खासगी कंपनीने सुरू केले आहे. शेतकरी पाणी मागतात. धरणात पाणी असते, पण पाणी वाया जाण्याच्या भीतीने खासगी कंपनीकडून पाणी सोडण्यावर मर्यादा येताना दिसतात.‘पाटबंधारे’कडे हस्तांतरणाची गरजबंधाऱ्यात पुढील प्रश्न मार्गी लागण्यासाठी हा बंधारा पाटबंधारे विभागाकडे हस्तांतरण होणे गरजेचे आहे, तशी माणगीही पाटबंधारे विभागाने वारंवार जलसंधारणकडे केली आहे; पण धड पाणीही साठवलेले नाही व धड हस्तांतरणही नाही, अशीच अवस्था आहे.चित्री प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याने चित्रीचा शासकीय निधी लवकरच बंद होणार आहे. निधी बंद झाल्यास पुन्हा परोली बंधाऱ्यात पाणी अडविण्यासाठी नव्याने प्रयत्न करावे लागणार आहेत.