शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘निर्मल’चा पंचनामा : कार्यशाळेच्या उधळपट्टीवरून उपाध्यक्षांच्या प्रशासनास कानपिचक्या

By admin | Updated: February 7, 2015 00:23 IST

जिल्ह्यातील २६ गावे काही राजकीय विघ्नं आडवी आल्यामुळे निर्मल होत नसल्याचे चित्र आहे. अधिकाऱ्यांनी आता व्यवहार आणि नियम यांची सांगड घालून प्रयत्न करावेत.

कोल्हापूर : शिंगणापुरातील निवासी शाळेत कार्यशाळा घेतली असती तरी चालले असते. मला व अध्यक्षाला न विचारता रेसिडन्सी क्लबला कार्यशाळा आयोजित करून उधळपट्टी केलेल्या पैशातून एखादे गाव निर्मल झाले असते. कार्यशाळेस मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अविनाश सुभेदार गैरहजर राहतात हे दुर्दैव आहे, अशा शब्दात उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी शुक्रवारी प्रशासनास कानपिचक्या दिल्या.निमित्त होते, निर्मलग्राम व वार्षिक कृती आराखडा कार्यशाळेचे. ताराबाई पार्कातील रेसिडन्सी क्लबमध्ये आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील होत्या.उपाध्यक्ष खोत म्हणाले, जिल्ह्यातील २६ गावे काही राजकीय विघ्नं आडवी आल्यामुळे निर्मल होत नसल्याचे चित्र आहे. अधिकाऱ्यांनी आता व्यवहार आणि नियम यांची सांगड घालून प्रयत्न करावेत. केवळ नियमावर बोट ठेवल्यास शिल्लक गावे कधीही निर्मल होणार नाहीत. उपरोधिक शब्दात ‘निर्मल’चाच पंचनामा करताना सदस्य धैर्यशील माने म्हणाले, देशात पहिल्यांदा पन्हाळा तालुका निर्मल झाला. परंतु, अजूनही जिल्ह्यातील २६ गावे निर्मल झालेली नाहीत. ही गावे निर्मल व्हावीत यासाठी उघड्यावर शौचविधी करणाऱ्यावर गुन्हे दाखल केले. शासकीय सुविधा खंडीत केल्या. तरीही गावे निर्मल होत नाहीत. पोलिसांचा धाक दाखविल्यानंतर सुधारणा होते. मात्र, वारंवार गुन्हा करण्याची सवय झाली की अट्टल बनतो. अशी अवस्था २६ गावांची झाली आहे. माझ्या रूकडी गावासह २६ गावे ‘अट्टल’ बनली आहेत. कितीही अभ्यास केला तरी त्याच त्या वर्गात बसण्याची वेळ आली आहे. निर्मल झालेल्यांचा जशाचा तसा पेपर उतरून कॉपी केली तरी पास होत नाही. परीक्षणासाठी येणाऱ्या समितीनेच ही गावे निर्मल होऊ नयेत अशी मानसिकता केलेली दिसते. निर्मल गावातील ४० टक्के कुटुंबे पुन्हा उघड्यावर शौचविधी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई यांनी प्रास्ताविक केले. ग्रामीण विकास यंत्रणेचे सहायक संचालक पी. बी. पाटील यांचे भाषण झाले. कार्यशाळेस किरण कांबळे, शहाजी पाटील यांच्यासह सदस्य, सरपंच, ग्रामसेवक, अधिकारी उपस्थित होते. दुपारच्या सत्रात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन यावर मार्गदर्शन झाले. ( प्रतिनिधी )प्रशासन ' लक्ष्य 'निर्मल अभियानाला चालना मिळण्यासाठी कार्याशाळा आयोजित केली होती. मात्र निर्मलग्रामचा पंचनामा माने आणि खोत यांनी करीत प्रशासनाला ‘लक्ष्य’ केले. शिल्लक गावे निर्मल करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे, असे सांगण्यासही ते विसरले नाही.