शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
3
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
4
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
5
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
6
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
8
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
9
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
10
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
11
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
12
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
13
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
14
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
15
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
16
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
17
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
18
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
19
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
20
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल

नितीनच्या संसाराला आणली पाणीपुरीने टेस्ट, मूळचा कराडचा : नोकरीच्या मागे न लागता निवडला मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:16 IST

कोल्हापूर : पाणीपुरी, भेळ, रगडापुरी म्हटलं की उत्तर भारतीयांची मक्तेदारी असते. असला व्यवसाय मराठी माणसाने करणं म्हणजे कमीपणाचेच असते ...

कोल्हापूर : पाणीपुरी, भेळ, रगडापुरी म्हटलं की उत्तर भारतीयांची मक्तेदारी असते. असला व्यवसाय मराठी माणसाने करणं म्हणजे कमीपणाचेच असते हा मुळातच चुकीचा समज खोटा ठरवण्याचे काम मूळच्या कराड तालुक्यातील काले गावच्या तरुणाने केले आहे. नितीन काकासाहेब पाटील असे त्याचे नाव असून गेली पाच वर्षे तो येथील राजारामपुरीत सिटी हॉस्पिटलजवळ पाणीपुरी विकत असून त्यावर त्याचा संसाराचा गाडा उत्तम पद्धतीने सुरू आहे. कोणतेही काम हलके किंवा कमी दर्जाचे नसते याचेच प्रत्यंतर त्यातून येत आहे.

नितीन अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा. बारावीपर्यंत शिकला. नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडला. नातेवाईकांच्या मदतीने एका हॉस्पिटलमध्ये नोकरीला लागला. काही दिवसानंतर त्याचं मन नोकरीत रमेना, त्याने त्याच चौकात पाणीपुरी विक्रीस सुरुवात केली. सहाजिकच त्याला अनेक जणांनी हा उद्योग आपला नाही, यूपी, बिहारवरून आलोय का आपण? असे सल्ले, टोमणे दिले. पण नितीन ठाम होता. त्याने फेमस पाणीपुरी नावाने गाडा सुरू केला, गेली पाच वर्षे हा व्यवसाय निष्ठेने करतोय. त्याच्या पाणीपुरीला चवही चांगली आहे. अनेकजण त्याला विविध समारंभाच्या ऑर्डर्स देत आहेत. त्यातून त्याला चांगले कुटुंब चालवता येईल इतके पैसे मिळतात. सकाळी तयारी करून तो दिवसभर हा गाडा चालवतो. समाजात हल्ली अगदी शिपायाची तरी नोकरी लावा म्हणणारे अनेकजण भेटतात. मी काय करू कोणता उद्योग करू, मी हे कसं करू ते कसं करू, असं म्हणणारेही खूप आहेत. मात्र याच वयाच्या नितीन पाटीलने वेगळं धाडस केलं आणि ते यशस्वीही करून दाखवले.

फोटो : ०९०६२०२१-कोल-पाणीपुरी

कोल्हापुरातील राजारामपुरीतील सीटी हॉस्पिटलजवळ कराडजवळचा काले गावचा नितीन पाटील हा तरुण पाणीपुरीचा गाडा चालवून जीवनात स्थिरस्थावर झाला आहे.