शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

पंचगंगा धोक्याच्या खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिल्याने पुराचे पाणी हळूहळू ओसरु लागले आहे. पंचगंगा नदी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी दिवसभर पावसाची उघडीप राहिल्याने पुराचे पाणी हळूहळू ओसरु लागले आहे. पंचगंगा नदी धोका पातळीच्या खाली आली असून, राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. त्यामुळेही आता पुराचे पाणी कमी होण्यास मदत होणार आहे. पंचगंगेचे पाणी अजूनही अथांग पसरलेले आहे.

बुधवारी सकाळपासून उघडीप राहिली. काही तालुक्यात अधूनमधून जोरदार सरी कोसळत असल्या तरी त्याला जोर नव्हता. पावसाने उघडीप दिली असली तरी पुराचे पाणी संथ गतीने ओसरु लागले आहे. राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बुधवारी बंद झाल्याने भोगावती नदीत होणारा विसर्ग थांबला आहे. अद्याप ४७ बंधारे पाण्याखाली असून, या मार्गावरील वाहतूक विस्कळीत आहे.

पाऊस थांबल्याने पुराचे पाणी ओसरु लागले असले तरी अजूनही पंचगंगेचे पाणी अथांग पसरलेले आहे. पंचगंगेची धोका पातळी ४३ फूट असून, बुधवारी रात्री ४२.८ फुटापर्यंत पातळी आली होती.

पडझड अजूनही सुरूच

जिल्ह्यात पाऊस थांबला असला तरी सार्वजनिक व खासगी मालमत्तांची पडझड सुरूच आहे. बुधवारी एक सार्वजनिक व १३५ खासगी मालमत्तांची पडझड होऊन सुमारे ५५ लाख ७२ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

अद्याप पिके पाण्याखालीच

नदी व ओढ्याच्या काठावरील पिके अद्याप पाण्याखालीच आहेत. अनेक ठिकाणी ऊस, भात, सोयाबीन पिके कुजण्यास सुरुवात झाली असून, दुर्गंधी पसरु लागली आहे.

फोटो ओळी : कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस थांबला असला तरी महापुराचे पाणी हळूहळू ओसरत आहे. त्यामुळे पंचगंगेचे पाणी अजूनही अथांग पसरले आहे. (फोटो-२८०७२०२१-कोल-पंचगंगा महापूर) (छाया- आदित्य वेल्हाळ)