शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
2
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
3
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
4
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
5
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
6
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
7
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
8
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
9
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
10
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
11
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
12
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
13
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
14
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
15
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
16
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
17
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
18
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
19
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
20
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!

पंचगंगा पात्राबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढला असून, धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढला असून, धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू आहे. सोमवारी दुपारी राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने पाण्याचा विसर्ग वाढला आहे. त्यामुळे पंचगंगा नदीचे पाणी बाहेर पडले आहे.

रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. रात्रभर व सोमवारी दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत राहिल्या. धरण क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू आहे. सगळी धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने मोठा विसर्ग सुरू आहे. ‘राधानगरी’, ‘कासारी’, ‘पाटगाव’, ‘घटप्रभा’, ‘जांबरे‘, ‘कोदे’ या धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे. सोमवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत ‘कुंभी’ धरण क्षेत्रात तब्बल १८५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. राधानगरी धरणाच्या दोन स्वयंचलित दरवाज्यांतून प्रतिसेकंद ४२५६ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू होता. दुपारी आणखी दोन दरवाजे खुले झाल्याने ७११२ घनफूट विसर्ग सुरू झाला आहे. दूधगंगा धरणातून ५९००, वारणामधून ५४८२ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. भोगावतीसह पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पंचगंगा नदीची पातळी २९ फुटांवर पोहोचली असून, सोमवारी सायंकाळी पाणी पात्राबाहेर पडले आहे.

नदीकाठच्या शेतकऱ्यांची धाकधूक वाढली

यंदा नदीकाठच्या शेतकऱ्यांचे महापुराने मोठे नुकसान झाले आहे. सर्वच नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले असून, पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून ज्या पद्धतीने पाऊस कोसळत आहे ते पाहता नदीकाठच्या शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. महापुरात उसाच्या आडसाल लागणी गेल्या होत्या. त्यानंतर नव्याने लागणी केल्या असून, त्याही कुजण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे.

फोटो ओळी : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून, पंचगंगा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी सायंकाळी पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. (फोटो-१३०९२०२१-कोल-रेन) (छाया- नसीर अत्तार)