शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
3
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल अयशस्वी, तुर्कीचे ड्रोन पाडले"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
4
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
5
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
6
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
7
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
8
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
9
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
10
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
11
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
12
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
13
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!
14
भारत-पाकिस्तान डीजीएमओंची हॉटलाईन कनेक्ट होऊ शकली नाही; थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करणार
15
जग कधीच विसरू शकणार नाही विराट कोहलीचे हे 10 कसोटी विक्रम; कुण्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम
16
"मी विराटचे अश्रू पाहिलेत..."; 'किंग कोहली'च्या कसोटी निवृत्तीनंतर अनुष्का शर्माची भावनिक पोस्ट
17
स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर प्रतीकला दत्तक घेणार होती बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध जोडी! अभिनेत्याचा मोठा खुलासा 
18
'युद्ध रोमँटिक चित्रपट नाही, गंभीर मुद्दा आहे', माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांचे सूचक विधान
19
संरक्षण दलांसोबत अधिक समन्वयाने काम करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सुतोवाच
20
सेव्हिंग अकाऊंटमध्ये पैसे ठेवूनही मिळेल FD इतकं व्याज; फक्त करावं लागेल 'हे' महत्त्वाचं काम

पंचगंगा प्रदूषणावर मलमपट्टीच!

By admin | Updated: May 6, 2015 00:14 IST

दुखणे कायम : जयंती नाला थांबला; पण शहरातील इतर नाल्यांतून सुमारे ५० एमएलडी सांडपाणी थेट नदीत

कोल्हापूर : कोल्हापुरातील पंचगंगा नदी प्रदूषण हा कळीचा मुद्दा बनला असून, तो न्यायप्रविष्ठही आहे. न्यायालयाने स्थानिक प्रशासनास तसेच संबंधित आस्थापनांना प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजना करण्याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत, तरीही ढिलाई होताना दिसत आहे. निधी आहे, तर कामे संथगतीने सुरू आहेत. कोणाकडे निधी नसल्याने त्याच्या मागणीचे प्रस्ताव राज्य व केंद्र सरकारकडे पाठविले आहेत, परंतु त्याच्यासाठी पाठपुरावा होताना दिसत नाही. कोल्हापूरचे आमदार, खासदार, पालकमंत्र्यांनी या प्रश्नात विशेष लक्ष घातले आहे, असेही दिसत नाही. अशीच उदासीनता राहिली तर पंचगंगा प्रदूषणमुक्त होण्यास शंभर वर्षे लागतील हे मात्र नक्की! म्हणून या प्रश्नाकडे सरकारनेच आता गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. शहरातील ६० टक्के सांडपाणी वाहून नेणारा व पंचगंगा प्रदूषणाचा प्रमुख घटक असलेल्या जयंती नाल्यातील सांडपाणी एसटीपी प्रकल्पामुळे पंचगंगेत मिसळणे तूर्त थांबले आहे. मात्र, अद्याप दुधाळी, बापट कॅम्प, लाईन बझार हे ३० टक्के सांडपाण्याचे स्रोत मुक्तपणे पंचगंगेत मिसळत आहेत. त्यामुळे पंचगंगा प्रदूषणावर अद्याप मलमपट्टीच झाली आहे, असेच म्हणावे लागेल. कसबा बावडा व दुधाळी सांडपाणी प्रक्रिया केंद्रांसाठी (एसटीपी) शासनाकडून ७० कोटी रुपयांचा निधी मिळाला. उर्वरित ३० कोटी रुपयांचा निधी महापालिकेच्या स्वनिधीतील वापरून पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पाटर्नरशिप) तत्त्वावर दोन्ही केंद्रांची उभारणी केली जात आहे. गेल्या तीन वर्षांत बावडा केंद्राचे काम पूर्ण झालेले नाही. अद्याप बापट कॅम्प व लाईन बझार येथील नाल्यांवर बंधारा बांधणे, तसेच सांडपाण्याचा उपसा करून ते एसटीपी केंद्रात आणणे ही कामे बाकी आहेत, तर दुधाळी एसटीपी केंद्राचे कामास महिन्यापूर्वी मुहूर्त सापडला आहे. बावडा एसटीपीची क्षमता ७६ एमएलडीची (दशलक्ष लिटर) असूनही सांडपाणी वळविले नसल्याने फक्त जयंती नाल्यातील ६० एमएलडी पाण्यावरच प्रक्रिया केली जाते. अद्याप बापट कॅम्प व लाईन बझार नाल्यांतील पाणी वळविण्याचे काम पूर्ण झाले नसल्याने केंद्र पूर्ण क्षमतेने कधी सुरू होणार हे प्रशासनही ठामपणे सांगू शकत नाही. संपूर्ण शहरातील सांडपाणी वाहून नेणारे फुलेवाडी, रमणमळा, महावीर कॉलेज, जामदार क्लब, बुधवार पेठ, कावळा नाका, सीपीआर नाला, लाईन बझार, बापट कॅम्प, दुधाळी व जयंती नाला असे एकूण १२ नाले आहेत. त्यातील फक्त जयंती नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात मनपा प्रशासनाला यश आले आहे. दुधाळी नाल्यावर २६ कोटी रुपये खर्चून १७ एमएलडी क्षमतेचे एसटीपी केंद्र उभारण्याची प्रक्रिया प्राथमिक अवस्थेत आहे. उर्वरित नाल्यांतील पाणी वळवून जवळच्या केंद्रात नेण्यासाठी २६ कोटींची गरज आहे. सर्व नाल्यांतील पाण्याचा उपसा करून त्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया केल्याखेरीज पंचगंगेचे दुखणे कमी होणार नाही.