शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

पंचगंगा प्रदूषणावर मलमपट्टीच!

By admin | Updated: May 6, 2015 00:14 IST

दुखणे कायम : जयंती नाला थांबला; पण शहरातील इतर नाल्यांतून सुमारे ५० एमएलडी सांडपाणी थेट नदीत

कोल्हापूर : कोल्हापुरातील पंचगंगा नदी प्रदूषण हा कळीचा मुद्दा बनला असून, तो न्यायप्रविष्ठही आहे. न्यायालयाने स्थानिक प्रशासनास तसेच संबंधित आस्थापनांना प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजना करण्याबाबत सक्त सूचना दिल्या आहेत, तरीही ढिलाई होताना दिसत आहे. निधी आहे, तर कामे संथगतीने सुरू आहेत. कोणाकडे निधी नसल्याने त्याच्या मागणीचे प्रस्ताव राज्य व केंद्र सरकारकडे पाठविले आहेत, परंतु त्याच्यासाठी पाठपुरावा होताना दिसत नाही. कोल्हापूरचे आमदार, खासदार, पालकमंत्र्यांनी या प्रश्नात विशेष लक्ष घातले आहे, असेही दिसत नाही. अशीच उदासीनता राहिली तर पंचगंगा प्रदूषणमुक्त होण्यास शंभर वर्षे लागतील हे मात्र नक्की! म्हणून या प्रश्नाकडे सरकारनेच आता गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. शहरातील ६० टक्के सांडपाणी वाहून नेणारा व पंचगंगा प्रदूषणाचा प्रमुख घटक असलेल्या जयंती नाल्यातील सांडपाणी एसटीपी प्रकल्पामुळे पंचगंगेत मिसळणे तूर्त थांबले आहे. मात्र, अद्याप दुधाळी, बापट कॅम्प, लाईन बझार हे ३० टक्के सांडपाण्याचे स्रोत मुक्तपणे पंचगंगेत मिसळत आहेत. त्यामुळे पंचगंगा प्रदूषणावर अद्याप मलमपट्टीच झाली आहे, असेच म्हणावे लागेल. कसबा बावडा व दुधाळी सांडपाणी प्रक्रिया केंद्रांसाठी (एसटीपी) शासनाकडून ७० कोटी रुपयांचा निधी मिळाला. उर्वरित ३० कोटी रुपयांचा निधी महापालिकेच्या स्वनिधीतील वापरून पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पाटर्नरशिप) तत्त्वावर दोन्ही केंद्रांची उभारणी केली जात आहे. गेल्या तीन वर्षांत बावडा केंद्राचे काम पूर्ण झालेले नाही. अद्याप बापट कॅम्प व लाईन बझार येथील नाल्यांवर बंधारा बांधणे, तसेच सांडपाण्याचा उपसा करून ते एसटीपी केंद्रात आणणे ही कामे बाकी आहेत, तर दुधाळी एसटीपी केंद्राचे कामास महिन्यापूर्वी मुहूर्त सापडला आहे. बावडा एसटीपीची क्षमता ७६ एमएलडीची (दशलक्ष लिटर) असूनही सांडपाणी वळविले नसल्याने फक्त जयंती नाल्यातील ६० एमएलडी पाण्यावरच प्रक्रिया केली जाते. अद्याप बापट कॅम्प व लाईन बझार नाल्यांतील पाणी वळविण्याचे काम पूर्ण झाले नसल्याने केंद्र पूर्ण क्षमतेने कधी सुरू होणार हे प्रशासनही ठामपणे सांगू शकत नाही. संपूर्ण शहरातील सांडपाणी वाहून नेणारे फुलेवाडी, रमणमळा, महावीर कॉलेज, जामदार क्लब, बुधवार पेठ, कावळा नाका, सीपीआर नाला, लाईन बझार, बापट कॅम्प, दुधाळी व जयंती नाला असे एकूण १२ नाले आहेत. त्यातील फक्त जयंती नाल्यातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात मनपा प्रशासनाला यश आले आहे. दुधाळी नाल्यावर २६ कोटी रुपये खर्चून १७ एमएलडी क्षमतेचे एसटीपी केंद्र उभारण्याची प्रक्रिया प्राथमिक अवस्थेत आहे. उर्वरित नाल्यांतील पाणी वळवून जवळच्या केंद्रात नेण्यासाठी २६ कोटींची गरज आहे. सर्व नाल्यांतील पाण्याचा उपसा करून त्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया केल्याखेरीज पंचगंगेचे दुखणे कमी होणार नाही.