शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

लोकसहभागाने श्रमदानातून केला पाणंद रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:32 IST

गारगोटी : आज कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देश घरी बसून लॉकडाऊन करताना भुदरगड तालुक्यातील नवरसवाडी गावाने सोशल डिस्टन्सिंग पाळत ...

गारगोटी : आज कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देश घरी बसून लॉकडाऊन करताना भुदरगड तालुक्यातील नवरसवाडी गावाने सोशल डिस्टन्सिंग पाळत लोकसहभागातून मुख्य पाणंदसह इतर छोट्या पाणंद असा पाच किमी अंतराचा पाणंद रस्ता श्रमदानातून तयार केला आहे. या पाणंद रस्त्यामुळे गेल्या अनेक वर्षांची गावकऱ्यांची पायपीट संपुष्टात आली आहे.

घरेदारे बंद करून घरात बसून राहण्यापेक्षा गावचा विकास करूया या एकाच ध्येयाने गावकऱ्यांनी एकत्र येऊन गेल्या कित्येक दिवसांत गावकरी मागणी करत असलेला दोन किलोमीटरचा मुख्य पाणंद रस्ता व इतर पोट पाणंद रस्ते असे एकूण पाच किमी अंतराचा रस्ता श्रमदानातून तयार केला.

नवरसवाडी ता भुदरगड या डोंगर कपारीत वसलेल्या छोट्याशा गावाने ही किमया करून समाजमनाला एक आदर्श घालून दिला आहे.एक हजार लोकवस्ती असलेले मिणचे खोरीतील हे गाव ! पूर्वी या गावाला पाण्याचा कोणताच स्रोत उपलब्ध नसल्याने संपूर्ण जिराईत शेती होती. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने शेती निसर्गाधीन !, त्यामुळे या गावातील अनेक तरुण नोकरी धंद्यानिमित्त मुंबई, पुणे, इचलकरंजी,कोल्हापूर अशी शहरे जवळ करायचीत, काम केल्याशिवाय रात्री चूल पेटायची नाही,म्हणून श्रम आणि चिकाटी हे या गावाचे नेहमीच सद्गुण अंगी बाळगलेले. त्यामुळेच गेल्या वीस वर्षांत शिक्षणाला लोकांनी महत्त्व दिले. आज या छोट्याशा गावात अनेक पदवीधर,उद्योजक, सरकारी,खासगी नोकरदार आहेत. काहींनी सरकारी नोकरी व धंद्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. शिक्षणामुळे गावाचा, स्वतःचा, कुटुंबाचा आणि समाज व देशाचा विकास होतो,हे या गावाने कर्तृत्वाने सिद्ध केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शेतात जाण्यासाठी पाणंद रस्ता होत नव्हता. रस्त्यासाठी भूमी संपादन,रस्त्यासाठी निधी अशा अनेक अडचणी होत्या. पाणंद रस्ता नसल्यामुळे लोकांना पायपीट करावी लागत होती. लोकप्रतिनिधींकडे मागणी होत होती पण अडचणींमुळे रस्ता होत नव्हता. लॉकडाऊनमुळे गावाबाहेर असलेली सर्व गावकरी मंडळी गावाकडे आली आहेत. या मंडळींनी या लॉकडाऊनचा सदुपयोग करण्याचे ठरविले. यात काहींनी पुढाकार घेतला. शेत जमिनीतून परस्पर सामंजस्याने आखणी करण्यात आली. सरकारी मदतीशिवाय लोकसहभाग व श्रमदानातून बघता बघता एक आठवड्यात पाच किमी अंतराचा रस्ता तयार झाला. या रस्त्यामुळे गावाचे आणि शिवाराचे रुप पालटले. त्यामुळे गावात एक प्रकारचा सलोखा निर्माण झाला आहे. या छोट्याशा गावाने इतरांना एक चांगला आदर्शच घालून दिला.