शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

लोकसहभागाने श्रमदानातून केला पाणंद रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:32 IST

गारगोटी : आज कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देश घरी बसून लॉकडाऊन करताना भुदरगड तालुक्यातील नवरसवाडी गावाने सोशल डिस्टन्सिंग पाळत ...

गारगोटी : आज कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देश घरी बसून लॉकडाऊन करताना भुदरगड तालुक्यातील नवरसवाडी गावाने सोशल डिस्टन्सिंग पाळत लोकसहभागातून मुख्य पाणंदसह इतर छोट्या पाणंद असा पाच किमी अंतराचा पाणंद रस्ता श्रमदानातून तयार केला आहे. या पाणंद रस्त्यामुळे गेल्या अनेक वर्षांची गावकऱ्यांची पायपीट संपुष्टात आली आहे.

घरेदारे बंद करून घरात बसून राहण्यापेक्षा गावचा विकास करूया या एकाच ध्येयाने गावकऱ्यांनी एकत्र येऊन गेल्या कित्येक दिवसांत गावकरी मागणी करत असलेला दोन किलोमीटरचा मुख्य पाणंद रस्ता व इतर पोट पाणंद रस्ते असे एकूण पाच किमी अंतराचा रस्ता श्रमदानातून तयार केला.

नवरसवाडी ता भुदरगड या डोंगर कपारीत वसलेल्या छोट्याशा गावाने ही किमया करून समाजमनाला एक आदर्श घालून दिला आहे.एक हजार लोकवस्ती असलेले मिणचे खोरीतील हे गाव ! पूर्वी या गावाला पाण्याचा कोणताच स्रोत उपलब्ध नसल्याने संपूर्ण जिराईत शेती होती. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने शेती निसर्गाधीन !, त्यामुळे या गावातील अनेक तरुण नोकरी धंद्यानिमित्त मुंबई, पुणे, इचलकरंजी,कोल्हापूर अशी शहरे जवळ करायचीत, काम केल्याशिवाय रात्री चूल पेटायची नाही,म्हणून श्रम आणि चिकाटी हे या गावाचे नेहमीच सद्गुण अंगी बाळगलेले. त्यामुळेच गेल्या वीस वर्षांत शिक्षणाला लोकांनी महत्त्व दिले. आज या छोट्याशा गावात अनेक पदवीधर,उद्योजक, सरकारी,खासगी नोकरदार आहेत. काहींनी सरकारी नोकरी व धंद्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. शिक्षणामुळे गावाचा, स्वतःचा, कुटुंबाचा आणि समाज व देशाचा विकास होतो,हे या गावाने कर्तृत्वाने सिद्ध केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शेतात जाण्यासाठी पाणंद रस्ता होत नव्हता. रस्त्यासाठी भूमी संपादन,रस्त्यासाठी निधी अशा अनेक अडचणी होत्या. पाणंद रस्ता नसल्यामुळे लोकांना पायपीट करावी लागत होती. लोकप्रतिनिधींकडे मागणी होत होती पण अडचणींमुळे रस्ता होत नव्हता. लॉकडाऊनमुळे गावाबाहेर असलेली सर्व गावकरी मंडळी गावाकडे आली आहेत. या मंडळींनी या लॉकडाऊनचा सदुपयोग करण्याचे ठरविले. यात काहींनी पुढाकार घेतला. शेत जमिनीतून परस्पर सामंजस्याने आखणी करण्यात आली. सरकारी मदतीशिवाय लोकसहभाग व श्रमदानातून बघता बघता एक आठवड्यात पाच किमी अंतराचा रस्ता तयार झाला. या रस्त्यामुळे गावाचे आणि शिवाराचे रुप पालटले. त्यामुळे गावात एक प्रकारचा सलोखा निर्माण झाला आहे. या छोट्याशा गावाने इतरांना एक चांगला आदर्शच घालून दिला.