शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

लोकसहभागाने श्रमदानातून केला पाणंद रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:32 IST

गारगोटी : आज कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देश घरी बसून लॉकडाऊन करताना भुदरगड तालुक्यातील नवरसवाडी गावाने सोशल डिस्टन्सिंग पाळत ...

गारगोटी : आज कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देश घरी बसून लॉकडाऊन करताना भुदरगड तालुक्यातील नवरसवाडी गावाने सोशल डिस्टन्सिंग पाळत लोकसहभागातून मुख्य पाणंदसह इतर छोट्या पाणंद असा पाच किमी अंतराचा पाणंद रस्ता श्रमदानातून तयार केला आहे. या पाणंद रस्त्यामुळे गेल्या अनेक वर्षांची गावकऱ्यांची पायपीट संपुष्टात आली आहे.

घरेदारे बंद करून घरात बसून राहण्यापेक्षा गावचा विकास करूया या एकाच ध्येयाने गावकऱ्यांनी एकत्र येऊन गेल्या कित्येक दिवसांत गावकरी मागणी करत असलेला दोन किलोमीटरचा मुख्य पाणंद रस्ता व इतर पोट पाणंद रस्ते असे एकूण पाच किमी अंतराचा रस्ता श्रमदानातून तयार केला.

नवरसवाडी ता भुदरगड या डोंगर कपारीत वसलेल्या छोट्याशा गावाने ही किमया करून समाजमनाला एक आदर्श घालून दिला आहे.एक हजार लोकवस्ती असलेले मिणचे खोरीतील हे गाव ! पूर्वी या गावाला पाण्याचा कोणताच स्रोत उपलब्ध नसल्याने संपूर्ण जिराईत शेती होती. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने शेती निसर्गाधीन !, त्यामुळे या गावातील अनेक तरुण नोकरी धंद्यानिमित्त मुंबई, पुणे, इचलकरंजी,कोल्हापूर अशी शहरे जवळ करायचीत, काम केल्याशिवाय रात्री चूल पेटायची नाही,म्हणून श्रम आणि चिकाटी हे या गावाचे नेहमीच सद्गुण अंगी बाळगलेले. त्यामुळेच गेल्या वीस वर्षांत शिक्षणाला लोकांनी महत्त्व दिले. आज या छोट्याशा गावात अनेक पदवीधर,उद्योजक, सरकारी,खासगी नोकरदार आहेत. काहींनी सरकारी नोकरी व धंद्यात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. शिक्षणामुळे गावाचा, स्वतःचा, कुटुंबाचा आणि समाज व देशाचा विकास होतो,हे या गावाने कर्तृत्वाने सिद्ध केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शेतात जाण्यासाठी पाणंद रस्ता होत नव्हता. रस्त्यासाठी भूमी संपादन,रस्त्यासाठी निधी अशा अनेक अडचणी होत्या. पाणंद रस्ता नसल्यामुळे लोकांना पायपीट करावी लागत होती. लोकप्रतिनिधींकडे मागणी होत होती पण अडचणींमुळे रस्ता होत नव्हता. लॉकडाऊनमुळे गावाबाहेर असलेली सर्व गावकरी मंडळी गावाकडे आली आहेत. या मंडळींनी या लॉकडाऊनचा सदुपयोग करण्याचे ठरविले. यात काहींनी पुढाकार घेतला. शेत जमिनीतून परस्पर सामंजस्याने आखणी करण्यात आली. सरकारी मदतीशिवाय लोकसहभाग व श्रमदानातून बघता बघता एक आठवड्यात पाच किमी अंतराचा रस्ता तयार झाला. या रस्त्यामुळे गावाचे आणि शिवाराचे रुप पालटले. त्यामुळे गावात एक प्रकारचा सलोखा निर्माण झाला आहे. या छोट्याशा गावाने इतरांना एक चांगला आदर्शच घालून दिला.