शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

पालिका जनता दरबारला गदी

By admin | Updated: November 6, 2014 00:38 IST

सार्वजनिक बांधकाम विभागाबाबत सर्वाधिक अर्र्ज

कोल्हापूर : महानगरपालिकेशी निगडित असलेली कामे व तक्रारी यांच्या निरसनासाठी आज, बुधवारी आयोजित केलेल्या जनता दरबाराला नागरिकांनी गर्दी केली होती. यात एकूण ७३ अर्ज महापालिका प्रशासनाकडे दाखल झाले. यातील सर्वाधिक ३८ अर्ज सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित आहेत.महापालिकेकडून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी जनता दरबाराचे आयोजन केले जाते. या महिन्यातील मंगळवारी, काल, शासकीय सुटी होती. त्यामुळे जनता दरबार आज, बुधवारी आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी महापौर तृप्ती माळवी होत्या. राजर्षी छत्रपती शाहू सभागृहात सकाळी अकरा ते दुपारी दोनपर्यंत दरबार सुरू होता. यात एकूण ७३ अर्ज दाखल झाले. यात सार्वजनिक बांधकाम विभाग (३८ अर्ज), घरफाळा (६), पाणीपुरवठा (८), इस्टेट (४), सार्वजनिक आरोग्य (९), कामगार (२), प्रॉव्हिडंट फंड, परवाना, शिक्षण मंडळ, विद्युत, नगररचना, केएमटी विभागाशी संबंधित प्रत्येकी एका अर्जाचा समावेश होता. या दरबारात दाखल झालेल्या तक्रारींचे तातडीने निराकारण करण्यात यावे, अशा सूचना महापौर तृप्ती माळवी यांनी यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, उपमहापौर सचिन गोंजारे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, स्थायी समिती सभापती सचिन चव्हाण, परिवहन समिती सभापती वसंत कोगेकर, सभागृह नेता चंद्रकांत घाटगे, नगरसेवक महेश जाधव, सुभाष रामुगडे, उपायुक्त विजय खोराटे, अश्विनी वाघमळे, सहायक आयुक्त शीला पाटील, उमेश रणदिवे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)इच्छुकांकडून प्रशासन धारेवरयेत्या दहा महिन्यांत महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रभागातील समस्या घेऊन अनेक इच्छुकांनी आजच्या जनता दरबारासाठी हजेरी लावली होती. रस्ता, पाणी, कचरा, आदी प्रश्नांवर त्यांनी प्र्रशासनाला धारेवर धरले. समर्थकांसह आलेल्या इच्छुकांमुळे सभागृहात मोठी गर्दी झाली होती.