शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

पगाराविना दिवाळीत ‘शिमगा’

By admin | Updated: October 22, 2014 00:23 IST

तीन महिन्यांपासून परवड : मतिमंद, मूकबधिर शिक्षण संस्थांतील शिक्षकांसह २८८ जणांची अवस्था

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर  जिल्ह्यातील अंध, मूकबधिर, मतिमंद अशा अनुदानित शिक्षण संस्थांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह २८८ जणांची गेल्या तीन महिन्यांपासून पगारासाठी परवड सुरू आहे. कर्ज काढून संबंधित शिक्षकांना घर चालवावे लागत आहे. दिवाळी तोंडावर आल्यामुळे आता तरी थकीत पगार मिळणार का? असा सवाल शिक्षक उपस्थित करीत आहेत. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण प्रशासनाला उशिरा जाग येऊन आता पगार देण्यासाठी हालचाल सुरू केली आहे. दिवाळीच्याआधी पगार मिळाला तर संबंधित शिक्षकांची दिवाळी साजरी होणार आहे; अन्यथा पगारासाठी प्रशासनाच्या विरोधात त्यांना ‘शिमगा’ करावा लागणार आहे. काही मुले जन्मजातच विविध कारणांमुळे अंध, मूकबधिर, मतिमंद असतात. अशी मुले सर्वसाधारण मुलांच्या शाळांमध्ये शिक्षणाचे धडे घेत असताना त्यांना अनेक अडचणी येतात. अनेकवेळा सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शाळेत असे विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाहीत. परिणामी, शिक्षणापासून त्यांना वंचित राहावे लागते. अशा मुलांना सांभाळतानाही आई-वडिलांची दमछाक होत असते. शिक्षणापासून दूर राहिल्यास संबंधित मुलांचे भविष्यच अंधकारमय बनते. त्यामुळे जिल्ह्यात अंध, मूकबधिर, मतिमंद अशा मुलांसाठी स्वतंत्र शिक्षण संस्था निघाल्या. जिल्ह्यातील मूकबधिर ७, मतिमंद ७, अंध १, अशा १५ संस्थांना १९९६ साली शासनाकडून अनुदान मिळाले. त्यानंतर अशा संस्थांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना शासनाकडून पगार मिळू लागला. वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या संबंधित प्रत्येक विद्यार्थ्याला राहणे, जेवण, गणवेश यासाठी प्रत्येक महिना ९०० ते ९३० रुपये दिले जातात. हे पैसे, वेतन, वेतनेतर अनुदान देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे सोपवली आहे. परंतु, नेहमी तांत्रिक कारणे पुढे करीत समाजकल्याण प्रशासनाने पगार, अनुदान नियमित देण्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. महिना संपल्यानंतर पगार झाला नाही, तर संबंधित संस्थांचे प्राचार्य, अध्यक्ष समाजकल्याण विभागात चकरा मारीत विचारणा करतात, पाठपुरावा करतात. मात्र, तांत्रिक कारणे सांगून वेळ मारून नेली जाते. अंध, मूकबधिर, मतिमंद मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी त्यांना शिक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकांची परवड झाली आहे. शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे या शिक्षकांना वेळेवर पगार मिळत नसल्याने ऐन दिवाळीत त्यांच्या घरात अंधार असल्याची खंत व्यक्त होत आहे. आॅगस्टपासून शिक्षकांचे पगार झालेले नाहीत. प्रत्येक महिन्याला पगारासाठी पाठपुरावा करतो. कधीही वेळेवर पगार होत नाही. यामुळे शिक्षकांना कर्ज काढून घर चालवण्याची वेळ अनेकवेळा येते. दिवाळीपूर्वी थकीत असलेला सर्व पगार न मिळाल्यास आर्थिक समस्येला सामोरे जावे लागणार आहे. अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे वेळेवर पगार झाला पाहिले.- प्राचार्य एस. एस. कांबळे,चैतन्य मतिमंद शाळा, गडहिंग्लजगेल्या दोन दिवसांपासून पगार जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. नेमका किती महिन्यांचा पगार जमा केला, हे मोबाईलवरून सांगता येणार नाही. मात्र, पगार जमा केले जात आहेत.- एस. के. वसावे, समाजकल्याण अधिकारी