शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

पाडगावकरांचे कोल्हापूरशी जिव्हाळ्याचे नाते

By admin | Updated: December 31, 2015 00:42 IST

मंगेश पाडगावकर हे अत्यंत संवेदनशील व खऱ्या अर्थाने माणूसपण जपणारे साहित्यिक क्षेत्रातील एक तारा होते.

कवी मंगेश पाडगावकर यांनी मराठीत विविध स्वरूपी कविता लिहिल्या. सन १९६० नंतरच्या आधुनिक कवितेत रोमँटिक जाणीवेच्या प्रवाहातील ती एक महत्त्वाची कविता मानली गेली. काळाच्या टप्प्यांवर ती बदलतही राहिली. प्रेम, निसर्ग, सामाजिक व राजकीय जाणीवेची कविता त्यांनी लिहिली. बालकविता, वात्रटिका, भावगीते लिहिली. त्यांच्या सांस्कृतिक कामगिरीचे एक महत्त्वाचे वेगळेपण म्हणजे महाराष्ट्रभर त्यांनी कविता लोकप्रिय केली. त्यांच्या कवितासंग्रहाच्या पंधरा-वीस आवृत्त्या निघाल्या. त्यावरून या लोकप्रियतेचे स्वरूप ध्यानात येते. महाराष्ट्रातील अनेक गावांशी त्यांचा जसा काव्यवाचनाच्या निमित्ताने संबंध आला तसा तो कोल्हापूरशी देखील आला. या भूमीविषयी त्यांच्या मनात आदराची भावना वसत होती.सन १९६० च्या दशकानंतर विंदा करंदीकर, वसंत बापट आणि मंगेश पाडगावकर यांनी राज्यात काव्यवाचनाचे कार्यक्रम केले. या काळात ते कोल्हापुरात ते अनेकवेळा आले. विंदा करंदीकर हे येथील राजाराम महाविद्यालयात शिकले याचे पाडगावकर यांना मोठे कौतुक होते. शिवाजी विद्यापीठातदेखील पाडगावकर व्याख्यानानिमित्त आले होते. विद्यापीठाचे गीतही त्यांनी लिहिले होते. कोल्हापूर महापालिकेच्या व्याख्यानमालेअंतर्गत ते आले होते. केशवराव भोसले नाट्यगृहात त्यांची प्रकट मुलाखत झाली होती त्यावेळी सभागृह तुडुंब भरले होते. या मुलाखतीत त्यांनी बालपणापासूनच्या हृद्य आठवणी सांगितल्या. या कार्यक्रमानंतर त्यांनी अक्षरदालन ग्रंथ संग्रहालयास भेट दिली होती. कोल्हापुरातील विविध व्यक्तींशी ते संबंधित होते. कादंबरीकार बाबा कदम, कराडमधील श्रीनिवास कुलकर्णी यांच्या घरी हमखास जायचे. या दोन्ही कुटुंबीयांशी त्यांचे जवळचे संबंध होते. बऱ्याच वेळेस कादंबरीकार बाबा कदम यांच्या घरी ते मुक्कामाला असायचे. प्रा. गो. मा. पवार आणि डॉ. चंद्रशेखर जहागीरदार यांच्याकडे ते कार्यक्रमानिमित्ताने आल्यानंतर राहायचे. अरुण नाईक यांच्या विवाहास त्यांनी जे शुभेच्छा पत्र पाठविले होते. ते नाईक यांनी निमंत्रण पत्रिकेसाठी वापरले होते. आहार संस्कृती पाडगावकर यांचे खास असे प्रेम होते. मांसाहार विशेषत: मासे त्यांना आवडायचे. कोल्हापुरातही या प्रकारच्या भोजनाला ते अग्रक्रम द्यायचे. त्यांचे कोल्हापूरशी एक जिव्हाळ्याचे नाते होते. - प्रा. डॉ. रणधीर शिंदे (मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) मंगेश पाडगावकर यांचे कोल्हापूरशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी माझ्या ‘रातवा’ आत्मचरित्राचे कौतुक केले होते. ते कोल्हापुरातील कार्यक्रमांना आवर्जून यायचे. त्यांचे साहित्य पूर्वीच्या आणि नव्या पिढीला प्रेरणादायी आहे. मराठी साहित्यविश्वाला त्यांनी समृद्ध केले. कविता जगायला शिकविणारे आणि स्वत: कविता जगणारे असे ते कवी होते. त्यांच्या निधनामुळे साहित्यक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. - चंद्रकुमार नलगे, ज्येष्ठ साहित्यिककवी पाडगावकर हे रसरशीत आयुष्य जगले. ते ऊर्जेचा स्रोत होते. त्यांना भेटल्यानंतर आश्वासक वाटत होते. त्यांच्या कविता या सकारात्मकपणे जगायला शिकविणाऱ्या होत्या. त्यांच्या निधनामुळे अतीव दु:ख झाले आहे. - अरुण नाईक, साहित्यिककवी पाडगावकर हे माझ्या दृष्टीने प्रेमाचा वटवृक्ष होते. त्यांनी स्वत:वर प्रेम केले, तसेच इतरांवर प्रेम करायला शिकविले. त्यांच्या कविता मनाला भावणाऱ्या होत्या. त्यांच्या निधनामुळे प्रेमाच्या वटवृक्षाला आम्ही मुकलो आहोत.- निलांबरी कुलकर्णी, कवयित्रीमंगेश पाडगावकर हे अत्यंत संवेदनशील व खऱ्या अर्थाने माणूसपण जपणारे साहित्यिक क्षेत्रातील एक तारा होते. ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचा ‘हृदयस्पर्शी व्यासपीठा’तर्फे सत्कार केला होता. त्यांच्या कविता, साहित्य हे आजच्या पिढीला मार्गदर्शक ठरणारे आहे.- पद्माकर कापसे, अध्यक्ष, हृदयस्पर्शी हौशी सांस्कृतिक व्यासपीठ