शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

वळीव पावसाने भातपीक भुईसपाट , शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:10 IST

जोरदार वारा व विजेच्या कडकडासह रविवारी दुपारी झालेल्या दमदार वळीव पावसाने शिवारात पाणीच पाणी झाले. त्यामुळे कापणीयोग्य आलेले उन्हाळी ...

जोरदार वारा व विजेच्या कडकडासह रविवारी दुपारी झालेल्या दमदार वळीव पावसाने शिवारात पाणीच पाणी झाले. त्यामुळे कापणीयोग्य आलेले उन्हाळी भातपीक भुईसपाट झाले. या पिकाची अवस्था पाहून शेतकरी हवालदिल झाला आहे.

सावर्डे, मल्हारपेठ,मोरेवाडी, नवलेवाडी, वाघुर्डे आदी गावातील शेतकरी उन्हाळी भातपीक मोठ्या प्रमाणात घेतात. पावसाळ्यात पूरपरिस्थितीमुळे भातपिकांच्या उत्पादनाची हमखास खात्री नसते. त्यामुळे परिसरातील शेतकरी उन्हाळी भातपिकाची रोप लागण करतात. पावसाळ्यातील भातापेक्षा या उन्हाळी भाताचे उत्पादन भरघोस व खात्रीशीर मिळते. त्यामुळे या परिसरातील अनेक शेतकरी उन्हाळी भातपिकाकडे वळले आहेत.

काही शेतकरी दलदलीच्या क्षेत्रात लागवड करतात तर अनेक शेतकरी नदीकाठच्या सुपीक जमिनीत रोप लागण करून उत्पादन घेतात.

गेल्या पाच-सहा दिवसांपासून शेतकऱ्यांनी भातपीक कापणीस सुरुवात केलेली आहे. रविवारी दुपारी जोरदार वाऱ्यासह पावसाने सुरुवात केल्याने शिवारात पाणी तुंबून भातपीक भुईसपाट झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हा पाऊस हिरावून नेतो की काय अशी अवस्था झाली असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पावसाने भातपीक भुईसपाट झालेले आहे. त्यातच वाफ्यात पाणी तुंबल्याने भात कापणीस अडचण येत आहे. शिवाय हे भात वाफ्याबाहेर काढताना शेतकऱ्यांना जादा मजुरांची गरज भासत आहे. चिखलातून भात बाहेर काढताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.

भात कापून, झटपट मळणी करून चार दाणे सुखरूप घरी आणण्यासाठी शेतकरी सध्या शिवारात राबताना दिसत आहे. त्यामुळे सावर्डे परिसरात उन्हाळी भात कापणीची धांदल सुरू झालेली दिसत आहे.

फोटो ओळ : सावर्डे (ता. पन्हाळा) येथे रविवारी दुपारी झालेल्या वळीव पावसाने शिवारात पाणी झाल्याने कापणीयोग्य भात भुईसपाट झालेले आहे. या अवस्थेत शेतकरी चिखलातून भात कापणी करताना दिसत आहेत.