शहरं
Join us  
Trending Stories
1
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
2
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
3
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
4
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
5
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
6
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
7
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
8
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
9
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
10
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
11
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
12
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
13
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
14
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
15
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
16
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
17
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
18
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
19
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
20
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  

अकरावीच्या ‘ सीईटी ’ला अर्ज करण्याची गती वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:25 IST

कोल्हापूर : संकेतस्थळ बाबतची तांत्रिक अडचण दूर झाल्याने इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठीच्या सामाईक प्रवेश परीक्षेला (सीईटी) ऑनलाईन अर्ज करण्याची गती ...

कोल्हापूर : संकेतस्थळ बाबतची तांत्रिक अडचण दूर झाल्याने इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठीच्या सामाईक प्रवेश परीक्षेला (सीईटी) ऑनलाईन अर्ज करण्याची गती वाढली आहे. जिल्ह्यातील शासकीय, अनुदानित आणि खासगी तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) मधील प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मंगळवारपर्यंत एकूण २,९०० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ‘ आयटीआय ’ प्रवेशाच्या सविस्तर वेळापत्रकाची दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रतीक्षा लागली आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून तांत्रिक अडचण दूर झाली. त्यामुळे ‘ सीईटी ’ ला अर्ज करण्याची गती वाढली आहे. त्यातच कोल्हापूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाने चांगली उघडीप दिल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला आहे. जिल्ह्यात वीस पॉलिटेक्निक आहेत. तेथील प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. आतापर्यंत २,९०० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले असून त्यापैकी १,९०० जणांनी अर्ज निश्चितीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. अर्ज करण्याची मुदत शुक्रवार (दि. ३०) पर्यंत आहे. ही मुदत वाढण्याची शक्यता पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रियेचे कोल्हापूर जिल्ह्याचे नोडल ऑफिसर प्राचार्य प्रशांत पट्टलवार यांनी सांगितले. जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी आयटीआयमधील प्रवेशासाठी मंगळवारपर्यंत एकूण १,९२२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यातील १,६७१ जणांनी अर्जाची निश्चिती केली आहे. विद्यार्थ्यांनी आयटीआयच्या प्रवेश प्रक्रियेच्या सविस्तर वेळापत्रकाची प्रतीक्षा लागली आहे.

चौकट

बारावीच्या निकालाची तयारी अंतिम टप्प्यात

कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी बारावीच्या निकालासाठी अंतर्गत गुणांची माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिलेल्या संगणक प्रणालीमध्ये भरली आहे. सध्या विभागीय शिक्षण मंडळाच्या पातळीवर अहवाल तयार करण्याचे अंतिम टप्प्यातील काम सुरू आहे.

फोटो (२७०७२०२१-कोल-सीईटी एक्झाम) : इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठीच्या ‘सीईटी’ साठी ऑनलाईन अर्ज करण्यातील तांत्रिक अडचण दूर झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरातील विविध नेटकॅफेमध्ये अर्ज करण्यास दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे.