कोल्हापूर : जिल्हा न्यायालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय महालोक न्यायालयामध्ये जिल्ह्यातील सुमारे तीन हजारपेक्षा जास्त दिवाणी व फौजदारी प्रलंबित व दाखलपूर्व खटले निकाली काढत दहा कोटींची वसुली करण्यात आली. ‘सर्किट बेंच’प्रश्नी झालेल्या आंदोलनाचा परिणाम शहरामध्ये झाला. परंतु, तालुकास्तरावर मात्र महालोक न्यायालयात वकिलांसह पक्षकारांनी सहभाग नोंदविला. शुक्रवारी (दि. १२) ‘राष्ट्रीय महालोक न्यायालया’चे आयोजन केले होते. सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याकरिता न्यायाधीश, तज्ज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्त्यांचे मंडळ अशी ६१ पॅनेल तयार केली होती. त्यामध्ये दिवाणी व फौजदारीमधील प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे सहमतीने निकाली काढली. दाखलपूर्व खटले :- २२ हजार ७७निकाली १ हजार ९०४वसुली : ७६ लाख ९९ हजार ५६६प्रलंबित खटले :- ६ हजार २४१निकाली १ हजार ६८७वसुली : ४ कोटी ६७ लाख ४३ हजार ९७६धनादेश न वटणे :- प्रकरणे १२००निकाली ४० वसुली : ४ कोटी १४ लाख ३६ हजार ८७५
तीन हजार खटले निकाली
By admin | Updated: December 15, 2014 23:58 IST