शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

आमचे सरकार गेंड्याच्या कातडीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गारगोटी: ‘आमचे सरकार हे गेंड्याच्या कातडीचे असल्यामुळे शासनाला जाग आणण्यासाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला असून, जोपर्यंत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गारगोटी: ‘आमचे सरकार हे गेंड्याच्या कातडीचे असल्यामुळे शासनाला जाग आणण्यासाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला असून, जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला भरपाई मिळत नाही तोपर्यंत रास्ता रोको, धरणे यासारखी आंदोलने करावी लागतील, त्याशिवाय या सरकारला जाग येणार नाही,’ असा घरचा आहेर माजी आमदार के. पी. पाटील यांनी दिला.

ते गारगोटी येथे आयोजित केलेल्या आक्रोश मोर्चात बोलत होते. पाटबंधारे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मेघोली लघुपाटबंधारे प्रकल्प फुटून एका महिलेसह अनेक मुक्या जनावरांच्या जिवासह शेकडो हेक्टर शेती पिकाच्या झालेल्या नुकसानभरपाईच्या मागणीसाठी भुदरगड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, प्रहार संघटना, शेतकरी संघटना, कम्युनिस्ट पार्टी, भुदरगड संघर्ष समिती, बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांच्या वतीने आज सोमवारी शेतकरी आक्रोश मोर्चा भुदरगड तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आला. मोर्चाला श्री इंजुबाई देवालय पासून सुरुवात झाली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले.

मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची शासनाने त्वरित भरपाई द्यावी. शेकडो एकर शेतजमिनीवरील झालेल्या पिकाच्या नुकसानीसाठी शासनाने त्वरित मदत द्यावी. बेकायदेशीररीत्या चौकीदाराची बदली करून मेघोली धरणाला सहा महिने वाऱ्यावर सोडणाऱ्या अभियंता स्मिता माने यांचे तत्काळ निलंबन करावे. चौकीदाराच्या बदलीसाठी अधिकाऱ्यांच्यावर दबाव टाकणाऱ्या राजकीय पुढाऱ्र्याचे नाव जाहीर करा. जलसंपदा विभागाचे बेजबाबदार अधिकारी महेश सुर्वे, स्मिता माने ,संभाजी भोपळे, सौमित्र शिर्के यांना तत्काळ निलंबित करा आदी मागण्या केल्या.

माजी जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल देसाई, गोकूळचे संचालक रणजितसिंह पाटील,प्रा बाळ देसाई, बिद्रीचे संचालक मधुकर देसाई, के. ना. पाटील, तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार, प्रवीणसिंह सावंत, मच्छिंद्र मुगडे, युवराज येडुरे, सुनील कांबळे, सचिन घोरपडे, संग्राम देसाई, सरपंच संदेश भोपळे, उपसरपंच राहुल कांबळे उपस्थित होते.

फोटो ओळ

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळावी या मागणीसाठी तहसील कार्यालयावर काढलेल्या मोर्चात बोलताना माजी आमदार के. पी. पाटील, सोबत राहुल देसाई, बाळ देसाई, रणजित पाटील,मधुकर देसाई आदी उपस्थित होते.