शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

आमचे सरकार गेंड्याच्या कातडीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गारगोटी: ‘आमचे सरकार हे गेंड्याच्या कातडीचे असल्यामुळे शासनाला जाग आणण्यासाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला असून, जोपर्यंत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गारगोटी: ‘आमचे सरकार हे गेंड्याच्या कातडीचे असल्यामुळे शासनाला जाग आणण्यासाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला असून, जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला भरपाई मिळत नाही तोपर्यंत रास्ता रोको, धरणे यासारखी आंदोलने करावी लागतील, त्याशिवाय या सरकारला जाग येणार नाही,’ असा घरचा आहेर माजी आमदार के. पी. पाटील यांनी दिला.

ते गारगोटी येथे आयोजित केलेल्या आक्रोश मोर्चात बोलत होते. पाटबंधारे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मेघोली लघुपाटबंधारे प्रकल्प फुटून एका महिलेसह अनेक मुक्या जनावरांच्या जिवासह शेकडो हेक्टर शेती पिकाच्या झालेल्या नुकसानभरपाईच्या मागणीसाठी भुदरगड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, प्रहार संघटना, शेतकरी संघटना, कम्युनिस्ट पार्टी, भुदरगड संघर्ष समिती, बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांच्या वतीने आज सोमवारी शेतकरी आक्रोश मोर्चा भुदरगड तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आला. मोर्चाला श्री इंजुबाई देवालय पासून सुरुवात झाली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले.

मृत्युमुखी पडलेल्या जनावरांची शासनाने त्वरित भरपाई द्यावी. शेकडो एकर शेतजमिनीवरील झालेल्या पिकाच्या नुकसानीसाठी शासनाने त्वरित मदत द्यावी. बेकायदेशीररीत्या चौकीदाराची बदली करून मेघोली धरणाला सहा महिने वाऱ्यावर सोडणाऱ्या अभियंता स्मिता माने यांचे तत्काळ निलंबन करावे. चौकीदाराच्या बदलीसाठी अधिकाऱ्यांच्यावर दबाव टाकणाऱ्या राजकीय पुढाऱ्र्याचे नाव जाहीर करा. जलसंपदा विभागाचे बेजबाबदार अधिकारी महेश सुर्वे, स्मिता माने ,संभाजी भोपळे, सौमित्र शिर्के यांना तत्काळ निलंबित करा आदी मागण्या केल्या.

माजी जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल देसाई, गोकूळचे संचालक रणजितसिंह पाटील,प्रा बाळ देसाई, बिद्रीचे संचालक मधुकर देसाई, के. ना. पाटील, तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार, प्रवीणसिंह सावंत, मच्छिंद्र मुगडे, युवराज येडुरे, सुनील कांबळे, सचिन घोरपडे, संग्राम देसाई, सरपंच संदेश भोपळे, उपसरपंच राहुल कांबळे उपस्थित होते.

फोटो ओळ

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळावी या मागणीसाठी तहसील कार्यालयावर काढलेल्या मोर्चात बोलताना माजी आमदार के. पी. पाटील, सोबत राहुल देसाई, बाळ देसाई, रणजित पाटील,मधुकर देसाई आदी उपस्थित होते.