शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आमची युती ही शुभच

By admin | Updated: March 21, 2016 00:22 IST

हसन मुश्रीफ : गडहिंग्लज कारखाना निवडणूक; चन्नेकुप्पीत शेतकरी आघाडीचा मेळावा

गडहिंग्लज : आपण कुणाचाही विश्वासघात केलेला नाही. जागावाटपात तडजोड न केल्यामुळे प्रकाश चव्हाण व त्यांचे सहकारी आघाडीतून बाहेर गेले आहेत. शेतकरी व कामगारांच्या भल्यासाठीच जनता दल व राष्ट्रवादी एकत्र आली आहे, त्यामुळे चांगल्या हेतूने केलेली ही युती शुभच आहे, असे मत आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.चन्नेकुप्पी (ता. गडहिंग्लज) येथे आयोजित प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पांडुरंग चव्हाण होते. आमदार संध्यादेवी कुपेकर व माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.मुश्रीफ म्हणाले, चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनाही आघाडीत घेण्याचा आमचा प्रयत्न होता. मात्र, ते १० जागांच्या मागणीवर ठाम राहिल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार होता. त्यामुळेच त्यांची मागणी मान्य करता आली नाही.संग्रामसिंह नलवडे म्हणाले, स्व. कुपेकरांच्या प्रयत्नामुळे चित्री व फाटकवाडी प्रकल्प झाल्याने हिरण्यकेशी आणि घटप्रभा नदी बारमाही झाली. दीड लाख उसाचे उत्पादन १० लाख टनाच्या घरात गेले. मात्र, गाळपक्षमता न वाढल्यामुळे शेतकरी व कारखान्याची कोंडी झाली. गतवैभवासाठी कारखान्याच्या विस्तारीकरणाची गरज आहे.यावेळी उदय जोशी, रामराजे कुपेकर, अमर चव्हाण, बाळेश नाईक व सतीश पाटील यांचीही भाषणे झाली. रामाप्पा करिगार यांनी स्वागत केले. मेळाव्यास प्रा. स्वाती कोरी, बाबूराव चौगुले, बाळ पोटे-पाटील, अरविंद पाटील, आदींसह उमेदवार व पंचक्रोशीतील सभासद उपस्थित होते. बाळासाहेब मोर्ती यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)व्यक्तिगत बोलणे थांबवा; अन्यथा..!प्रचारात कुणावरही व्यक्तिगत टीकाटिप्पणी करायची नाही, अशी आपली भूमिका आहे. तरीदेखील काही मंडळी व्यक्तिगत टीका करीत आहेत. त्यांनी व्यक्तिगत निंदा-नालस्ती थांबवावी; अन्यथा आपल्यालाही बोलणे भाग पडेल, असा इशारा आमदार मुश्रीफ यांनी विरोधकांना दिला.जबाबदारी नको..पण ‘चावी’ पाहिजे !निवडून आल्यानंतर नियमाप्रमाणे शासनाला बंधपत्र द्यावे लागते. ते न दिल्यामुळे संचालक मंडळातून शहापूरकर कमी झाले. सत्तेची चावी पाहिजे; मात्र कारखान्याची जबाबदारी घेण्याची तयारी नाही, अशांना निवडणूक लढविण्याचा नैतिक अधिकार नाही, असा टोलाही शिंदे यांनी लगावला.‘भोगावती’ बिनविरोधसाठी ‘ए. वाय.’ यांचा पुढाकार सर्वांशी चर्चेची तयारी : जिल्हा बँक, विधानसभेच्या राजकारणाची किनारराजाराम लोंढे ल्ल कोल्हापूरपरिते (ता. करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याची आगामी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. त्यादृष्टीने त्यांनी हालचाली गतिमान केल्या असून, काँग्रेससह कारखान्यांशी संबंधित सर्वच घटकांशी चर्चा करण्याची तयारी त्यांनी केली आहे. ‘भोगावती’ करवीर व राधानगरी विधानसभा मतदारसंघांतील राजकारणाचा केंद्रबिंदू आहे. येथे गेली अनेक वर्षे काँग्रेसविरोधात शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस असाच सामना पाहावयास मिळत आहे. गतनिवडणुकीत राष्ट्रवादी व ‘शेकाप’ने एकत्रित येत आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह इतर पक्षांची मदत घेत काँग्रेसच्या सत्तेला सुरूंग लावला होता. गेल्या पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांच्या कारभाराला विरोध करण्याची एकही संधी काँग्रेसने सोडलेली नाही. वाढीव सभासद, कारखान्याचा कारभार व प्रशासक नियुक्तीबाबत दोन्ही काँग्रेसमध्ये न्यायालयीन लढाई सुरू आहे. त्यात भोगावती शिक्षण मंडळाच्या वादामुळे दोन्ही काँग्रेसमधील संबंध टोकाला गेले असतानाही साखर उद्योगासमोरील अडचणी, केंद्र व राज्य सरकारचे धोरण पाहता दोन्ही काँग्रेसमधील वाद संपवून निवडणूक बिनविरोध करावी, असा प्रयत्न ‘ए. वाय.’ यांचा आहे. कारखान्याच्या राजकारणांत दोन्ही काँग्रेसचे ताणलेले संबंध पाहता, बिनविरोध निवडणूक अशक्य वाटत असली, तरी यास जिल्हा बँकेच्या राजकारणाची किनार या घडामोडी आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ‘ए.वाय.’ यांना राधानगरीतून बिनविरोध करण्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे योगदान फार मोठे आहे. करवीरमधून ‘पी.एन.’ यांना बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीने पुढाकार घेत चंद्रदीप नरके यांची समजूत काढली होती. दोन्ही कॉँग्रेसचे जरी मिटले तरी ‘शेकाप’ची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. एकंदरीत ‘बिनविरोध’साठी अडचणी अधिक असल्या तरी सर्वच नेत्यांनी मनावर घेतले तर अशक्यही नाही. विधानसभेचा अनुभव पाठीशी!काँग्रेस-राष्ट्रवादीच्या भांडणात विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा फायदा झाला. ‘करवीर’मध्ये राष्ट्रवादीच्या सहकार्याने चंद्रदीप नरके पुन्हा आमदार झाले तर राधानगरीमध्ये काँग्रेसच्या सहकार्याने प्रकाश आबीटकर यशस्वी झाले; पण आता दोन्ही कॉँग्रेसच्या नेत्यांना या चुका कळल्याने ‘भोगावती’मध्ये तडजोड करावी, असा मतप्रवाह दोन्ही काँग्रेसमधील काही कार्यकर्त्यांचा आहे. सरकारच्या धोरणाने साखर कारखानदारी अडचणीत आली आहे. अशा परिस्थितीत संस्था वाचविण्यासाठी सर्व मतभेद विसरून बिनविरोध करण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. काँग्रेस, शेकाप, शिवसेनेसह सर्वच घटकांशी चर्चा करून प्रस्ताव देणार आहे. जिल्हा बँक बिनविरोध झाल्याने आपल्यावरील जबाबदारी वाढली असून, जागा किती मिळणार हे आमच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही. - ए. वाय. पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया ठरलेली असते. ‘गोड’ साखर कारखान्यासाठी पाचशे अर्ज दाखल झाले, हा अनुभव पाठीशी असताना बिनविरोध करतो म्हणणे सोपे नाही; पण कारखान्याच्या हितासाठी तशी परिस्थिती निर्माण झाली तर ‘शेकाप’ त्यात सहभागी होईल. - संपतराव पवार, माजी आमदारगेल्या सहा वर्षांतील कारभार व कारखान्याची आर्थिक स्थिती पाहता ‘भोगावती’ ला चांगल्या प्रशासनाची गरज आहे. बिनविरोध अथवा निवडणुकीबाबत सभासदांना विश्वासात घेतल्याशिवाय बोलणे उचित ठरणार नाही. - उदयसिंह पाटील-कौलवकर, नेते, काँग्रेस