शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा खरेदी कर वसूल करू

By admin | Updated: January 16, 2016 00:15 IST

विपीन शर्मा : सॉफ्ट लोनच्या व्याजातील सवलतही काढून घेतली जाईल

कोल्हापूर : निर्यातीचा निर्णय घेतल्यानेच बाजारातील साखरेचे दर वाढत आहेत; पण कारखान्यांना ठरवून दिलेल्या कोट्यानुसार निर्यात केली जात नसल्याचे निदर्शनास आले असून, याबाबत केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवर गांभीर्याने विचारविनिमय सुरू आहे. जे कारखाने साखर निर्यात करणार नाहीत, त्यांच्याकडून खरेदी कर वसूल केला जाणारच; त्याबरोबरच सॉफ्ट लोनच्या व्याजातील सवलतही काढून घेतली जाईल, असा इशारा साखर आयुक्त विपीन शर्मा यांनी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींना दिला. राज्यातील साखर हंगामाची आढावा बैठक पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅँकेत शुक्रवारी झाली. यावेळी त्यांनी कारखाना प्रतिनिधींना धारेवर धरले. गत हंगामातील थकीत एफआरपीसाठी बारा कारखान्यांचे परवाने रद्द केले आहेत. २२ जानेवारीपर्यंत पूर्तता करणाऱ्यांचा परवाना पुढे कायम करू. काही कारखाने परवाना न घेताच सुरू झाले आहेत, त्यांना नोटिसा काढल्या आहेत. साखरेच्या अतिरिक्त उत्पादनामुळे केंद्र सरकारने निर्यातीचा निर्णय घेतला, प्रत्येक कारखान्याला कोटा दिला. त्यामुळे बाजारातील साखरेचे दर वाढले. दुष्काळामुळे पुढील हंगामात साखरेचे उत्पादन कमी होणार असल्याने साखरेला चांगला भाव मिळू शकतो, म्हणून काही कारखान्यांनी निर्यात केलेली नाही, पण सगळ्यांनीच असा विचार केला, तर पुढील हंगामात उत्पादन कमी होऊनही दर कोसळतील, अशी भीती शर्मा यांनी व्यक्त केली. निर्यातीबाबत पंतप्रधान कार्यालय गंभीर असून, कारखान्यांचा प्रतिसाद पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही, निर्यात केली नाही तर सरकारला हस्तक्षेप करावा लागेल असा इशारा दिला आहे. त्यामुळे निर्यातीबाबत केंद्र व राज्य सरकार फारच गंभीर आहे हे लक्षात ठेवा. जे कारखाने निर्यात करणार नाहीत, त्यांच्याकडून खरेदी कर वसूल केला जाईल. तसेच शासनाच्या सवलती रद्द करून मागील हंगामात दिलेले सॉफ्ट लोनचे व्याज सरकार भरणार नाही. याबाबत आठवड्यात अहवाल द्या. अडचणीच्या काळात सरकारने एवढी मदत करूनही कारखानदार आदेशाचे पालन करणार नसतील तर सरकार पुन्हा दारात उभे करून घेणार नाही, अशा शब्दांत विपीन शर्मा यांनी कारखानदारांचा समाचार घेतला. बैठकीला साखर संचालक किशोर तोष्णीवाल यांच्यासह सहकारी व खासगी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)‘त्या’ कारखान्यांची जप्तीमागील हंगामातील ‘एफआरपी’प्रमाणे पैसे शेतकऱ्यांना न देणारे व यंदाच्या हंगामात बंद असणाऱ्या कारखान्यांची जप्ती प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यातून शेतकऱ्यांचे पैसे दिले जातील, असे आयुक्तांनी सांगितले. सुनावणी नाही; थेट कारवाईचसाखरेचे दर कमी असल्याने ८०:२० फॉर्म्युला करून शेतकऱ्यांचे पैसे देण्याचा निर्णय घेतला. तरीही कारखान्यांना नोटिसा काढून पैसे देण्याबाबत सांगावे लागते. आता तर साखरेचे दर वाढले आहेत. बॅँकेच्या उचलीत वाढ झाली नसली, तरी कारखान्यांच्या पातळीवर तडजोड करून शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत. आता सुनावणी घेणार नाही, थेट कारवाईच करणार, असा इशारा आयुक्त शर्मा यांनी दिला.