शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

अन्यथा अजित पवारांच्या कार्यालयासमाेर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:24 IST

कोल्हापूर : बहुतांशी ग्रामपंचायतींनी अजूनही किमान वेतनाचा हिस्सा आणि राहणीमान भत्ता दिलेला नाही. शासन निर्णय होऊनही त्याची शंभर ...

कोल्हापूर : बहुतांशी ग्रामपंचायतींनी अजूनही किमान वेतनाचा हिस्सा आणि राहणीमान भत्ता दिलेला नाही. शासन निर्णय होऊनही त्याची शंभर टक्के अंमलबजावणी होत नाही. जर ही मागणी मान्य झाली नाही तर अर्थमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कामगार संघाच्यावतीने देण्यात आला.

आयटक संलग्न या संघाच्यावतीने जिल्हा परिषदेवर मोठा मोर्चा काढण्यात आला. टाऊन हाॅलमधून या मोर्चाला सुरुवात झाली. ‘या सरकारचे करायचं काय, खाली डोकं वर पाय’, ‘कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’ अशा घोषणांनी हा परिसर दणाणून गेला. प्रत्येक तालुक्याचा फलक लावून बाराही तालुक्यांतील ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाले.

नामदेव गावडे, रघुनाथ कांबळे शिवाजी पाटील, सम्राट मोरे, रवी कांबळे, बबन पाटील, मदन निकम, दिनेश चौगले, पांडुरंग दळवी, भिकाजी कुंभार यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. या सर्वांनी यावेळी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांच्याशी मागणीनिहाय चर्चा केली.

चौकट

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या

१ २८ एप्रिल २०२० ज्या शासन निर्णयामध्ये ग्रामपंचायतीची उत्पन्नाची अट कायम ठेवल्याने १०० टक्के वेतन मिळण्यास अडथळा.

२ किमान वेतनाचा उर्वरित हप्ता आणि राहणीमान भत्ता मिळावा

३. अनेक ग्रामपंचायतींनी भविष्य निर्वाह निधीच्या रकमा भरलेल्या नाहीत.

४. सेवा पुस्तके पूर्ण भरलेली नाहीत.

५. कोविड काळातील प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही.

६ .कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण मिळालेले नाही.

चौकट

मग अंमलबजावणी का होत नाही

यातील अनेक मुद्द्यांबाबत जिल्हा परिषदेने वारंवार ग्रामपंचायतींना कळविले असल्याचे अरुण जाधव यांनी आंदोलनकर्त्यांच्या प्रतिनिधींना सांगितले. मग तुमच्या आदेशांची अंमलबजावणी का होत नाही असा सवाल नामदेव गावडे यांनी उपस्थित केला. तुम्ही ज्या मागण्या केल्या आहेत. त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक परिपत्रक तातडीने काढण्यात येईल. याबाबत नियमित आढावा घेण्यात येईल असे आश्वासन जाधव यांनी दिले.

२४०९२०२१ कोल ग्रामपंचायत मोर्चा

कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत कामगार संघाच्यावतीने शुक्रवारी विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. (आदित्य वेल्हाळ)