शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय शेती शेतकऱ्याचं आरोग्य हाती

By admin | Updated: February 28, 2017 00:42 IST

सांगरूळच्या राहुल खाडे यांची शेती : वाढत्या खर्चावर ‘झिरो बजेट’चा प्रभावी तोडगा

सायनिक खतांच्या माऱ्यामुळे जमिनीबरोबर माणसांचेही आरोग्य अडचणीत आले आहे. यासाठी सेंद्रिय शेती हाच एकमेव पर्याय असला तरी ही शेती परवडणारी नसल्याने अनेकांनी दोन-तीन वर्षांनंतर पुन्हा रासायनिक शेतीचा मार्ग अवलंबला आहे; पण करवीर तालुक्यातील सांगरूळ येथील राहुल विलास खाडे यांनी नफा-तोट्याचा विचार न करता तब्बल नऊ वर्र्षे ‘झिरो बजेट’ शेतीचा प्रयोग यशस्वीपणे राबविला आहे. खाडे यांचे संपूर्ण क्षेत्र नदीबुडीत असल्याने दोन वर्षांतून उसाचे एक पीक घेता येते. पुराच्या पाण्याने आठ-दहा दिवस तळ ठोकला तर उसाच्या पोकळ कांड्याच पदरात पडतात. यासाठी त्यांनी सेंद्रिय शेतीचा पर्याय निवडला. देशी गायीचे दूध व मलमूत्र दोन्ही आरोग्यवर्धक आहे. खाडे यांनी औदुंबर (जि. सांगली) येथून पहिली देशी गाय खरेदी करून तिच्या माध्यमातून पंधरा गुंठ्यांत सेंद्रिय शेतीस सुरुवात केली. नऊ फुटांची सरी सोडून त्यात उसाची रोपे लावली. दोन सरींमधील मोकळ्या जागेत वांगी, श्रावण घेवडा, मेथी, पोकळा अशा भाजीपाल्याचे पीक घेतले. त्यातून सुमारे पंचवीस हजारांचे उत्पन्न मिळविले. रोपे स्वत: तयार केल्याने पाणी वगळता एक रुपयाचाही खर्च यासाठी झाला नाही. भाजीपाला घेतल्यानंतर आता त्यांनी मोकळ्या पट्ट्यात कोबी, मूग, उडीद घेतला आहे. कोबी, मूग, उडदाच्या पेरणीनंतर २१ दिवसांनी त्याचे शेंडे खुडल्याने रोपाला चांगला फुटवा फुटला आहे. मोकळ्या पट्यामुळे सूर्यप्रकाश व मोकळी हवा राहत असल्याने उसाचे पीक जोमात आले आहे. त्यात ठिबकने पाणीपुरवठा असल्याने पिकाला गरजेपुरतेच पाणी मिळते. देशीचे गाईचे मलमूत्र, शेण, गूळ व डाळीच्या पिठापासून तयार केलेले ‘जीवामृत’ याचा वापर केल्याने पिकांच्या अंगात अधिक रोगप्रतिकारक शक्ती येते. परिणामी पीक पुराच्या पाण्यात जरी राहिले तरी उसाच्या वजनात फारसा फरक पडत नाही.खाडे गेली नऊ वर्षे अशा प्रकारे शेती करीत असल्याने जमीन नेहमीच भुसभुसीत राहते. पाण्याचा फेर कितीही लांबला तरीही जमिनीला भेगा पडत नाहीत आणि पीक वाळतही नाही, इतकी ताकद जमिनीच्या अंगात आली आहे. आगामी काळात शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती केली तरच माणसांबरोबर जमिनीच्या आरोग्याबरोबर आयुष्य वाढण्यास मदत होणार आहे. राहुल सेंद्रिय गूळाची निर्मिती करीत केवळ गुळावर न थांबता गुळाची पावडर करून तिची निर्यात करण्याचा राहुल यांचा मानस आहे. रासायनिक खतांचा मारा करीत प्रत्येकजण उत्पन्नवाढीचा प्रयत्न करु लागल्याने आपल्याबरोबर जमिनीचेही आयुष्य कमी झाले आहे. यासाठी सेंद्रिय शेती हाच पर्याय असून, नोकरीप्रमाणे शेतीकडे लक्ष दिले तर निश्चितच ही शेती फायदेशीर ठरू शकते. - राहुल खाडे (प्रगतशील शेतकरी) आंतरपीक म्हणूनच ऊसउसाच्या पिकात आंतरपीक म्हणून भाजीपाला व कडधान्य घेणारे अनेक शेतकरी आपण पाहतो; पण ऊस अठरा महिन्यांनी तुटणार आणि विसाव्या महिन्यांत पैसे हातात येणार यापेक्षा ताजे पैसे देणारी कडधान्ये, भाजीपाला पिकविला तर तो अधिक फायदेशीर ठरतो. म्हणून उसाला आंतरपीक म्हणून घेण्याची किमया खाडे यांनी केली. पंधरापैकी जेमतेम पाच गुंठेच उसाची लावणी आहे. कृषी पदवीधारकापेक्षाही अधिक ज्ञान राहुल खाडे यांचे वय जेमतेम ३२ वर्षे आणि शिक्षणही दहावी-बारावीपर्यंतच आहे. त्यांनी शेतीमध्ये स्वत:ला अक्षरश: वाहून घेतल्याने त्यांच्याकडे सेंद्रिय शेतीचे ज्ञान कृषी पदवीधरापेक्षही अधिक आहे. घरात सेंद्रिय भाजीपाला, धान्यासह सगळेच पदार्थ वापरत असल्याने पाच-सहा वर्षांत दवाखान्याकडे ते फिरकले नसल्याचे त्यांनी सांगितले. $$्निराजाराम लोंढे, कोल्हापूर