शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

काळम्मावाडी ग्रामपंचायतीला विरोध

By admin | Updated: December 8, 2015 00:43 IST

उदगाव ग्रामस्थांचा निर्णय : शासनाच्या अधिसूचनेवर हरकती घेणार

संतोष बामणे -- जयसिंगपूर --उदगाव (ता. शिरोळ) येथे दूधगंगा प्रकल्पग्रस्तांची काळम्मावाडी वसाहत म्हणून अस्तित्वात असली तरी शासनाच्या नव्या धोरणानुसार काळम्मावाडी वसाहतीसाठी नवे गाव म्हणून ओळख होणार आहे. मात्र, नव्या गावाच्या शासन धोरणाला खुद्द काळम्मावाडी वसाहतीतील ग्रामस्थांचा विरोध मोठ्या प्रमाणात होत आहे. उदगाव येथे दूधगंगा प्रकल्पग्रस्तांची काळम्मावाडी वसाहत अनेक वर्षांपासून स्थापन झाली आहे. या उदगाव गावच्या कार्यक्षेत्रात गेल्या दोन वर्षांपूर्वी संभाजीपूर परिसराचा भाग होता. मात्र, उदगाव गावचा विस्तार वाढल्याने स्वतंत्र संभाजीपूर ग्रामपंचायत अस्तित्वात आली आहे. सध्या उदगाव कार्यक्षेत्रात दूधगंगा प्रकल्पग्रस्तांची काळम्मावाडी वसाहत आहे. या वसाहतीच्या परिसराला उदगाव ग्रामपंचायतीकडून नागरी सुविधा पुरविल्या जात आहेत. परंतु, शासनाच्या नव्या धोरणानुसार काळम्मावाडीच्या परिसराला स्वतंत्र ग्रामपंचायतीचे रूप देण्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. या पुनर्वसित वसाहतीचे महाराष्ट्र शासनाकडून महसुली गाव म्हणून जाहीर करण्याबाबत अधिसूचना जाहीर झाली असून, येत्या २३ डिसेंबरपर्यंत शासनाने हरकती मागविण्यात आल्या आहेत. याबाबत उदगाव ग्रामपंचायतीसह तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयास जाहीर अधिसूचनाचे पत्र उपलब्ध झाले आहे. उदगाव ग्रामपंचायतीकडून काळम्मावाडी वसाहतीमधील ८५० नागरिकांकरिता आरोग्य उपकेंद्र नव्याने उपलब्ध करून देण्यात आले आहे. शिवाय पाणी, वीज, रस्ते यासह मूलभूत सुविधा उदगाव ग्रामपंचायतीने उपलब्ध केल्या आहेत. तसेच उदगाव ग्रामपंचायतीचे सरपंचपदही काळम्मावाडी वसाहतीमधील महिला भूषवित आहे. मग या काळम्मावाडी वसाहतीसाठी स्वतंत्र ग्रामपंचायत का? कशासाठी? असा सवाल करून खुद्द काळम्मावाडी वसाहतीमधील नागरिक करीत असून, यास तीव्र विरोध दर्शविला आहे. जनमताचा कौल लक्षात घेऊन शासनाने स्वतंत्र काळम्मावाडी ग्रामपंचायत अस्तित्वात आणण्यापेक्षा उदगाव ग्रामपंचायतीला जादा निधी देऊन गावच्या विकासाला चालना द्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. त्यामुळे ८५० लोकसंख्या असलेल्या उदगाव काळम्मावाडी वसाहतीला महसुली गाव म्हणून जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयाला ग्रामस्थांचा विरोध मात्र तीव्र आहे.संभाजीपूरनंतर आता पुन्हा उदगाव हद्दीत असणारा काळम्मावाडी वसाहतीचा परिसर स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या मंजुरीच्या टप्प्यात आहे. त्यामुळे उदगाव ग्रामपंचायतीचे महसुली व कर रूपाने जमा होणारे लाखो रुपयांचे उत्पन्न घटणार आहे. शिवाय ल. क. अकिवाटे औद्योगिक वसाहतही त्यात असल्यामुळे ग्रामपंचायतीला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. उदगाव ग्रामपंचायतीने सन्मानाचे सरपंचपद आमच्या वसाहतीला दिले आहे. शिवाय सर्व सोयीसुविधा ग्रामपंचायतीने दिल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीत स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्यास ग्रामस्थांचाच विरोध आहे. शासनाने जनतेचा लोकभावनेचा विचार करून स्वतंत्र ग्रामपंचायत करू नये.- स्वाती पाटील, सरपंच, उदगावउदगाव ग्रामपंचायतीकडून सर्व सुविधा काळम्मावाडी वसाहतीला मिळत आहेत. गतवर्षी ग्रामपंचायतीच्या सभेत या वसाहतीचे स्वतंत्र ग्रामपंचायतीमध्ये रूपांतर करण्यास विरोध करणारा ठराव झाला आहे. तसेच या वसाहतीला स्वतंत्र ग्रामपंचायतीची गरज नसून, शासनाकडे हरकती दाखल करणार आहोत. - संजय पाटील, माजी उपसरपंच, उदगावशासनाच्या नव्या धोरणानुसार काळम्मावाडीच्या परिसराला स्वतंत्र ग्रामपंचायतीचे रूप देण्याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. येत्या २३ डिसेंबरपर्यंत शासनाने याबाबत नागरिकांकडून हरकती मागविल्या आहेत.याबाबत खुद्द काळम्मावाडी वसाहतीमधील नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. जादा निधी देवून उदगावलाच चालना देण्याची मागणी