शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

भविष्यात ‘हौसिंग फायनान्स’ला संधी

By admin | Updated: September 29, 2015 23:54 IST

वसंत जुगळे : ‘रवळनाथ’तर्फे आजऱ्यात व्याख्यान

आजरा : वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरणीय संतुलनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून शहराकडे होणारे मोठ्या लोकसंख्येचे स्थलांतर थांबविण्याची गरज आहे. त्यासाठी शहरी नागरी सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याची गरज आहे. किंबहुना सरकारचेही हेच धोरण असल्यामुळे भविष्यकाळात ग्रामीण हौसिंग फायनान्सला अधिक संधी आहे, असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. वसंत जुगळे यांनी व्यक्त केले.श्री रवळनाथ को-आॅप. हौसिंग फायनान्स सोसायटीतर्फे आयोजित ‘हौसिंग फायनान्सचा व्यावसायिक दृष्टिकोन’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष एम. एल. चौगुले होते.डॉ. जुगळे यांनी वाढत्या मध्यम वर्गाची मागणी आणि हौसिंग फायनान्स क्षेत्रातील आव्हाने व संधी यावर सविस्तर विवेचन केले. ते म्हणाले, भारतातील उत्पादन करणाऱ्या १४ क्षेत्रामध्ये हौसिंग फायनान्स हे तिसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र आहे. त्यामध्ये ३०० उपक्षेत्र आहेत.देशातील मध्यमवर्गाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात या दोन्हीच्या वाढीचा वेग अधिक आहे. पूर्वी अवघा १-२ टक्के असणारा हा वर्ग आता १२ ते १३ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे सरकारचेही लक्ष या मध्यमवर्गीयांच्या मागणीवरच केंद्रित झाले आहे.येत्या १५ वर्षांत बँकिंग क्षेत्रात २० लाख नोकऱ्या उपलब्ध होणार असून, २० वर्षांत बँकिंग व हौसिंग फायनान्स क्षेत्रात ४० मिलीयन भांडवल केंद्रित होणार आहे. त्यामुळे बँकांमध्येही संपत्ती व्यवस्थापनासाठी खास व्यवस्थापकाची नेमणूक करावी लागणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.यावेळी प्रा. अनुराधा गुरव, प्रा. नवनाथ शिंदे, डॉ. सतीश घाळी यांच्यासह संचालक, शाखाध्यक्ष, शाखा सल्लागार, सभासद व कर्मचारी उपस्थित होते. उपाध्यक्ष प्रा. आर. एस. निळपणकर यांनी स्वागत केले. किरण पाटील यांनी अतिथी परिचय करून दिला. प्रा. अनिता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. संचालक प्रा. डॉ. संभाजी भांबर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)‘रवळनाथ मॉडेल’ जगभर पोहोचेलहौसिंग फायनान्स क्षेत्रात ‘रवळनाथ’ने अल्पावधीत खूप मोठे काम केले आहे. बदलत्या काळाची गरज ओळखून त्याला नावीन्याची जोड दिल्यास मध्यम वर्गीयांच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण करणारे ‘रवळनाथ मॉडेल’ नक्कीच जगभर पोहोचेल, असा विश्वासही डॉ. जुगळे यांनी यावेळी व्यक्त केला.मेक इन नव्हे, मेक फॉर इंडियासध्या केंद्र सरकारचा देशभर 'मेक इन इंडिया'चा नारा सुरू असला तरी भारताच्या सर्वांगीण विकासासाठी जगभरातील गुंतवणूक देशात येण्याकरिता 'मेक फॉर इंडिया'चा नारा देण्याची गरज आहे, अशी टिप्पणीही डॉ. जुगळे यांनी यावेळी केली.