शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

‘चित्री’करिता संपादित जमिनी ‘उचंगी’करिता देण्यास विरोध

By admin | Updated: July 13, 2017 17:03 IST

महसूल विभागाच्या आजरा येथील बैठकीत ३६ प्रकल्पग्रस्तांची उपस्थिती

 आॅनलाईन लोकमत

आजरा , दि.१३ : चित्री प्रकल्पाकरिता संपादित करण्यात आलेल्या परंतु वापर न झालेल्या जमिनीवर मूळ मालकांचा ताबा व वहिवाट कायम असून चित्री प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या निकाली निघाल्याशिवाय उचंगी प्रकल्पास जमिनी देण्यास विरोध असल्याचे लेखी पत्र चित्री प्रकल्पग्रस्तांनी महसूल विभागाला दिले आहे.

महसूल विभागातर्फे सुमारे ३६ चित्री प्रकल्पग्रस्तांना म्हणणे मांडण्यासाठी आज आजरा येथे ग्रामपंचायत सभागृहात बोलविण्यात आले होते. यावेळी मारूती लाड, नामदेव फगरे, राजाराम चौगुले यांच्यासह प्रकल्पग्रस्तांनी आपली भूमिका स्पष्ट केली. धरण बांधकामावेळी धरण भिंतीच्या खालच्या बाजूला असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी गरज नसताना गरजेपेक्षा जास्त संपादित केल्या. सदर जमिनी कागदोपत्री संपादित केल्या गेल्या असल्या तरी या जमिनीवरील ताबा व वहिवाट मूळ मालकांनी कधीच सोडलेली नाही.

पुनर्वसनाच्या नावाखाली लाभक्षेत्रात दिल्या गेलेल्या जमिनीला पाणी उपलब्ध नसल्याने जमिनी पिकवू शकत नाही त्यामुळे आजही चुकीच्या पद्धतीने संपादित केलेल्या जमिनींवरच अवलंबून रहावे लागत आहे. प्रकल्पग्रस्तांना देय असणाऱ्या जमिनीचे अद्याप वाटप नाही. लाभक्षेत्रातील जमिनीला खात्रीचे पाणी नाही. ते मिळाले पाहिजे लाभक्षेत्रातील ज्यांना जमिनी मिळालेल्या आहेत. त्यापैकी बऱ्याच जमिनींचे मूळमालक जमिनी कसू देत नाहीत व चित्री प्रकल्पग्रस्तांच्या चित्रानगर, रायवाडा व आवंडी येथील प्लॉटस् अन्य कोणालाही देवू देणार नाही अशी भूमिकाही प्रकल्पग्रस्तांनी स्पष्ट केली. यावेळी मंडल अधिकारी विकास कोलते, मारूती राणे, काशिनाथ बांदेकर, अर्जून मांगले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.