शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

हुपरी नगरपरिषद स्थापनेचा मार्ग मोकळा

By admin | Updated: July 14, 2014 01:11 IST

उच्च न्यायालय : ३१ आॅक्टोबरपर्यंत निर्णय घेण्याचा राज्य शासनाला आदेश

हुपरी : रौप्यनगरी हुपरी (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेमध्ये रूपांतर करण्यासाठी ३१ आॅक्टोबर २०१४ पर्यंत राज्य शासनाने निर्णय घ्यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य शासनाला बजाविला. त्यामुळे येत्या काही महिन्यांतच येथे नगरपरिषदेची स्थापना होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नागरिकांतून समाधानाचे व आनंदाचे वातावरण आहे. याप्रश्नी अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार निर्मूलन न्यासचे अशोक खाडे यांनी अ‍ॅड़ धैर्यशील सुतार यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्याची आज सुनावणी होऊन न्यायालयाने हा आदेश दिला.हुपरी व परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात चालणारा चांदी उद्योग, पंचतारांकित औद्योगिक वसाहत, जवाहर साखर कारखाना, व्यंकटेश सूतगिरणीबरोबर अन्य उद्योगांच्या उभारणीमुळे या निमशहरी गावाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे. गावची लोकसंख्या सुमारे ५० हजारांवर गेली आहे. सध्या अस्तित्वात असणारी ग्रामपंचायत इतकी लोकसंख्या असणाऱ्या गावाचे व्यवस्थापन करण्यास अपुरी पडत आहे. कर्मचाऱ्यांचे पगार व वीज बिल अदा करण्यासाठी महसुलाची रक्कम अपुरी पडत आहे. ग्रामस्थांना नागरी सुविधाही मिळत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी नगरपरिषद होणे अत्यंत गरजेचे आहे. २००७ मध्ये राज्य शासनाने याबाबत उद्घोषणा करून त्यावर हरकती व सूचना मागविल्या होत्या. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी होऊन नगरपरिषद होण्याबाबतची शिफारस त्यावेळीच करण्यात आली आहे. परंतु, गेल्या सात वर्षांत राज्य शासनाने कोणताच निर्णय घेतलेला नाही. परिणामी, ग्रामस्थांना अनेक नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.अशोक खाडे यांनी याप्रश्नी अ‍ॅड.़ धैर्यशील सुतार यांच्यामार्फत मुंबई न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी २७ जूनला होऊन हुपरी ग्रामपंचायतीची नगरपरिषद करण्याचा निर्णय किती दिवसांत घेणार, याची माहिती ११ जुलैपर्यंत देण्याचे आदेश राज्य शासनाला दिले होते. त्यानुसार राज्य शासनाने आपल्या वकिलामार्फत आज न्यायालयाला लेखी म्हणणे कळविले. हुपरीच्या ग्रामपंचायतीची नगरपरिषद करण्यासाठीचे प्रशासकीय प्रयत्न सुरू आहेत. काही त्रुटी राहिल्या आहेत. त्यांची पूर्तता करून घेऊन लवकरच नगरपरिषद स्थापन करू, असे आपल्या लेखी म्हणण्यामध्ये राज्य शासनाने म्हटले असल्याची माहिती अ‍ॅड़ सुतार व याचिकाकर्ते खाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (वार्ताहर)