शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंदांचे तत्त्वज्ञानच जगाला तारू शकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:58 IST

कोल्हापूर : मानवता, समता हाच खरा धर्म आहे. अनेक राष्ट्रांमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. येथे संघर्षापेक्षा सहकार्याची गरज आहे. राजमाता ...

कोल्हापूर : मानवता, समता हाच खरा धर्म आहे. अनेक राष्ट्रांमध्ये युद्धजन्य परिस्थिती आहे. येथे संघर्षापेक्षा सहकार्याची गरज आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंदांचे तत्त्वज्ञानच जगाला तारू शकते. हे तत्वज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी मंगळवारी येथे केले.

येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात श्रीपतराव बोंद्रेदादा व्याख्यानमालेअंतर्गत डॉ. श्रीमंत कोकाटे यांचे ‘स्वराज्य जननी जिजाऊ व जगज्जेते स्वामी विवेकानंद’ या विषयावर व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण होते. स्वराज्याचे प्रेरणापीठ, ज्ञानपीठ, विद्यापीठ, संस्कारपीठ म्हणजे राजमाता जिजाऊ माँसाहेब होत्या. युद्ध नको बुद्ध हवा, ‘संघर्षापेक्षा सहकार्यातून विश्वबंधूता वाढवूया’ हा विचार स्वामी विवेकानंदानी मांडला. राष्ट्रमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांचे विचार आजच्या तरुणांनी आत्मसात करावेत, असे डॉ. कोकाटे यांनी सांगितले.

जिजाऊ शिवरायांचे संस्कारपीठ होते. स्वामी विवेकानंदांचे विचार युवकांना प्रेरणादायी आहेत, असे प्राचार्य डॉ. शानेदिवाण यांनी सांगितले. या व्याख्यानाच्या प्रारंभी जिजाऊ व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमांचे पूजन विद्यार्थिनींच्या हस्ते झाले. यावेळी रवींद्र भोसले, मनीष भोसले, गोपाळ गावडे, शरद गायकवाड, विठ्ठल आंबले, निवास कुंभार आदी उपस्थित होते. डॉ. सुरेश शिखरे यांनी प्रास्ताविक केले. विजय देठे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. पी. के. पाटील यांनी सूत्रसंचालन केले. शिवाजी जाधव यांनी आभार मानले.

चौकट

भित्तीपत्रक, ग्रंथप्रदर्शन

यावेळी राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनचरित्रावर आधारित भित्तीपत्रकाचे उद्घाटन डॉ. कोकाटे यांनी केले. ग्रंथप्रदर्शनास त्यांनी भेट दिली.

फोटो (१२०१२०२१-कोल-श्रीमंत कोकाटे (शहाजी कॉलेज) : कोल्हापुरात मंगळवारी शहाजी महाविद्यालयात ज्येष्ठ विचारवंत डॉ. श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान झाले. यावेळी शेजारी रवींद्र भोसले, आर. के. शानेदिवाण, मनीष भोसले, विठ्ठल आंबले, निवास कुंभार आदी उपस्थित होते.