शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

दीडशे रुपयांसाठी काढावे लागते दीड हजाराचे बँक खाते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:16 IST

कोल्हापूर : उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष न देता त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाणार ...

कोल्हापूर : उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष न देता त्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेत खाते काढण्यास सांगितले जात आहे. यामुळे पालकांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्याची प्रक्रिया किचकट असल्याने पालकांना त्याचा त्रास होत आहे. मिळणार दीडशे रुपये व त्यासाठी दीड हजार खर्चून बँक खाते काढण्याचे दिव्य पार पाडावे लागत आहे.

पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सुट्टीत शालेय पोषण आहार प्रत्यक्ष दिला जात होता; पण यामध्ये बदल करून सरकारने आहाराऐवजी विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणार आहे. यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत विद्यार्थ्यांच्या नावे खाते उघडणे बंधनकारक केले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या बहुतांशी शाखांमध्ये गर्दी आहे. कोरोनामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांची संख्या कमी केली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या नावे खाते उघडताना पालकांना हेलपाटे मारावे लागत आहे. खात्यासाठी विविध प्रकारची कागदपत्रे गोळा करतानाही धावपळ करावी लागत आहे.

ग्राफ

कोणत्या वर्गात किती विद्यार्थी ?

पहिली -५२३८९

दुसरी -५३८८४

तिसरी-५६१६७

चौथी- ५६५६३

पाचवी -५७११८

सहावी -५६७५०

सातवी -५६२५८

आठवी -५७०६५

पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार - १५६

सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार -२३४

चौकट

बँक खाते उघडण्यासाठी लागणार हजार रुपये

शालेय पोषण आहाराऐवजी त्याचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. ते पैसे कधी मिळणार अनिश्चित आहे. परिणामी आहाराच्या मिळणाऱ्या पैशापेक्षा बँक खाते उघडण्यासाठी पैसे अधिक खर्च होत आहेत. बँकेच्या खात्यावर कमीत कमी एक हजार रुपये नसतील तर दंड आकारला जातो. खाते काढताना दीड हजारांपेक्षा अधिक खर्च होतोच. शिवाय पुढे खाते चालू ठेवण्यासाठी एक हजारांपेक्षा अधिक रक्कम शिल्लक ठेवावे लागणार आहे. यामुळे गरीब, सामान्य पालकांची आर्थिक कोंडी होत आहे.

पालकांची डोकेदुखी दोन पालकांच्या प्रतिक्रिया

कोट

सरकारकडून शालेय पोषण आहारासाठी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर नाममात्र पैसे जमा करणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते काढण्यासाठी एक हजार रुपये आणि इतर खर्च येत आहे. यामुळे पालकांची नवी डोकेदुखी बनली आहे.

-विजय दिवाण, पालक

माझी मुलगी आठवीला आहे. तिला पोषण आहाराचे पैसे मिळणार म्हणून बँकेत खाते काढण्यास सांगितले. प्रत्यक्षात अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. खाते उघडण्याची प्रक्रिया किचकट होती. यामुळे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडताना त्रास झाला.

-दिलदार मुजावर, पालक

शिक्षणाधिकाऱ्यांचा कोट

सरकार उन्हाळी सुट्टीतील शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष न देता त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे.

-एस. के. यादव, शिक्षण प्रशासन अधिकारी, महापालिका