शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

शिवभोजन थाळीचे दीड महिन्याचे अनुदान थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:17 IST

कोल्हापूर : लॉकडाऊनमध्ये गरिबांच्या पोटाची भूक शमविणाऱ्या शिवभोजन थाळीचे दीड महिन्याचे अनुदान थकीत आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये गेली तीन तीन ...

कोल्हापूर : लॉकडाऊनमध्ये गरिबांच्या पोटाची भूक शमविणाऱ्या शिवभोजन थाळीचे दीड महिन्याचे अनुदान थकीत आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये गेली तीन तीन महिने बिल मिळत नसताना कोल्हापुरात मात्र जिल्हा पुरवठा कार्यालयाने तालुक्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून बिल वेळेवर काढण्याला प्राधान्य दिले आहे. सध्याचे थकीत बिल पुढील आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव मेटाकुटीला आला असताना गोरगरिबांच्या पोटाची भूक मात्र शिवभोजन थाळीने शमवली आहे. जिल्ह्यात १५ एप्रिलपासून थाळींची संख्या रोज ६ हजार करण्यात आली असून, ती गरजूंना मोफत दिली जाते. जिल्ह्यातील एकूण ३८ केंद्रांवरून रोज ५ हजार ८०० इतक्या थाळींचे वितरण होते. अन्य जिल्ह्यांमध्ये या थाळीचे तीन तीन महिन्यांचे अनुदान थकीत आहे. त्यामुळे केंद्र चालवणे मुश्कील झाले आहे. कोल्हापुरात मात्र अशी परिस्थिती नाही. मध्यंतरी पुन्हा लॉकडाऊन झाले. त्यावेळी लवकर बिले निघाली नव्हती. आता मात्र १५ मेपर्यंतचे अनुदान केंद्र चालकांना देण्यात आले आहे. गेल्या दीड महिन्याचे अनुदान थकीत आहे. हे अनुदानदेखील पुढील आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे.

--

ग्रामीणला ३५ तर, शहरात ५० रुपये अनुदान

शिवभोजन थाळीत दाेन चपात्या, एक भाजी, भात आणि आमटी दिली जाते. त्यासाठी शासनाकडून ग्रामीण भागात एका थाळीवर ३५ रुपये तर, शहरात ५० रुपये अनुदान दिले जाते.

--

जिल्ह्यातील शिवभोजन थाळी केंद्र : ३८

१७ एप्रिल ते २८ जूनपर्यंत थाळीचा लाभ घेतलेले नागरिक : १६ लाख ४१ हजार ७४१

--

केंद्र चालक काय म्हणतात..

दुसऱ्यांदा लॉकडाऊन सुरू झाले, त्यावेळी थाळींची बिले निघण्यास थोडा उशीर झाला होता. आता मात्र अनुदान मिळण्यात कोणतीही अडचणी नाही. दर महिन्याला वेळच्यावेळी पुरवठा कार्यालयाकडून अनुदान दिले जाते. बिल नसल्याने केंद्र चालवायला अडचण येते असे होत नाही.

अमित सोलापुरे, केंद्रचालक

--

मध्यंतरी अनुदान वेळेत मिळाले नव्हते, आता मात्र १५ मेपर्यंतचे बिल प्रशासनाने काढले आहे. वाढीव थाळींचे वाटप १४ जुलैपर्यंत करण्यात येणार आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद असून, आम्हाला या वाढीव थाळ्यादेखील काहीवेळा कमी पडतात. त्या वाढवून मिळाव्यात अशी आम्ही मागणी करणार आहेत.

ओंकार जाधव, केंद्रचालक

--

जिल्ह्यात शिवभोजन केंद्रांचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने सुरू आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत थाळींचे अनुदान काढण्यात कोल्हापूर खूप पुढे आहे. त्यासाठी वारंवार तालुक्यांकडे पाठपुरावा केला जातो. सध्या दीड महिन्याचे अनुदान थकीत आहे; पण तेदेखील लवकरच निघेल.

दत्तात्रय कवितके, जिल्हा पुरवठा अधिकारी

--