शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
4
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
5
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
6
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
8
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
9
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
10
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
11
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
12
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
13
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
14
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
15
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
16
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
17
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
18
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
19
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
20
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
Daily Top 2Weekly Top 5

एकदा मतदान झालं की, कोणबी इचारत नाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:58 IST

कोल्हापूर-कुरुंदवाड व्हाया इचलकरंजी 46 कि.मी. संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘एकदा मतदान झालं की, कोणबी इचारत ...

कोल्हापूर-कुरुंदवाड व्हाया इचलकरंजी46 कि.मी.संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘एकदा मतदान झालं की, कोणबी इचारत नाय. हे थांबायला पाहिजे. शेतकऱ्यांना दाम अन् पोरांच्या हाताला काम मिळावं. मोदींना संधी देऊन बघितली, आता नवीन लोकांचा इचार कराय हरकत नाही,’ अशा प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केल्या.‘लोकमत’च्या प्रतिनिधीने हातकणंगले मतदारसंघात एस. टी.ने प्रवास करीत कबनूर, इचलकरंजी, अब्दुललाट, शिरोळ, कुरुंदवाड, श्रीक्षेत्र नृसिंहवाडी परिसरातील मतदारांच्या भावना जाणून घेतल्या. सेवानिवृत्त दाम्पत्य सुभाष व वीणा मुणगेकर यांनी पेन्शन किमान तीन हजार रुपये व्हावी. इचलकरंजीतील यंत्रमाग व्यवसायाकरिता भरीव योजना राबवावी, अशा अपेक्षा व्यक्त केली. अब्दुललाटचे अशोकराव मोरे म्हणाले, ‘चौकीदार’ म्हणवून घेणाऱ्या मोदींनी खºया चौकीदारांचे दुखणे दूर करावे. शिरोलीचे महावीर बनसोडे म्हणाले, खासदार राजू शेट्टी आणि त्यांच्या विरोधातील उमेदवार धैर्यशील माने हे शेतकरी, सर्वसामान्यांचे प्रश्नांच्या सोडवणुकीचे मुद्दे घेऊन प्रचार करीत आहेत. निवडणुकीनंतर आश्वासनांची पूर्तता करावी. अब्दुललाटच्या महादेवी पाटील म्हणाल्या, सरकारनं शेतकऱ्यांच्या पिकाला दाम अन् पोरांच्या हाताला काम द्यावं. रावसाहेब पुजारी म्हणाले, सरकारने महागाई आटोक्यात आणावी. परतीच्या प्रवासात शेडशाळची नवमतदार ऋतुजा तकडे म्हणाली, नव्या सरकारने शेती, शिक्षण, रोजगार उपलब्धतेला प्राधान्य द्यावे.तुकाराम देसाई म्हणाले, भाजप सरकारने शेतकºयांच्या सुविधा कमी केल्या. कर्जमाफी सरसकट हवी होती.नितीन तेली यांनी नोटाबंदी, जीएसटीमुळे काळा पैसा तर बाहेर आलाच नाही; उलट रोजगार घटल्याबाबतची नाराजी व्यक्त केली.चांदणी पाटील म्हणाल्या, राजकीय पक्षांनी शेतकरी, सर्वसामान्यांचा विचार करावा.