शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

एकदा मतदान झालं की, कोणबी इचारत नाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 00:58 IST

कोल्हापूर-कुरुंदवाड व्हाया इचलकरंजी 46 कि.मी. संतोष मिठारी । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘एकदा मतदान झालं की, कोणबी इचारत ...

कोल्हापूर-कुरुंदवाड व्हाया इचलकरंजी46 कि.मी.संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ‘एकदा मतदान झालं की, कोणबी इचारत नाय. हे थांबायला पाहिजे. शेतकऱ्यांना दाम अन् पोरांच्या हाताला काम मिळावं. मोदींना संधी देऊन बघितली, आता नवीन लोकांचा इचार कराय हरकत नाही,’ अशा प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केल्या.‘लोकमत’च्या प्रतिनिधीने हातकणंगले मतदारसंघात एस. टी.ने प्रवास करीत कबनूर, इचलकरंजी, अब्दुललाट, शिरोळ, कुरुंदवाड, श्रीक्षेत्र नृसिंहवाडी परिसरातील मतदारांच्या भावना जाणून घेतल्या. सेवानिवृत्त दाम्पत्य सुभाष व वीणा मुणगेकर यांनी पेन्शन किमान तीन हजार रुपये व्हावी. इचलकरंजीतील यंत्रमाग व्यवसायाकरिता भरीव योजना राबवावी, अशा अपेक्षा व्यक्त केली. अब्दुललाटचे अशोकराव मोरे म्हणाले, ‘चौकीदार’ म्हणवून घेणाऱ्या मोदींनी खºया चौकीदारांचे दुखणे दूर करावे. शिरोलीचे महावीर बनसोडे म्हणाले, खासदार राजू शेट्टी आणि त्यांच्या विरोधातील उमेदवार धैर्यशील माने हे शेतकरी, सर्वसामान्यांचे प्रश्नांच्या सोडवणुकीचे मुद्दे घेऊन प्रचार करीत आहेत. निवडणुकीनंतर आश्वासनांची पूर्तता करावी. अब्दुललाटच्या महादेवी पाटील म्हणाल्या, सरकारनं शेतकऱ्यांच्या पिकाला दाम अन् पोरांच्या हाताला काम द्यावं. रावसाहेब पुजारी म्हणाले, सरकारने महागाई आटोक्यात आणावी. परतीच्या प्रवासात शेडशाळची नवमतदार ऋतुजा तकडे म्हणाली, नव्या सरकारने शेती, शिक्षण, रोजगार उपलब्धतेला प्राधान्य द्यावे.तुकाराम देसाई म्हणाले, भाजप सरकारने शेतकºयांच्या सुविधा कमी केल्या. कर्जमाफी सरसकट हवी होती.नितीन तेली यांनी नोटाबंदी, जीएसटीमुळे काळा पैसा तर बाहेर आलाच नाही; उलट रोजगार घटल्याबाबतची नाराजी व्यक्त केली.चांदणी पाटील म्हणाल्या, राजकीय पक्षांनी शेतकरी, सर्वसामान्यांचा विचार करावा.