शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:16 IST

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या गलथान कारभारामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केले याचा निषेध करीत हे आरक्षण मिळावे यासाठी ...

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या गलथान कारभारामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केले याचा निषेध करीत हे आरक्षण मिळावे यासाठी कोल्हापूर शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे केंद्र सरकारविरोधात स्टेशन रोड येथे काँग्रेस कमिटीसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी ‘आरक्षण आमच्या हक्काचे - नाही कुणाच्या बापाचे,’ ‘ओबीसी आरक्षण मिळालेच पाहिजे,’ ‘सर्वोच्च न्यायालयाला आकडेवारी न देणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो,’ अशा घोषणा देण्यात आल्या.

सर्वोच्च न्यायालयाने देशातील ओबीसींची आकडेवारी केंद्र सरकारकडे मागितली होती. मात्र केंद्र सरकारने ही आकडेवारी सर्वोच्च न्यायालयास दिली नाही; त्यामुळे ओबीसीचे आरक्षण न्यायालयाने रद्द केले. याला सर्वस्वी तत्कालीन देवेंद्र फडणवीस व केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच जबाबदार आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातर्फे शहर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक न्यायदिनी जन आंदोलन करण्यात आले.

यावेळी सरलाताई पाटील, संध्या घोटणे, सचिन चव्हाण, संजय पवार वाईकर, तौफिक मुल्लाणी, संपतराव पाटील, मोहम्मद शेख, किशोर खानविलकर, प्रदीप चव्हाण, शंकरराव पाटील, बाळासाहेब सरनाईक, दीपक थोरात, अक्षय शेळके, उमेश पोरलेकर, आकाश शेलार, रणजित पवार, सुलोचना नाईकवाडे, सुरेश कुराडे, रंगराव देवणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

--

फोटो नं २६०६२०२१-कोल-काँग्रेस कमिटी

ओळ : कोल्हापूर काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी स्टेशन रोड येथे ओबीसी आरक्षण रद्दच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

--