शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सेवा संस्थांतील मतदार संख्या २५ टक्क्यांनी कमी होणार

By admin | Updated: December 29, 2014 23:42 IST

९७ व्या घटना दुरुस्तीचा परिणाम : मतदारांच्या पात्रतेबाबत मोठा बदल, खरे सभासदच घेणार सत्तेचा निर्णय

संजय पारकर - राधानगरी -९७व्या घटना दुरुस्तीमुळे सहकारी संस्थांच्या मतदारांच्या पात्रतेबाबत मोठा बदल झाला आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या प्राथमिक सेवा संस्थांचे पोकळ सभासद कमी झाल्याने सभासदांपैकी काही संस्थांत पंचवीस टक्क्यांपर्यंत मतदार संख्या कमी झाली आहे. यामुळे आता खरे सभासदच संस्थांच्या सत्तेचा निर्णय घेणार आहेत. संस्थांच्या भवितव्यासाठी हे पोषक आहे. मात्र, या संस्थांची सद्य:स्थिती पाहता ‘बैल गेला नि झोपा केला’ अशी अवस्था होणार आहे.१९६० च्या कायद्यानुसार महाराष्ट्रात सहकारी चळवळीची भरभराट झाली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्जे व अन्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्राथमिक सेवा संस्थांची निर्मिती झाली. सुरुवातीस मोजक्या गावांत सुरू झालेल्या संस्थांची संख्या १९८०-८५ पर्यंत वाढली. गाव तेथे संस्था या धोरणानुसार गावोगावी संस्था निर्माण झाल्या. शेतकऱ्यांना शेतीबरोबरच पूरक व्यवसायाला कर्जपुरवठा करण्यासाठी सेवा संस्था हेच एकमेव माध्यम तेव्हा होते. त्यामुळे या संस्थांना कमालीचे महत्त्व प्राप्त झाले. गावातील राजकारण पर्यायाने गाव ताब्यात ठेवण्यात या संस्थांचा उपयोग होऊ लागला. तालुका, जिल्हा खरेदी-विक्री संघ, जिल्हा बॅँका, अशा केंद्रीय संस्थांसाठी या संस्थांच मतदार असल्याने यांचे राजकीय महत्त्वही वाढले.त्या काळातील या संस्थांचे वलय, राजकीयदृष्ट्या महत्त्व पाहता ताब्यातील संस्था कायम राहावी असेच सर्वांचे प्रयत्न व्हायचे. तेव्हाच्याच निवडणूक नियमानुसार कर्जदार व बिगर कर्जदार असे दोनच भाग मतदारांचे असायचे. बिगर कर्जचदारांचा एक व अन्य सर्व कर्जदारांनी प्रतिनिधी निवडायचे. त्यामुळे कोणालाही सभासद करायचे, त्याला नाममात्र कर्ज द्यायचे व आपले मतदार निश्चित करून निवडणुकीची तयारी करायचे, असेच प्रकार घडत. त्यामुळेच या संस्थांचे केंद्रीकरण झाले. एकदा ताब्यात आलेली संस्था कायमस्वरूपी एखाद्या नेत्याकडे, गटाकडे राहू लागली. निवडणुकीत प्रयत्न करूनही विरोधी गटांना अपयश येऊ लागल्यावर त्या संस्थेचा वाद सोडून नवीन संस्था स्थापन करण्याचा फंडा सुरू झाला.मागील पंचवीस वर्षांच्या काळात गावात एकापेक्षा जास्त संस्था स्थापन झाल्या. ही लाट एवढी आली की, दोन हजार लोकसंख्या असणाऱ्या गावात चार-चार संस्था झाल्या. गावात जेवढे राजकीय गट तितक्या संस्था निर्माण झाल्या. यातून अनावश्यक स्पर्धा वाढली. खर्च वाढला. संस्था तोट्यात जाऊ लागल्या. शासनाची धोरणे बदलली. कर्ज वाटण्याचे निकष, व्याज यात बदल झाला. राष्ट्रीयकृत, खासगी व सहकारी बॅँकांना शेतीसाठी पीककर्ज वाटण्यात परवानगी देण्यात आली. मध्यंतरी झालेली कर्जमाफी, गेल्या काही वर्षांत उसाला मिळालेला दर यामुळे सरसकट असतानाही कर्जाची गरज कमी झाली. देणारे जादा व घेणारे कमी असे झाले, अशा कारणांमुळे सेवासंस्थांचे महत्त्व कमी झाले आहे. आज घडीला हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या संस्थाच सुस्थितीत व नफ्यात आहेत.