शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

आता जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:26 IST

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी थांबलेली जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाची चर्चा आता ...

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी थांबलेली जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाची चर्चा आता पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. बदल व्हावा अशी इच्छा असणाऱ्यांनी पुन्हा उचल खाल्ल्याने या दोन दिवसात याबाबत प्राथमिक चर्चा होण्याची शक्यता आहे.

जानेवारी २०२१ मध्ये जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांना वर्ष पूर्ण झाले आहे. तोपर्यंत दोन्ही मंत्री ‘गोकुळ’च्या जोडण्यांमध्ये लागल्याने हा विषय मागे पडला. कोणत्याही परिस्थितीमध्ये बदल केला जाणार असल्याचे मुश्रीफ यांनी याआधी अनेकवेळा सांगितले आहे.

त्यामुळे ‘गोकुळ’मध्ये घवघवीत यश मिळाल्यामुळे महाविकास आघाडीचे जोरदार वातावरण तयार झाले आहे. अशातच जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदल झालाच पाहिजे, अशी आग्रही मागणी इच्छुकांकडून सुरू आहे.

गुरुवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील यांनी पालकमंत्री पाटील यांची भेट घेतली. परंतु चर्चेचा तपशील कळलेला नाही. काही इच्छुक सदस्यांनीही पालकमंत्र्यांशी संपर्क साधला आहे. ग्रामविकासमंत्री मुश्रीफ हे मुंबईत असल्याने ते आल्यानंतर दोन दिवसात याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

जिल्हा परिषदेची निवडणूक जानेवारी २०२२ मध्ये हाेणे अपेक्षित आहे. दरम्यानच्या काळात विधानपरिषदेचीही निवडणूक आहे. त्यामुळे कालावधी कमी होत असल्याने इच्छुकांची घालमेल सुरू आहे. म्हणूनच लवकरात लवकर बदल व्हावा यासाठी आता इच्छुक आग्रही आहेत.

चौकट

विरोधकांची भीती नाही

सध्याच्या पदाधिकाऱ्यांचा आपल्याच मतदार संघासाठी निधी घेण्याचा अतिरेकी कल, यामुळे सदस्य नाराज आहेत. त्यामुळे ही नाराजी वाढू नये यासाठीही नेत्यांना दक्षता घ्यावी लागणार आहे. ‘गोकुळ’मध्ये ज्या पध्दतीने मुश्रीफ-पाटील जोडीने धमाकेदार विजय संपादन केला, त्यातून त्यांनी मोठा संदेश दिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद पदाधिकारी बदलात भाजप काही तरी वेगळे करण्याच्या मनस्थितीत आता उरली आहे असे वाटत नाही. जिथे ३६०० ठरावधारकांच्या गोकुळची निवडणूक घेतली, तिथे ६७ सदस्य असलेल्या जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीसाठी काहीच अडचण सांगू नका, असे इच्छुकांचे म्हणणे आहे.