शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

ऊसदरासाठी आता शेतकरी कामगार पक्ष रस्त्यावर

By admin | Updated: December 11, 2014 00:33 IST

उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : उसाला प्रतिटन ३५०० रुपयांची मागणी

कोल्हापूर : चालू गळीत हंगाम सुरू होऊन महिना उलटला तरी साखर कारखान्यांनी आपली ‘एफआरपी’ जाहीर केलेली नाही. ती जाहीर करून एकरकमी द्यावी, उसाला प्रतिटन ३५०० रुपये भाव मिळालाच पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवारी (दि. १२) शेतकरी कामगार पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाचे राज्य सहसरचिटणीस व माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी आज, बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.टेंबे रोडवरील पक्षाच्या कार्यालयापासून सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. बिंदू चौक, छत्रपती शाहू महाराज पुतळा, स्टेशन रोड, बसंत-बहार टॉकीजमार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे येणार आहे. या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले जाईल, असे पवार-पाटील यांनी सांगितले.पवार-पाटील म्हणाले, ऊस गाळप केल्यानंतर १४ दिवसांत ‘एफआरपी’ची रक्कम शेतकऱ्यांना देणे बंधनकारक असून, काही कारखाने हे बंधन पाळत नाहीत. मुळातच वाढत्या महागाईच्या प्रमाणात वाढणारा उत्पादन खर्च विचारात घेता शासनाने जाहीर केलेली ‘एफआरपी’ शेतकऱ्यांना न परवडणारी आहे. जाहीर झालेली ‘एफआरपी’ शेतकऱ्यांना एकरकमी मिळणे आवश्यक आहे. गेल्या तीन-चार वर्षांत शासनाने ‘एफआरपी’चे सूत्र स्वीकारल्यापासून ही रक्कम तीन-चार टप्प्यांत देऊन ‘एफआरपी’ म्हणजेच अंतिम दर अशीच भूमिका शासन व साखर कारखानदारांनी घेतली आहे. बाजारातील सर्व वस्तूंचे वाढणारे भाव, त्यामुळे शेतकऱ्यांचे महागडे बनलेले जीवन, वाढणारा उत्पादन खर्च, याचा ‘एफआरपी’ जाहीर करताना विचारच झालेला नाही. ती ठरविताना महागाईच्या निर्देशांकाचा विचार करून त्या प्रमाणात ठरविणे आवश्यक आहे. केंद्र व राज्य सरकारने साखर उद्योगाबद्दल अस्थिर व अनिश्चित धोरण न स्वीकारता उसाचा दर कारखान्यांच्या मर्जीवर व साखरेच्या बाजारातील किमतीवर न ठेवता त्यासाठी दीर्घकालीन शाश्वत धोरण स्वीकारणे गरजेचे आहे.यावेळी जिल्हा सहचिटणीस भारत पाटील, बाबासाहेब देवकर, मधुकर हरेल, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मागण्या अशा...उसाला प्रतिटन ३५०० रुपये दर मिळालाच पाहिजेजाहीर झालेली ‘एफआरपी’ एकरकमी दिली पाहिजेगूळ खरेदी-विक्रीचा व्यवहार बाजार ामित्यांमार्फतच झाला पाहिजेसरकारने गुळावरील उठविलेले नियमन रद्द करावेदुधाचे दर वाढवून मिळावेत व दूध भुकटीस निर्यात अनुदान देऊन निर्यात वाढवावीभात व इतर भरडधान्य सोयाबीन, काजूची शासनामार्फत खरेदी केंद्रे संबंधित भागातील प्रमुख गावांत सुरू करावीत