शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

आता शेतकरी करणार पीक पेरणीच्या नोंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:28 IST

आयुब मुल्ला लोकमत न्यूज नेटवर्क, खोची : स्वतःच्या शेतातील पीक पेरणीची माहिती शेतकऱ्यांनी स्वतः भरावी त्यातून अचूकता निर्माण व्हावी ...

आयुब मुल्ला

लोकमत न्यूज नेटवर्क, खोची : स्वतःच्या शेतातील पीक पेरणीची माहिती शेतकऱ्यांनी स्वतः भरावी त्यातून अचूकता निर्माण व्हावी या उद्देशाने शासनाने राज्यात ई-पीक पाहणी हा उपक्रम हाती घेतला आहे. १५ ऑगस्टपासून हा कार्यक्रम राज्यातील गावागावांत राबविण्यात येणार आहे. यासाठी अँड्रॉइड मोबाइलचा वापर शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. सध्या या पार्श्वभूमीवर ई-पीक पाहणी प्रबोधन सप्ताह सुरू आहे.

या उपक्रमामुळे पीक पेरणी अहवालात शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सक्रिय सहभाग वाढणार आहे. याचा प्रचार ,प्रसिद्धी करण्याचे काम कृषी विभाग करीत आहे,ल तसेच त्यावर नियंत्रण ठेवणे, त्याची जबाबदारी अचूक पार पाडणे यासाठी महसूल विभाग कार्यरत आहे.

पीक पेरणीची माहिती भरण्यासाठी शेतकऱ्यांना अँड्रॉइड मोबाईलचा वापर करावा लागणार आहे. 'पीक पेरणी अहवाल ॲप' दिलेल्या लिंकवरून डाऊनलोड केल्यानंतर संबंधित सर्व माहिती शेतकऱ्यांनी भरावयाची आहे. यासाठी वैयक्तिक माहिती भरून खातेदार म्हणून नोंदणी करणे महत्त्वाचे आहे. गट नंबर, खाते नंबर, जेवढी पिके असतील त्यांची माहिती, हंगामनिहाय माहिती, कायमपड, बांधावरील झाडे आदींची माहिती या अहवालात द्यावी लागणार आहे, तर पिकांचा फोटो काढून तो अपलोड करावा लागणार आहे.

ही मोहीम अधिक जलद व सुलभ व्हावी यासाठी कृषी, महसूल विभाग सध्या डेमो ॲप डाऊनलोड करण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करून मार्गदर्शन करीत आहे. त्यासाठी प्रबोधन सप्ताह राबविला जात आहे. यानंतर १५ ऑगस्टपासून प्रत्यक्ष हा उपक्रम गावागावांतून शेतकऱ्यांच्या सहभागातून राबविला जाणार आहे. या अहवालानुसार सातबारा पत्रकावर पिकांच्या नोंदी होणार आहेत.

शेतकऱ्यांच्या सहभागातून माहिती संकलनामध्ये पारदर्शकता आणणे, शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग वाढविणे, कृषी पतपुरवठा सुलभ करणे, पीक विमा आणि पीकपाहणी दावे निकालात काढण्याची प्रक्रिया सोपी व्हावी, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्य प्रकारे मदत करणे शक्य व्हावे या दृष्टिकोनातून हा उपक्रम हाती घेतला आहे.यासाठी टाटा ट्रस्टकडून हे ॲप विकसित करण्यात आले आहे.

तालुका, जिल्हा, विभाग ते राज्य पातळीवर सनियंत्रण समित्या स्थापन करून हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जाणार आहे.