शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: नगरपरिषदेत चुरशीची लढाई: ठाकरेंच्या शिवसेनेने खाते उघडले, काँग्रेसही आघाडीवर; पहा लेटेस्ट अपडेट
2
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
3
Nagar Parishad Election Result: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
4
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
5
नात्याला काळीमा! विमा पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
6
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
7
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
8
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
9
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
10
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
11
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
12
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
13
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
14
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
15
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
16
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
17
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
18
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
19
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
20
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आता आषाढातही शुभमंगल सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:18 IST

कोल्हापूर : कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे सर्वसामान्य जनजीवनच नव्हे तर विवाह सोहळ्यांच्या कालावधीवरदेखील परिणाम झाला आहे. एरवी चातुर्मासात विवाह ...

कोल्हापूर : कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे सर्वसामान्य जनजीवनच नव्हे तर विवाह सोहळ्यांच्या कालावधीवरदेखील परिणाम झाला आहे. एरवी चातुर्मासात विवाह सोहळे केले जात नाही, मात्र यंदा आषाढ महिन्यादेखील लग्नसमारंभ होत आहेत. विवाह मुहूर्त नसतानादेखील ज्या मुहूर्तांवर विवाह केले जातात त्याला गौण काळातील विवाह मुहूर्त म्हणतात. सध्या याच मुहूर्तांवर लग्नाचा धुमधडाका सुरू आहे.

जानेवारी ते एप्रिल या काळात गुरू व शुक्राचा अस्त असतो तर जुलै ते नोव्हेंबरमध्ये चातुर्मास सुरू असतो. या चातुर्मासात देवशयनी म्हणजे देवांचा विश्रांती काळ असतो. त्यामुळे या चार महिन्यांमध्ये व्रतवैकल्ये, देवादिकांची उपासना केली जाते. त्यामुळे या काळात विवाह सोहळे होत नाहीत. मात्र गेल्यावर्षीपासून सुरू झालेल्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे समारंभांच्या धार्मिक संकेतांना मुरड घालून हे कार्यक्रम आटोपले जात आहेत. त्याला विवाह सोहळेदेखील अपवाद राहिलेले नाहीत. लॉकडाऊनमुळे गेल्यावर्षीपासून ज्या विवाहांच्या तारखा पुढे पुढे ढकलण्यात आले आहेत, ते सोहळेदेखील सध्याच्या आषाढात धुमधडाक्यात होत आहेत. त्यामुळे कोल्हापुरात अनेक घरांच्या दारात मांडव घातलेले दिसत आहेत.

--

आषाढातील विवाह तारखा

१८, २२, २५, २६, २८, २९ जुलै. ३, ४ ऑगस्ट.

--

पार्किंग, रिकामी जागा, मंगल कार्यालये

लग्न समारंभ कमीत कमी माणसांमध्ये करायचे असल्याने अनेक जणांनी मंगल कार्यांलयांऐवजी आपल्याच इमारतीखालचे पार्किंग, शेजारचा रिकामा प्लॉट, घर मोठे असेल तर घरात किंवा दारातच विवाह समारंभ करत आहेत. याशिवाय मंगल कार्यालयांचेही बुकिंग केले जात आहे, कार्यालयांमध्ये कार्यक्रम करताना शासकीय नियमांची काळजी घ्यावी लागते. मात्र या कोरोनामुळे गुरुजींपासून बँडवाले, घोडेवाले, डोलीवाले, तुतारीवाले, इव्हेंट मॅनेजमेंटमधील लोक असे सगळेच नागरिक अडचणीत आले आहेत.

---

परवानगी २५ चीच पण...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विवाह समारंभासाठी २५ लोकांनाच परवानगी दिली आहे. आणि वेळ दिली आहे २ तास. प्रत्यक्षात मात्र एवढ्या कमी माणसात आणि एवढ्या कमी कालावधीत विवाह सोहळा होत नाही. २५ च्या ठिकाणी ५०-१०० पाहुणे मंडळी उपस्थित असतात. ग्रामीण भागात, उपनगरांमध्ये लोकप्रतिनिधी किंवा महत्त्वाच्या व्यक्तीच्या कुटुंबातील कुणाचा विवाह असेल तर ही संख्या पार ३०० च्या पुढे जात आहे. महापालिका क्षेत्रात हे दिसून आले तर दंडात्मक कारवाई होते, काहीवेळा होतही नाही.

----

चातुर्मास हा देवतांच्या अनुष्ठानाचा काळ असतो. त्यामुळे पूर्वी या कालावधीत विवाह सोहळे होत नव्हते, त्यामागे व्यावहारिक कारण हेदेखील होते की, पावसाळा असतो, पाहुण्यांना प्रवासात अडचणी येतात. नदीला पूर येणे, रस्ते बंद होते असे प्रकार होतात. त्यामुळेही या काळात पूर्वी लग्न टाळले जायचे, आता शास्त्राचा आधार घेऊन मधला मार्ग काढला जातो.

वेदमूर्ती सुहास जोशी

--

पूर्वीच्या पद्धती वेगळ्या होत्या. आता चैत्रापासून आषाढापर्यंत लग्ने लावली जातात. त्याला काही हरकत नसते. श्रावण, भाद्रपद, अश्विनी या महिन्यांमध्ये विवाह होत नाहीत. कार्तिकमध्ये मग तुळशीच्या लग्नानंतर विवाह मुहूर्त असतात.

आदिनाथ सांगळे (गुरुजी)

----