शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

आता उसावर लष्करी अळीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:26 IST

कोपार्डे : महापुरातून वाचलेल्या उरल्यासुरल्या उसाच्या पिकावर आता लष्करी अळीने हल्ला चढवला आहे. उसाला शिल्लक असणारी हिरवट पाने कुरतडल्याने ...

कोपार्डे : महापुरातून वाचलेल्या उरल्यासुरल्या उसाच्या पिकावर आता लष्करी अळीने हल्ला चढवला आहे. उसाला शिल्लक असणारी हिरवट पाने कुरतडल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. जुलै महिन्यात महापुराने नदीबुड क्षेत्रातील ऊस पीक तब्बल १० ते १५ दिवस पाण्याखाली होते. यावर्षी ढगफुटीसदृश पावसाने जमिनीचे मोठ्या प्रमाणात भुस्खलन झाले. याचबरोबर पाण्याच्या प्रवाहाने जमिनीची धूप होऊन महापुराच्या पाण्यात जास्त रेताड पाणी आल्याने ऊस पिकावर मातीचा थर बसला आहे. यात ऊस पीक जमीनदोस्त झाले आहे. तर सुरळी वाळल्याने उसाचे मोठे नुकसान होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली असून, वातावरणात प्रचंड उष्णता निर्माण झाली. त्यातच नदीबुड क्षेत्रातील उसावर मोठ्या प्रमाणावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. एका रात्रीत ही अळी शेकडो एकर क्षेत्रातील उसाच्या पिकावर हल्ला चढवत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पुराच्या तडाख्यातून वाचलेल्या ऊस पिकाची हिरवी पानेही लष्करी अळी फस्त करत आहे. त्यामुळे पानांच्या शिरा फक्त शिल्लक राहत आहेत.

चौकट : महापुराच्या पाण्यात शेतीला विद्युत पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर ९५ टक्के पुराच्या पाण्याखाली गेल्याने खराब झाले आहेत. विद्युत पोल कोसळले असून, वाहिन्या तुटल्या आहेत. त्यामुळे शेतीपंपाची वीज खंडित झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. सध्या पावसाने दडी मारल्याने माळरानावरील आडसाली लागण, भुईमूग, पोटरीत आलेले भात व सोयाबीन पिके धोक्यात आली आहेत.

चौकट : गवतावरही अळीचा प्रादुर्भाव

ऊस पिकाचा फडशा पाडल्यानंतर ही लष्करी अळी शेजारी असणाऱ्या गवतावर हल्ला चढवत आहे. त्यामुळे ओल्या वैरणीची टंचाई वाढली आहे.