शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

कचरा हटावसाठी आता ‘निरी’ची फेरी

By admin | Updated: July 9, 2015 00:19 IST

रोजच्या १७० टन कचऱ्याची समस्या : महापालिका प्रकल्प आराखडा बनविणार; टाकाळा व टोप खण तातडीने वापरात येणे अशक्य

संतोष पाटील - कोल्हापूर -झूम प्रकल्पात कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी जागेची कमतरता आहे. ‘मनपा’नेच लवादाकडे ‘रोकेम’ वीज प्रकल्पासाठी अठरा महिन्यांची कालमर्यादा दिली आहे. येथील विघटित कचरा टाकाळा येथे टाकावा, तर ही खण तयार होण्यास अद्याप आठ महिन्यांचा अवधी लागणार आहे, तर टोप खण विकसित करण्यास किमान पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे त्यामुळे, रोज तयार होणाऱ्या १७० टन कचऱ्याचे करायचे काय? असा प्रश्न महापालिकेसमोर उभारला असून या त्रांगड्यातून सुटका करून घेण्यासाठी दि नॅशनल एन्व्हारमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (निरी)ला पाचारण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गेल्या पाच वर्षांत लाईन बझार येथील झूम प्रकल्पावर साचलेल्या तीन लाख टन कचऱ्यापैकी ७० टक्के कचऱ्याचे नैसर्गिकरित्या विघटन झाले आहे. या विघटित इनर्ट मटेरिअल (कचऱ्यापासून राहिलेले घटक) टाकाळा खण येथे शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची गरज आहे. आंदोलन व ठेकेदाराची दिरंगाई यामुळे टाकाळा खण विकसित करण्याचे काम गेली दीड वर्षे संथगतीने सुरू आहे. आता पावसामुळे काम ठप्पच आहे. दरम्यान, झूम प्रकल्पातील इनर्ट मटेरियलचे टाकाळा खणीत शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी ‘निरी’कडे आठ लाख दहा हजार रुपये भरून डीपीआर (सविस्तर प्रकल्प आराखडा) तयार करून घेतला जाणार आहे. झूम प्रकल्पातील जागा रिकामी झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने शहराचे कचरा निर्मूलनाच्या दिशेने पाऊल पडणार असल्याचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी स्पष्ट केले.टोप खण विकसित करण्यास पाच वर्षेटोप खण ही शहरातील कचऱ्यासाठी पुढील १०० वर्षांचा पर्याय आहे. खणीभोवती सहा फूट भिंत उभारण्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार ही १७ एकर खण विकसित करण्यास किमान पाच वर्षांचा कालावधी लागणार असल्याचे डॉ. दिलीप पाटील यांनी सांगितले.....अन्यथा उपायुक्त व स्थायी सभापतींवर कारवाईकचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प सुरू होण्यास १८ महिन्यांचा कालावधी लागेल, असे उपायुक्त व स्थायी समिती सभापती यांनी हमीपत्राद्वारे लवादाला सांगितले आहे. ‘रोकेम’चा वीज निर्मितीचा प्रकल्प या वेळेत सुरू न झाल्यास ‘एमजेपी कलम-२०’ नुसार हरित लवाद या दोघांवर जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करू शकते. त्यामुळे कोणत्याही स्थितीत ठरलेल्या कालबद्धतेनुसार प्रकल्प सुरू करावाच लागेल. - अ‍ॅड. धैर्यशील सुतारदररोज किमान लाख रुपये खर्चएक टन कचऱ्याचे विघटन करुन वीजनिर्मितीसाठी ३०८ रुपये व कचरा उठावासाठी किमान ३०० रुपये असा प्रतिटन किमान सहाशे रुपयांचा खर्च महापालिकेला सोसावा लागणार आहे. सध्या रोज १७० टन कचरा निर्माण होतो. त्यामध्ये वाढ झाल्यास किंवा कचरा ओला झाल्याने खर्चात वाढ होणार आहे. घंटागाड्यांचे प्रमाण वाढविणे तसेच कचऱ्यातील दगड-गोटे बाजूला करून खर्चात कपात होऊ शकते. हॉटेल, उद्योग, मॉल व कार्यालये आदींना वेगळा कर लावून जादा आकारणी करता येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.....अन्यथा उपायुक्त व स्थायी सभापतींवर कारवाईकचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प सुरू होण्यास १८ महिन्यांचा कालावधी लागेल, असे उपायुक्त व स्थायी समिती सभापती यांनी हमीपत्राद्वारे लवादाला सांगितले आहे. ‘रोकेम’चा वीज निर्मितीचा प्रकल्प या वेळेत सुरू न झाल्यास ‘एमजेपी कलम-२०’ नुसार हरित लवाद या दोघांवर जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करू शकते. त्यामुळे कोणत्याही स्थितीत ठरलेल्या कालबद्धतेनुसार प्रकल्प सुरू करावाच लागेल. - अ‍ॅड. धैर्यशील सुतार