शहरं
Join us  
Trending Stories
1
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
2
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
3
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
4
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
5
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
6
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
7
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
8
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
9
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे
10
कचऱ्यात फेकलेल्या तिकीटावर लॉटरी लागली, त्यातून आणखी तिकीटे घेतली, ६६ लाख जिंकली...
11
बांगलादेशमध्ये हिंदू तरुणीवर घरात घुसून बलात्कार, व्हिडिओही बनवला, बीएनपी नेत्यावर आरोप 
12
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
13
पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार बदलणार नियम?
14
तरण्या-ताठ्या मुलामुलींचं हृदय का होतंय म्हातारं? शेफाली जरीवालाच्या निधनामुळे पुन्हा चर्चा
15
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
16
Ajit Pawar: हिंदी सक्ती ते ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांपर्यंत; अजित पवार स्पष्टच बोलले!
17
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
18
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
19
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
20
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू

पाण्यानंतर आता वाळलेला ऊस तोडणीचे संकट

By admin | Updated: November 23, 2015 00:23 IST

शेतकरी दुहेरी कात्रीत : कारखान्याची तोडणी आली तरी आर्थिक अरिष्टांचे ढग; पैरा पद्धतीने तोड

दत्तात्रय पाटील -- म्हाकवे -गत महिन्यात निढोरी कालव्यातून सोडलेले पाणी म्हाकवे (ता. कागल) येथे पोहोचलेच नाही. त्यामुळे येथील ऊस पीक वाळून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील चारही कारखान्यांनी पाण्याअभावी वाळणाऱ्या ऊसतोडीला प्राधान्य दिले असले तरी गावच्या उत्तरेकडील माळरानावरील बहुतांश ऊस पाण्याअभावी होरपळला आहे. या शेतकऱ्यांचा वाळलेला ऊस कोणी तोडायचा? हा प्रश्न भेडसावत आहे. उसाचे वाडे पूर्णत: वाळल्यामुळे वैरणीसाठी ऊसतोड करणाऱ्यांसह स्थानिक ऊसतोड मजूर (टोळ्या) टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे बाहेरून आलेल्या मजुरांसह पैरा पद्धतीने वाळलेला ऊस तोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.आॅक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात म्हाकवेकडील कालव्याला पाणी सोडण्यात आले. परंतु, या कालव्याला असणारी गळती, कालव्यात साचलेले केंदाळ, झाडेझुडपे यामुळे हे पाणी म्हाकवेपर्यंत पोहोचलेलेच नाही. तसेच अशा बिकट परिस्थितीत म्हाकवे परिसरातच पावसाने दडी मारली. परिणामी, येथील ऊस पिके डोळ्यांदेखत वाळताना पाहण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय नाही. सध्या तालुक्यातील हमीदवाडा, सरसेनापती संताजी घोरपडे, शाहू, आदी सर्वच कारखान्यांनी आपल्याकडे नोंद असणाऱ्या वाळलेल्या उसाची पाहणी करून हा ऊस अग्रक्रमाने तोडण्याचा निर्णय घेतला. परंतु, हा वाळलेला ऊस तोडण्याकडे स्थानिक मजूर पाठ फिरवत आहेत. त्यामुळे शेतकरी पैरा पद्धतीने, जादा मजुरी देऊन साखर कारखान्याला ऊस घालविण्यासाठी आटापिटा करीत आहेत.प्रशासन बेजबाबदारच...!सध्या म्हाकवेकडील कालव्याची डागडुजी सुरू आहे. गेल्या महिन्यातील पाणी न पोहोचल्यामुळे येथील ऊस वाळलेले आहेत, हे अधिकारी उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. तरीही दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतरच पाणी सोडणार आहेत. त्यामुळे कालव्याच्या दुरुस्तीची कामे पाहणारे अधिकारी अत्यंत गरजेच्या ठिकाणीच कामे झाल्याचे सांगत आहेत. त्यामुळे या अधिकाऱ्यांमध्येच ताळमेळ नसून त्यांनी बेजबाबदारपणाची सीमारेषाच ओलांडल्याने शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.पाणीपट्टी माफ करा...गगनाला भिडलेले खतांचे दर, मशागत, कीटकनाशके, मजुरी यामुळे शेती आतबट्ट्यात आली आहे; तर यंदा ऐनवेळी पाणी न आल्यामुळे हातातोंडाशी आलेल्या ऊसपिकाची अक्षरश: राखरांगोळी झाली आहे. याची अंशत: जबाबदारी स्वीकारून पाटबंधारे विभागाने यंदाची पाणीपट्टी आकारणी न करता ती माफ करावी, अशी मागणीही जाणकार शेतकऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.