शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

ऊसदर नियंत्रण मंडळाची लवकरच अधिसूचना

By admin | Updated: May 27, 2014 00:42 IST

हर्षवर्धन पाटील : विधानपरिषदेची आचारसंहिता संपल्यानंतर कार्यवाही

कोल्हापूर : राज्य सरकारने केलेल्या नवीन कायद्याप्रमाणे उसाचे दर ठरविण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या ऊसदर नियंत्रण मंडळ (शुगरकेन प्राईस बोर्ड) अधिसूचना निवडणूक आचारसंहिता संपताच काढली जाईल, अशी माहिती सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज, सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली. प्रत्येक वर्षी उसाला किती भाव द्यावा याचा निर्णय घेण्यासाठी डिसेंबरमध्ये केलेल्या कायद्यानुसार शुगरकेन प्राईज बोर्डाची स्थापना करण्यात आली आहे. राज्याचे प्रधान सचिन या बोर्डाचे अध्यक्ष असून वित्त, कृषी व सहकार विभागाचे प्रधान सचिव त्याचे सदस्य आहेत. या बोर्डावर सहकार खात्याचे तसेच साखर कारखान्यांचेही तीन प्रतिनिधी असतील. विधानपरिषदेची निवडणूक आचारसंहिता संपताच या बोर्डाची अधिसूचना निघणार आहे. त्यानंतर पुढच्या हंगामापासून उसाचे दर हे बोर्ड ठरविणार आहे, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. गेल्या हंगामातील ठरलेले उसाचे दर मिळाले नसल्याबाबत छेडले असता पालकमंत्री पाटील यांनी सांगितले की, एफआरपीप्रमाणे उसाचे दर देणे कायद्यानेच कारखान्यांवर बंधनकारक आहे. त्यामुळे ते त्यांना द्यावेच लागतील. एफआरपीप्रमाणे जे कारखाने दर देणार नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशा नोटिसा साखर आयुक्त कार्यालयामार्फत यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. जे कारखाने एफआरपीप्रमाणे दर देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे पाटील यांनी सांगितले. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन २ जूनपासून सुरू होत असल्याची त्यांनी माहिती दिली. काँग्रेस आघाडीचे हे शेवटचे अधिवेशन आहे. त्यामध्ये १४ विधेयक मंजूर केली जातील. त्यापैकी ७ विधेयके ही जुनी आहेत. विद्यापीठ, नगरविकास विभागासंबंधी काही अध्यादेश काढले आहेत त्याचे कायद्यात रूपांतर करण्यात येईल. याशिवाय राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्पावर अधिवेशनात चर्चा होईल. काही पुरवणी मागण्याही मांडण्यात येणार आहेत. यावेळच्या अधिवेशनात कायदा व सुव्यवस्था, गारपीठ, अतिवृष्टी आदी विषयांवर चर्चा होणे अपेक्षित आहे, असेही त्यांनी सांगितले. कोल्हापूरच्या टोलप्रश्नावर पालकमंत्री पाटील यांना विचारलेल्या प्रश्नाला बगल देताना त्यांनी आचारसंहितेचे कारण देऊन उत्तर देणे टाळले. (प्रतिनिधी)