शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

नदी प्रदूषणप्रश्नी आयुक्तांना नोटीस

By admin | Updated: February 23, 2015 00:15 IST

सांडपाणी कृष्णा नदीत : खटला दाखल करण्याचा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा इशारा

नरेंद्र रानडे - सांगली नदीत मिसळणाऱ्या वाढत्या सांडपाण्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने शनिवारी महापालिका आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे, अशी माहिती मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी ए. एस. हजारे यांनी रविवारी दिली. प्रदूषणप्रकरणी महापालिकेवर खटला दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे कृष्णेच्या पात्रातील पाण्याची पातळी उन्हाळ्यात कमी होऊन यंदाच्या वर्षीही ती घटण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याचवेळी नदीत मिसळणाऱ्या सांडपाण्यामध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. शेरीनाल्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्याशिवाय अन्य नाल्यांमधील सांडपाणीही नदीत मिसळत आहे. वास्तविक वॉटर पोल्युशन अ‍ॅक्टनुसार महापालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया केल्याशिवाय ते नदीत सोडणे गैर आहे. परंतु या कायद्याला नेहमीच केराची टोपली दाखविण्यातच मनपातील आरोग्य विभागातील अधिकारी धन्यता मानत आले आहेत. मागीलवर्षी प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांडपाण्याच्या प्रश्नावरुनच महापालिकेची दहा लाखांची बँक हमी जप्त केली होती. याला देखील काहींचा आक्षेप आहे. कारण जी रक्कम जप्त करण्यात आली, ती जनतेच्या करातून आलेली रक्कम होती. अधिकाऱ्यांच्या चुकीची शिक्षा नागरिकांना का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता.सध्या सांडपाणी प्रश्नाकडे मनपाचे होत असलेले दुर्लक्ष पाहता, प्रदूषण नियंत्रण मंडळाने शनिवार दि. २१ रोजी खटला का दाखल करण्यात येऊ नये? अशी नोटीस मनपाला पाठविली आहे. नोटिसीला उत्तर देण्याकरिता सात दिवसांचा कालावधी देण्यात आला असून त्यानंतर पुढील पावले उचलली जाणार आहेत. अशी आहे शेरीनाला योजना...वसंतदादा स्मारकाच्या उत्तरेस शेरीनाल्याच्या पाण्याचा साठवण तलाव आहे. तेथे पंपिंग स्टेशन व जॅकवेल उभारण्यात आले आहे. तेथून ९०० मिलिमीटरची कवलापूरपर्यंत ८ हजार ४३० मीटर लांबीची जलवाहिनी बसविण्यात आली आहे. कवलापुरात पंपिंग स्टेशन उभारण्यात आले आहे. शेरीनाला शुद्धीकरण प्रकल्पाची मूळ किंमत २५ कोटी २४ लाख ८८ हजार इतकी होती. अडचणींचे टप्पे पार करत करत ती ३४ कोटी ९५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. योजनेचे काम जवळपास पूर्ण झाले असले, तरी अजूनही एक कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. म्हणजे ही योजना कार्यान्वित होईपर्यंत ३६ कोटींवर जाण्याची शक्यता आहे. धुळगाव येथील प्रक्रिया होऊन बाहेर पडणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या यंत्रणेचे काम शिल्लक आहे. पैशाअभावी हे काम रखडले आहे. मनपा आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाचे साटेलोटे असल्याने फक्त ‘नोटीस एक्के नोटीस’ हेच मंडळाचे धोरण राहिलेले आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. मंडळाच्या या मनमानी कारभाराविरोधात आम्ही पत्रव्यवहार केला असून, त्याचे कोणतेही उत्तर अद्याप आलेले नाही. त्यामुळे लवकरच आम्ही हरित न्यायालयात मंडळ व मनपा यांच्याविरोधात याचिका दाखल करणार आहोत .- अ‍ॅड. अमित शिंदे, सांगली शहर सुधार समिती.प्रदूषण नियंत्रण मंडळाने आतापर्यंत अनेकवेळा महापालिकेस केवळ नोटिसा दिल्या आहेत. मात्र थेट कारवाई करण्यास टाळाटाळ केली आहे. यावेळी देखील मंडळाने तीच परंपरा जोपासली आहे. नोटिसा बजावण्यात धन्यता मानण्यापेक्षा संबंधितांना न्यायालयात खेचणे आवश्यक आहे.- डॉ. ज्ञानचंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, ग्राहक पंचायत, सांगली..