शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

शाळेत नसणाऱ्या २० हून अधिक शिक्षकांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:25 IST

शिक्षणाधिकारी उबाळे यांनी १६ मार्चपासून जिल्ह्यात विविध शाळांना भेटी देण्याचा सपाटा लावला आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे शिक्षकांच्या आग्रहाखातर सकाळच्या शाळा ...

शिक्षणाधिकारी उबाळे यांनी १६ मार्चपासून जिल्ह्यात विविध शाळांना भेटी देण्याचा सपाटा लावला आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे शिक्षकांच्या आग्रहाखातर सकाळच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सकाळी सात ते दुपारी साडेअकरा अशी शाळेची वेळ आहे. मात्र, अनेक ठिकाणी यावेळेत शिक्षकच उपस्थित नसल्याचे उबाळे यांना पहावयास मिळाले. वास्तविक उबाळे या कोल्हापुरातून निघून त्या शाळेपर्यंत जाण्यासाठी आठ, साडेआठ वाजतात. तरीही अनेक शाळा उघडलेल्या नसणे, विद्यार्थ्यांनी शाळा उघडणे, विद्यार्थी दारात येऊन बसणे, असे प्रकार पहावयास मिळाले.

जिल्ह्यातील चंदगड, हातकणंगले, करवीर, राधानगरी, भुदरगड तालुक्यात आतापर्यंत त्यांचा दौरा झाला आहे. या सर्व शिक्षकांना गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून नोटीस काढून याबाबत खुलासा मागवण्यात आला आहे. एकीकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी ही कडक भूमिका घेतली असताना ज्यांना नाेटीस काढली आहे, अशांनी पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली असून शिक्षकांच्या बाजूने आता काही सदस्य मध्यस्थीसाठी सरसावल्याचेही चित्र पहावयास मिळत आहे.

चौकट

चंदगडमध्ये चार दिवसांच्या सह्याच नाहीत

शिक्षणाधिकारी उबाळे ५ एप्रिल रोजी चंदगड तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी अगदी दुर्गम भागातील वांदराई येथे त्या शाळेत पोहोचल्या तर शाळा बंद होती. काही वेळाने तेथे ग्रामस्थ जमा झाले. गुरुजींना आम्ही बघितले होते, असे त्यांनी सांगितले. थोड्या वेळाने एका मुलानेच घरातून शाळेची किल्ली आणली. शाळा उघडून तपासणी केली असता येथील दोन्ही शिक्षकांच्या हजेरीपत्रकावर चार, पाच दिवसांच्या सह्याच नसल्याचे निष्पन्न झाले. ही गैरहजेरी मांडून उबाळे तेथून बाहेर पडल्या.

चौकट

किडनीचा त्रास होता म्हणून

किडनीचा त्रास होता म्हणून आपण शाळेत गेलो नाही, असे चंदगड तालुक्यातील या शिक्षकाने आपल्या भागातील जिल्हा परिषद सदस्यांना सांगितले; परंतु पुढे काही कारवाई होऊ नये म्हणून हाच शिक्षक गुरुवारी पावणे दोनशे किलोमीटरचा प्रवास करून जिल्हा परिषदेत आला होता.

चौकट

शाहूवाडीतही हीच परिस्थिती

शाहूवाडी तालुक्यातील माळापुडे, कातळेवाडी या ठिकाणी गुरुवारी उबाळे यांनी शाळांना भेटी दिल्या, तेव्हा आठ वाजून गेले तरी येथील शाळा उघडल्या नसल्याचे दिसून आले.

चौकट

ग्रामस्थांची डबल ढोलकी

अनेक गावांतील ग्रामस्थ शाळेचा दर्जा चांगला नाही, शिक्षक वेळेत शाळेत येत नाहीत म्हणून तक्रारी करत असतात; परंतु आपल्या गावातील शाळा कधी उघडते, शिक्षक वेळेत येतात का, नीट शिकवतात का, आपलीच मुले तेथे शिकत असल्याने शिक्षकांच्याही काही अडचणी आहेत का, याची साधी चौकशीही करायला तयार नसतात. मात्र, दुसरीकडे चुकीची घटना घडली की, काहीवेळा शिक्षकांना पाठीशी घालाणाराही गट तयार होतो. असे डबल ढोलकीचे काम न करता शिक्षकांवर ग्रामस्थांचा विधायक वचक राहण्याची गरज आहे.