शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शाळेत नसणाऱ्या २० हून अधिक शिक्षकांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:25 IST

शिक्षणाधिकारी उबाळे यांनी १६ मार्चपासून जिल्ह्यात विविध शाळांना भेटी देण्याचा सपाटा लावला आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे शिक्षकांच्या आग्रहाखातर सकाळच्या शाळा ...

शिक्षणाधिकारी उबाळे यांनी १६ मार्चपासून जिल्ह्यात विविध शाळांना भेटी देण्याचा सपाटा लावला आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे शिक्षकांच्या आग्रहाखातर सकाळच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सकाळी सात ते दुपारी साडेअकरा अशी शाळेची वेळ आहे. मात्र, अनेक ठिकाणी यावेळेत शिक्षकच उपस्थित नसल्याचे उबाळे यांना पहावयास मिळाले. वास्तविक उबाळे या कोल्हापुरातून निघून त्या शाळेपर्यंत जाण्यासाठी आठ, साडेआठ वाजतात. तरीही अनेक शाळा उघडलेल्या नसणे, विद्यार्थ्यांनी शाळा उघडणे, विद्यार्थी दारात येऊन बसणे, असे प्रकार पहावयास मिळाले.

जिल्ह्यातील चंदगड, हातकणंगले, करवीर, राधानगरी, भुदरगड तालुक्यात आतापर्यंत त्यांचा दौरा झाला आहे. या सर्व शिक्षकांना गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून नोटीस काढून याबाबत खुलासा मागवण्यात आला आहे. एकीकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी ही कडक भूमिका घेतली असताना ज्यांना नाेटीस काढली आहे, अशांनी पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली असून शिक्षकांच्या बाजूने आता काही सदस्य मध्यस्थीसाठी सरसावल्याचेही चित्र पहावयास मिळत आहे.

चौकट

चंदगडमध्ये चार दिवसांच्या सह्याच नाहीत

शिक्षणाधिकारी उबाळे ५ एप्रिल रोजी चंदगड तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी अगदी दुर्गम भागातील वांदराई येथे त्या शाळेत पोहोचल्या तर शाळा बंद होती. काही वेळाने तेथे ग्रामस्थ जमा झाले. गुरुजींना आम्ही बघितले होते, असे त्यांनी सांगितले. थोड्या वेळाने एका मुलानेच घरातून शाळेची किल्ली आणली. शाळा उघडून तपासणी केली असता येथील दोन्ही शिक्षकांच्या हजेरीपत्रकावर चार, पाच दिवसांच्या सह्याच नसल्याचे निष्पन्न झाले. ही गैरहजेरी मांडून उबाळे तेथून बाहेर पडल्या.

चौकट

किडनीचा त्रास होता म्हणून

किडनीचा त्रास होता म्हणून आपण शाळेत गेलो नाही, असे चंदगड तालुक्यातील या शिक्षकाने आपल्या भागातील जिल्हा परिषद सदस्यांना सांगितले; परंतु पुढे काही कारवाई होऊ नये म्हणून हाच शिक्षक गुरुवारी पावणे दोनशे किलोमीटरचा प्रवास करून जिल्हा परिषदेत आला होता.

चौकट

शाहूवाडीतही हीच परिस्थिती

शाहूवाडी तालुक्यातील माळापुडे, कातळेवाडी या ठिकाणी गुरुवारी उबाळे यांनी शाळांना भेटी दिल्या, तेव्हा आठ वाजून गेले तरी येथील शाळा उघडल्या नसल्याचे दिसून आले.

चौकट

ग्रामस्थांची डबल ढोलकी

अनेक गावांतील ग्रामस्थ शाळेचा दर्जा चांगला नाही, शिक्षक वेळेत शाळेत येत नाहीत म्हणून तक्रारी करत असतात; परंतु आपल्या गावातील शाळा कधी उघडते, शिक्षक वेळेत येतात का, नीट शिकवतात का, आपलीच मुले तेथे शिकत असल्याने शिक्षकांच्याही काही अडचणी आहेत का, याची साधी चौकशीही करायला तयार नसतात. मात्र, दुसरीकडे चुकीची घटना घडली की, काहीवेळा शिक्षकांना पाठीशी घालाणाराही गट तयार होतो. असे डबल ढोलकीचे काम न करता शिक्षकांवर ग्रामस्थांचा विधायक वचक राहण्याची गरज आहे.