शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

शाळेत नसणाऱ्या २० हून अधिक शिक्षकांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:25 IST

शिक्षणाधिकारी उबाळे यांनी १६ मार्चपासून जिल्ह्यात विविध शाळांना भेटी देण्याचा सपाटा लावला आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे शिक्षकांच्या आग्रहाखातर सकाळच्या शाळा ...

शिक्षणाधिकारी उबाळे यांनी १६ मार्चपासून जिल्ह्यात विविध शाळांना भेटी देण्याचा सपाटा लावला आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे शिक्षकांच्या आग्रहाखातर सकाळच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सकाळी सात ते दुपारी साडेअकरा अशी शाळेची वेळ आहे. मात्र, अनेक ठिकाणी यावेळेत शिक्षकच उपस्थित नसल्याचे उबाळे यांना पहावयास मिळाले. वास्तविक उबाळे या कोल्हापुरातून निघून त्या शाळेपर्यंत जाण्यासाठी आठ, साडेआठ वाजतात. तरीही अनेक शाळा उघडलेल्या नसणे, विद्यार्थ्यांनी शाळा उघडणे, विद्यार्थी दारात येऊन बसणे, असे प्रकार पहावयास मिळाले.

जिल्ह्यातील चंदगड, हातकणंगले, करवीर, राधानगरी, भुदरगड तालुक्यात आतापर्यंत त्यांचा दौरा झाला आहे. या सर्व शिक्षकांना गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून नोटीस काढून याबाबत खुलासा मागवण्यात आला आहे. एकीकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी ही कडक भूमिका घेतली असताना ज्यांना नाेटीस काढली आहे, अशांनी पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली असून शिक्षकांच्या बाजूने आता काही सदस्य मध्यस्थीसाठी सरसावल्याचेही चित्र पहावयास मिळत आहे.

चौकट

चंदगडमध्ये चार दिवसांच्या सह्याच नाहीत

शिक्षणाधिकारी उबाळे ५ एप्रिल रोजी चंदगड तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी अगदी दुर्गम भागातील वांदराई येथे त्या शाळेत पोहोचल्या तर शाळा बंद होती. काही वेळाने तेथे ग्रामस्थ जमा झाले. गुरुजींना आम्ही बघितले होते, असे त्यांनी सांगितले. थोड्या वेळाने एका मुलानेच घरातून शाळेची किल्ली आणली. शाळा उघडून तपासणी केली असता येथील दोन्ही शिक्षकांच्या हजेरीपत्रकावर चार, पाच दिवसांच्या सह्याच नसल्याचे निष्पन्न झाले. ही गैरहजेरी मांडून उबाळे तेथून बाहेर पडल्या.

चौकट

किडनीचा त्रास होता म्हणून

किडनीचा त्रास होता म्हणून आपण शाळेत गेलो नाही, असे चंदगड तालुक्यातील या शिक्षकाने आपल्या भागातील जिल्हा परिषद सदस्यांना सांगितले; परंतु पुढे काही कारवाई होऊ नये म्हणून हाच शिक्षक गुरुवारी पावणे दोनशे किलोमीटरचा प्रवास करून जिल्हा परिषदेत आला होता.

चौकट

शाहूवाडीतही हीच परिस्थिती

शाहूवाडी तालुक्यातील माळापुडे, कातळेवाडी या ठिकाणी गुरुवारी उबाळे यांनी शाळांना भेटी दिल्या, तेव्हा आठ वाजून गेले तरी येथील शाळा उघडल्या नसल्याचे दिसून आले.

चौकट

ग्रामस्थांची डबल ढोलकी

अनेक गावांतील ग्रामस्थ शाळेचा दर्जा चांगला नाही, शिक्षक वेळेत शाळेत येत नाहीत म्हणून तक्रारी करत असतात; परंतु आपल्या गावातील शाळा कधी उघडते, शिक्षक वेळेत येतात का, नीट शिकवतात का, आपलीच मुले तेथे शिकत असल्याने शिक्षकांच्याही काही अडचणी आहेत का, याची साधी चौकशीही करायला तयार नसतात. मात्र, दुसरीकडे चुकीची घटना घडली की, काहीवेळा शिक्षकांना पाठीशी घालाणाराही गट तयार होतो. असे डबल ढोलकीचे काम न करता शिक्षकांवर ग्रामस्थांचा विधायक वचक राहण्याची गरज आहे.