शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत नसणाऱ्या २० हून अधिक शिक्षकांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:25 IST

शिक्षणाधिकारी उबाळे यांनी १६ मार्चपासून जिल्ह्यात विविध शाळांना भेटी देण्याचा सपाटा लावला आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे शिक्षकांच्या आग्रहाखातर सकाळच्या शाळा ...

शिक्षणाधिकारी उबाळे यांनी १६ मार्चपासून जिल्ह्यात विविध शाळांना भेटी देण्याचा सपाटा लावला आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे शिक्षकांच्या आग्रहाखातर सकाळच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सकाळी सात ते दुपारी साडेअकरा अशी शाळेची वेळ आहे. मात्र, अनेक ठिकाणी यावेळेत शिक्षकच उपस्थित नसल्याचे उबाळे यांना पहावयास मिळाले. वास्तविक उबाळे या कोल्हापुरातून निघून त्या शाळेपर्यंत जाण्यासाठी आठ, साडेआठ वाजतात. तरीही अनेक शाळा उघडलेल्या नसणे, विद्यार्थ्यांनी शाळा उघडणे, विद्यार्थी दारात येऊन बसणे, असे प्रकार पहावयास मिळाले.

जिल्ह्यातील चंदगड, हातकणंगले, करवीर, राधानगरी, भुदरगड तालुक्यात आतापर्यंत त्यांचा दौरा झाला आहे. या सर्व शिक्षकांना गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून नोटीस काढून याबाबत खुलासा मागवण्यात आला आहे. एकीकडे शिक्षणाधिकाऱ्यांनी ही कडक भूमिका घेतली असताना ज्यांना नाेटीस काढली आहे, अशांनी पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली असून शिक्षकांच्या बाजूने आता काही सदस्य मध्यस्थीसाठी सरसावल्याचेही चित्र पहावयास मिळत आहे.

चौकट

चंदगडमध्ये चार दिवसांच्या सह्याच नाहीत

शिक्षणाधिकारी उबाळे ५ एप्रिल रोजी चंदगड तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. यावेळी अगदी दुर्गम भागातील वांदराई येथे त्या शाळेत पोहोचल्या तर शाळा बंद होती. काही वेळाने तेथे ग्रामस्थ जमा झाले. गुरुजींना आम्ही बघितले होते, असे त्यांनी सांगितले. थोड्या वेळाने एका मुलानेच घरातून शाळेची किल्ली आणली. शाळा उघडून तपासणी केली असता येथील दोन्ही शिक्षकांच्या हजेरीपत्रकावर चार, पाच दिवसांच्या सह्याच नसल्याचे निष्पन्न झाले. ही गैरहजेरी मांडून उबाळे तेथून बाहेर पडल्या.

चौकट

किडनीचा त्रास होता म्हणून

किडनीचा त्रास होता म्हणून आपण शाळेत गेलो नाही, असे चंदगड तालुक्यातील या शिक्षकाने आपल्या भागातील जिल्हा परिषद सदस्यांना सांगितले; परंतु पुढे काही कारवाई होऊ नये म्हणून हाच शिक्षक गुरुवारी पावणे दोनशे किलोमीटरचा प्रवास करून जिल्हा परिषदेत आला होता.

चौकट

शाहूवाडीतही हीच परिस्थिती

शाहूवाडी तालुक्यातील माळापुडे, कातळेवाडी या ठिकाणी गुरुवारी उबाळे यांनी शाळांना भेटी दिल्या, तेव्हा आठ वाजून गेले तरी येथील शाळा उघडल्या नसल्याचे दिसून आले.

चौकट

ग्रामस्थांची डबल ढोलकी

अनेक गावांतील ग्रामस्थ शाळेचा दर्जा चांगला नाही, शिक्षक वेळेत शाळेत येत नाहीत म्हणून तक्रारी करत असतात; परंतु आपल्या गावातील शाळा कधी उघडते, शिक्षक वेळेत येतात का, नीट शिकवतात का, आपलीच मुले तेथे शिकत असल्याने शिक्षकांच्याही काही अडचणी आहेत का, याची साधी चौकशीही करायला तयार नसतात. मात्र, दुसरीकडे चुकीची घटना घडली की, काहीवेळा शिक्षकांना पाठीशी घालाणाराही गट तयार होतो. असे डबल ढोलकीचे काम न करता शिक्षकांवर ग्रामस्थांचा विधायक वचक राहण्याची गरज आहे.