शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

भूसंपादनच नाही तर विकास कसा?

By admin | Updated: August 18, 2015 00:46 IST

भूषण गगराणी : शेतकऱ्यांच्या विरोधामुळे औद्योगिक विकास रखडला

कोल्हापूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) जमिनी देण्यासाठी विरोध झाल्यामुळे गेल्या दहा वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यात भूसंपादन झालेले नाही़ महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांत उद्योगांसाठी सर्वाधिक जमिनीची मागणी असतानाही शेतकरी आणि स्थानिकांच्या विरोधामुळे भूसंपादन होऊ शकत नाही़ उद्योगांसाठी जमिनी आवश्यक आहेत़ भूसंपादनासाठी उद्योजक, लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी यांनी व्यक्त केले़ कोल्हापूर जिल्हा औद्योगिक विकास महामंडळाच्या कोल्हापूर कार्यालयास गगराणी यांनी सोमवारी भेट दिली़ यावेळी प्रदूषण, भूसंपादन, आदी विषयांवर त्यांनी जिल्ह्यातील उद्योजकांच्या प्रतिनिधींशी आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली़ या चर्चेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते़ गगराणी म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात विकासवाडी (ता़ करवीर), अर्जुनी (ता़ कागल) आणि अतिरिक्त शिरोली औद्योगिक क्षेत्र, इथे उद्योग उभारणीसाठी आवश्यक असलेल्या जमिनी आहेत़ अर्जुनी येथे २४७ एकर, तर विकासवाडी करवीर औद्योगिक क्षेत्र येथे २६५ एकर जमीन आहे़ या क्षेत्रातील भूसंपादनास शेतकरी तसेच स्थानिकांनी विरोध केला आहे़ त्यामुळे भूसंपादन ठप्प झाले आहे़ उद्योग उभारणीसाठी महामंडळाकडे किमान ३५० ते ४०० एकर जमीन साठा (स्टॉक) स्वरूपात असणे आवश्यक असते़; पण जिल्ह्यातून भूसंपादनास विरोध होत असल्यामुळे नवीन उद्योगांची निर्मिती होणे कठीण आहे़ औद्योगिक वसाहतींमधून होणाऱ्या प्रदूषणाचे प्रमाण तितके गंभीर नाही़ पर्यावरणपूरक मूलभूत सुविधांसाठी एमआयडीसीने गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रात ३५० कोटी खर्च केले आहेत़ पर्यावरण रक्षणासाठी एमआयडीसी कटिबद्ध आहे़ ‘एचआरटीएस’मध्ये सुधारणाही करण्यात येत आहेत़ त्यामुळे ‘एमआयडीसीमुळेच पर्यावरणाचे प्रदूषण होते,’ ही ओरड चुकीची आहे, असे मतही गगराणी यांनी व्यक्त केले़ कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील टेक्स्टाईल उद्योजकांना सामायिक औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सुरू केलेला सीईटीपी प्रकल्प अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्याच्या सूचनाही गगरानी यांनी सीईटीपी युजर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या़ यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष गुप्ता यांनी सीईटीपी प्रकल्प ३० सप्टेंबरपर्यंत अद्ययावत करण्याचे मान्य केले़ ‘सीआयआय’चे दक्षिण महाराष्ट्र उपाध्यक्ष योगेश कुलकर्णी, शिरोली मॅन्युफ ॅक्चरर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राजू पाटील, गोकुळ शिरगाव मॅन्युफ ॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित आजरी, कागल-हातकणंगले मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष मोहन कुशिरे यांनी एमआयडीसीच्या औद्योगिक वसाहतीमध्ये फायर स्टेशन व्हावे, आयआयटीसाठी जागा देण्यात यावी, आदी मागण्या केल्या़ या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन गगराणी यांनी दिले़ उद्योजक, लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा महाराष्ट्रात परकीय गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे़ गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे़ पुणे फॉक्सकॉन इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील कंपनी येत्या पाच वर्षांत महाराष्ट्रात पाच अब्ज डॉलर गुंतवणूक करणार आहे़ या प्रकल्पासाठी दीड हजार एकर जमीन दिली आहे़ मोठ्या उद्योगांसाठी जमिनी आवश्यक आहेत़ त्यामुळे भूसंपादनासाठी स्थानिक उद्योजक, लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहनही गगराणी यांनी केले़ (प्रतिनिधी)