शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
5
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
6
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
7
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
8
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
9
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
11
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
12
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
13
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
14
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
15
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
16
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
17
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
18
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
19
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
20
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना

‘मनपा’ला अनुदान नव्हे, कर्जच देणार

By admin | Updated: April 13, 2015 00:37 IST

टोलप्रश्न : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती

कोल्हापूर : मूल्यांकन समितीचा अहवाल थोड्याच दिवसांत प्राप्त होणार असून, त्यानुसार ‘आयआरबी’ कंपनीला किती रक्कम द्यायची हे निश्चित होईल. त्यानंतर कंपनीला दिलेला भूखंड शिवाय उर्वरित द्यावे लागणारे पैसे महापालिकेला कर्जरूपाने देण्याच्या विचाराधीन आहे; पण ३१ मे नंतर कोल्हापूर टोलमुक्त करू, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.शासकीय विश्रामगृह येथे रविवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले, राज्यातील टोलमुक्तीचे धोरण शासनाने हाती घेतले आहे. लहान वाहनांना वगळण्यात आले म्हणून त्याचा बोजा अवजड वाहनांवर बसणार नाही, याची काळजी सरकारने घेतली आहे. कोणताही प्रकल्प बांधताना ४० टक्के केंद्र व राज्य सरकार पैसे देते. ६० टक्के बिल्डरचा हिस्सा असतो. त्यामुळे अवजड वाहनांना याचा भुर्दंड बसणार नाही. कोल्हापूरच्या टोलबाबत आयआरबी कंपनीशी चर्चा सुरू असून, अनेक बैठका झाल्या आहेत. त्यांची ६०० कोटींची मागणी आहे; पण रस्ते मूल्यांकन समितीच्या प्राथमिक अंदाजानुसार ३२५ कोटींपेक्षा जास्त रक्कम कंपनीला देऊ नये, असे मत आहे. यातून काहीतरी मार्ग निघेल. मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कमिटीला ३१ मे पूर्वी अंतिम अहवाल देण्यास सांगितल्याने हा विषय लवकरच संपुष्टात येईल, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ोन हजार कोटींचे बिनव्याजी कर्ज दिले आहे. खरेदी कर माफ केला, मळी नियंत्रण मुक्त केली, सहवीज प्रकल्पाचे प्रलंबित बिले देण्याचाही निर्णय झाल्याची माहिती मंत्री पाटील यांनी दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश हाळवणकर, आमदार उल्हास पाटील, महेश जाधव, रामभाऊ चव्हाण, बाबा देसाई उपस्थित होते.हाळवणकर यांची मुक्ताफळे राज्याप्रमाणे कोल्हापुरातही अवजड वाहनांवर टोल आकारण्यास कोणतीच हरकत नसल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश हाळवणकर यांनी सांगितले. म्हणजे कोल्हापूर टोलमुक्त करायचे नाही, अशा हालचाली सुरू आहेत का? अशी विचारणा पत्रकारांनी केली असता, मंत्री पाटील यांनी सारवासारव करीत हा आॅफ द रेकॉर्ड प्रश्न असल्याचे सांगितले. मग देखभाल दुरुस्तीचे बघूकोल्हापूरचा टोल घालविणार, पण रस्त्यांची देखभाल दुरुस्ती महापालिकेला झेपणार का? या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री पाटील म्हणाले, पहिला टोल घालवू नंतर देखभाल दुरुस्तीचे काय करायचे ठरवू.प्रकल्पाचा करार जरी २२० कोटी असला तरी तीन वर्षांत टोल वसुली होऊ न शकल्याने व्याजासह ४४० कोटी रुपये होऊ शकतील. कंपनीला व्याज द्यावेच लागेल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. राष्ट्रीय मार्गाबाबत आठ दिवसांत निर्णय राष्ट्रीय महामार्गावरील टोलबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर विचार सुरू आहे. येत्या आठ-दहा दिवसांत याबाबतही सकारात्मक निर्णय होईल, अशी माहिती मंत्री पाटील यांनी दिली.