शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

शेपटीने कुत्र्याला कसे वागावे हे सांगण्यासारखे -एन. डी. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 01:06 IST

विश्र्वास पाटील । कोल्हापूर : ‘भाजपसोबत चला, नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटेल,’ हा अजित पवार यांचा सल्ला म्हणजे शेपटीने कुत्र्याला ...

विश्र्वास पाटील ।कोल्हापूर : ‘भाजपसोबत चला, नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटेल,’ हा अजित पवार यांचा सल्ला म्हणजे शेपटीने कुत्र्याला कसे वागावे, हे सांगण्यासारखे आहे, अशी बोचरी टीका ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी केली आहे. अजित पवार यांनी घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा असून, तो चुलते शरद पवार यांच्या राजकीय चारित्र्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे, असेही प्रा. पाटील यांनी म्हटले आहे.महाराष्ट्रात शनिवारी जी राजकीय उलथापालथ झाली, त्या संदर्भात प्रा. पाटील म्हणाले, ‘अजित यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी शरद पवार यांच्या राजकीय कारकिर्दीवर त्याचा काय परिणाम होईल, याचा विचार करायला हवा होता. एकटा अजित पवार काय करू शकतो? हा पवार यांचाच डाव असेल, अशी साशंकता लोकांच्या मनांत निर्माण होऊ शकते. अजित यांच्या वर्तणुकीचा दोष शरद पवार यांना येणार आहे, याचे भान त्यांनी बाळगायला हवे होते. राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा एकूण राजकारणाच्या परिप्रेक्ष्यात शरद पवार यांच्यासोबतचे त्यांचे नाते हीच त्यांची मोठी जमेची बाजू आहे. त्यांना वजा करून अजित यांचे स्थान काय राहते, याचेही आत्मचिंतन त्यांनी या निमित्ताने करावे.’राज्यात अगोदर भाजप-शिवसेनेने सत्तास्थापनेचा मोठा घोळ घातला. त्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेस यांचे सरकार सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत असतानाच अजित पवार यांनी अशी टोकाची भूमिका घ्यायला नको होती. भाजपसोबत जाण्यासाठी ते इतके अगतिक का झाले, या कारणांचाही शोध घ्यायला हवा, असेही प्रा. पाटील यांनी म्हटले आहे.शरद पवार यांनी भूमिकेशी एकनिष्ठ राहावेअजित पवार यांची शरद पवार यांनी कोणतीही गय करू नये. राज्यात सरकार कुणाचेही येवो; परंतु त्यांनी शिवसेना व काँग्रेसला सोबत घेऊन जे राजकीय पाऊल टाकले आहे, त्यातून त्यांनी माघार घेऊ नये. राष्ट्रवादी काँग्रेसवर त्याचे काहीही परिणाम झाले तरी शरद पवार यांनी या भूमिकेला तडा जाईल, असा कोणताही निर्णय घेऊ नये, असाही सल्ला प्रा.पाटील यांनी दिला आहे.